ETV Bharat / bharat

Flood In Assam: आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; आठ जवानांसह चार नागरिकांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 1, 2022, 11:05 PM IST

सध्या आसाममधील पुरपरिस्थिती नियंत्रणाबाहे गेली आहे. रोजच मृत्यूच्या आकड्यांता वाढ होताना दिसत आहे. सामान्य नागरिकांसह आता जवानांवरही हे संकट कोसळले आहे. ( Flood In Assam ) आज भारतीय सैन्यदलाच्या विभागाने दिलेल्या माहितीनुसार शोधकार्यात आणखी आठ प्रादेशिक लष्कराचे जवान आणि आणखी चार नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत .

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर
आसाममध्ये पूरस्थिती गंभीर

गुवाहाटी (आसाम) - आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पुरपरिस्थिती आहे. यामध्ये आजपर्यंत 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि आणखीही हे मृत्यूचे सत्र सुरूच आहे. ( Flood Situation In Assam ) आज भारतीय सैन्यदलाच्या विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शोधकार्यात आणखी आठ प्रादेशिक लष्कराचे जवान आणि आणखी चार नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, टेरिटोरियल आर्मी, (SDRF)आणि (NDRF) यांनी आज तुपुल, मणिपूर येथे घटनास्थळी शोध मोहीम सुरू ठेवली आहे.

किती लोक बेघर झाले - या पुरामुळे आसाममधील 26 जिल्ह्यांमध्ये 31.54 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. बाजली, बारपेटा, विश्वनाथ, कचर, चिरांग, दरंग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगढ, दिमा हासाओ, गोलपारा, गोलाघाट, हैलाकांडी, होजाई, कामरूप, कामरूप महानगर, करीमगंज, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलकुरपुरी, तागापूर, तागापूर आणि उदलगुरी हे बाधित जिल्ह्यांमध्ये आहेत.

सर्वाधिक प्रभावित जिल्हा - कचार हा सलग दुसऱ्या दिवशी सर्वाधिक प्रभावित जिल्हा राहिला, ज्यामध्ये सुमारे 14.31 लाख लोक प्रभावित झाले आहेत. एकट्या सिलचर जिल्ह्यातच 7,25,306 लोकांना पुराचा फटका बसला आहे. ( Flood Situation In Assam ) बुधवारी, दक्षिण आसाम शहरातील अनेक भाग सलग दहाव्या दिवशी पाण्याखाली गेले. बारपेटा येथे 5.49 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. तर, नागावमध्ये सुमारे 5.20 लाख लोक त्यांच्या गावात पुराचे पाणी शिरल्याने त्रस्त आहेत.

शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली - पुरामुळे बाधित लोकांची संख्या 31.54 लाख झाली आहे. जे एका दिवसापूर्वीच्या 24.92 लाखांच्या आकड्यापेक्षा जास्त आहे. ब्रह्मपुत्रा, बेकी, कोपिली, बराक आणि कुशियारा नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत. सिलचर शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली गेले असून रहिवाशांना अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. ( Flood crisis in Assam ) उपायुक्त कीर्ती जल्ली यांनी सांगितले की, बेथकुंडी येथील धरण फुटल्याने सिलचरमधील बहुतांश भाग अजूनही पाण्याखाली आहेत. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते म्हणाले की, बाधित लोकांपर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी आणि अन्न पोहोचविण्यास प्राधान्य दिले जात आहे.

विविध मदत केंद्रांवर आरोग्य शिबिरे - तर आरोग्य विभागातर्फे जलजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील 28 महानगरपालिकेच्या वॉर्डांमध्ये वैद्यकीय कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर, विविध मदत केंद्रांवर आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत, जिथे लोकांना अतिसार टाळण्यासाठी ओआरएस पॅकेट देण्यात आल्या आहेत. राज्यभरातील 79 महसूल विभागांतर्गत एकूण 2,675 गावांना पुराचा फटका बसला असून 3,12,085 लोकांनी 569 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. कचरला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे, जिथे 14.30 लाख लोक प्रभावित झाले आहेत.

तिनसुकिया जिल्ह्यात मोठे नुकसान - त्यानंतर बारपेटा (5.49 लाख) आणि नागाव (5.19 लाख) यांचा क्रमांक लागतो. पाच बंधारे तुटले आहेत. तर, 177 रस्ते आणि पाच पुलांचे नुकसान झाले आहे. एकूण 548 घरांचे पूर्ण नुकसान झाले असून 1,034 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोंगाईगाव, कोक्राझार, लखीमपूर, मोरीगाव, नागाव, नलबारी, सोनितपूर, दक्षिण सालमार, तामुलपूर आणि तिनसुकिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मातीची धूप झाली आहे.

मदत पुरवण्यासाठी चोवीस तास मदत कार्य - ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांमुळे 2,675 गावे जलमय झाली आहेत आणि 91,349 हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. आर्मी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आसाम पोलीस अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा कर्मचारी आणि इतर स्वयंसेवक अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आणि सर्व शक्य मदत पुरवण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत.

हेही वाचा - Doctors Day: आपला संघर्ष बाजूला करून डॉक्टरांचे स्त्री भ्रूणहत्ये अहोरात्र काम;वाचा, ETV'चा स्पेशल रिपोर्ट

गुवाहाटी (आसाम) - आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पुरपरिस्थिती आहे. यामध्ये आजपर्यंत 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि आणखीही हे मृत्यूचे सत्र सुरूच आहे. ( Flood Situation In Assam ) आज भारतीय सैन्यदलाच्या विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शोधकार्यात आणखी आठ प्रादेशिक लष्कराचे जवान आणि आणखी चार नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, टेरिटोरियल आर्मी, (SDRF)आणि (NDRF) यांनी आज तुपुल, मणिपूर येथे घटनास्थळी शोध मोहीम सुरू ठेवली आहे.

किती लोक बेघर झाले - या पुरामुळे आसाममधील 26 जिल्ह्यांमध्ये 31.54 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. बाजली, बारपेटा, विश्वनाथ, कचर, चिरांग, दरंग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगढ, दिमा हासाओ, गोलपारा, गोलाघाट, हैलाकांडी, होजाई, कामरूप, कामरूप महानगर, करीमगंज, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलकुरपुरी, तागापूर, तागापूर आणि उदलगुरी हे बाधित जिल्ह्यांमध्ये आहेत.

सर्वाधिक प्रभावित जिल्हा - कचार हा सलग दुसऱ्या दिवशी सर्वाधिक प्रभावित जिल्हा राहिला, ज्यामध्ये सुमारे 14.31 लाख लोक प्रभावित झाले आहेत. एकट्या सिलचर जिल्ह्यातच 7,25,306 लोकांना पुराचा फटका बसला आहे. ( Flood Situation In Assam ) बुधवारी, दक्षिण आसाम शहरातील अनेक भाग सलग दहाव्या दिवशी पाण्याखाली गेले. बारपेटा येथे 5.49 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. तर, नागावमध्ये सुमारे 5.20 लाख लोक त्यांच्या गावात पुराचे पाणी शिरल्याने त्रस्त आहेत.

शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली - पुरामुळे बाधित लोकांची संख्या 31.54 लाख झाली आहे. जे एका दिवसापूर्वीच्या 24.92 लाखांच्या आकड्यापेक्षा जास्त आहे. ब्रह्मपुत्रा, बेकी, कोपिली, बराक आणि कुशियारा नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत. सिलचर शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली गेले असून रहिवाशांना अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. ( Flood crisis in Assam ) उपायुक्त कीर्ती जल्ली यांनी सांगितले की, बेथकुंडी येथील धरण फुटल्याने सिलचरमधील बहुतांश भाग अजूनही पाण्याखाली आहेत. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते म्हणाले की, बाधित लोकांपर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी आणि अन्न पोहोचविण्यास प्राधान्य दिले जात आहे.

विविध मदत केंद्रांवर आरोग्य शिबिरे - तर आरोग्य विभागातर्फे जलजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील 28 महानगरपालिकेच्या वॉर्डांमध्ये वैद्यकीय कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर, विविध मदत केंद्रांवर आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत, जिथे लोकांना अतिसार टाळण्यासाठी ओआरएस पॅकेट देण्यात आल्या आहेत. राज्यभरातील 79 महसूल विभागांतर्गत एकूण 2,675 गावांना पुराचा फटका बसला असून 3,12,085 लोकांनी 569 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. कचरला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे, जिथे 14.30 लाख लोक प्रभावित झाले आहेत.

तिनसुकिया जिल्ह्यात मोठे नुकसान - त्यानंतर बारपेटा (5.49 लाख) आणि नागाव (5.19 लाख) यांचा क्रमांक लागतो. पाच बंधारे तुटले आहेत. तर, 177 रस्ते आणि पाच पुलांचे नुकसान झाले आहे. एकूण 548 घरांचे पूर्ण नुकसान झाले असून 1,034 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोंगाईगाव, कोक्राझार, लखीमपूर, मोरीगाव, नागाव, नलबारी, सोनितपूर, दक्षिण सालमार, तामुलपूर आणि तिनसुकिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मातीची धूप झाली आहे.

मदत पुरवण्यासाठी चोवीस तास मदत कार्य - ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांमुळे 2,675 गावे जलमय झाली आहेत आणि 91,349 हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. आर्मी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आसाम पोलीस अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा कर्मचारी आणि इतर स्वयंसेवक अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आणि सर्व शक्य मदत पुरवण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत.

हेही वाचा - Doctors Day: आपला संघर्ष बाजूला करून डॉक्टरांचे स्त्री भ्रूणहत्ये अहोरात्र काम;वाचा, ETV'चा स्पेशल रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.