ETV Bharat / bharat

Trikut Pahar Ropeway Accident : त्रिकूट डोंगरावर रोपवेमध्ये बचावकार्य सुरूच; हेलिकॉप्टरमधून पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू

author img

By

Published : Apr 12, 2022, 9:30 AM IST

देवघरच्या त्रिकूट डोंगरावर रोपवेमध्ये अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी आज मंगळवार(12 एप्रिल)रोजी पुन्हा बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 8 जणांना सुखरूप खाली आणण्यात आले आहे. ज्यामध्ये एका गरुड कमांडोचाही समावेश आहे.

त्रिकूट डोंगरावर रोपवेमध्ये बचावकार्य सुरू आहे
त्रिकूट डोंगरावर रोपवेमध्ये बचावकार्य सुरू आहे

देवघर - देवघरच्या त्रिकूट डोंगरावर रोपवेमध्ये अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी आज मंगळवार(12 एप्रिल)रोजी पुन्हा बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 8 जणांना सुखरूप खाली आणण्यात आले आहे. ज्यामध्ये एका गरुड कमांडोचाही समावेश आहे. अजूनही 7 पर्यटक तिथे अडकले आहेत. तत्पूर्वी, सोमवारी सुरू असलेली कारवाई रात्रीमुळे मागे घेण्यात आली होती.

त्रिकूट डोंगरावर रोपवेमध्ये बचावकार्य सुरू आहे

हेलिकॉप्टरवर बसवण्याचा प्रयत्न - यापूर्वी 11 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता हवाई दलाच्या गरुड कमांडोंच्या पथकाने MI-17 आणि MI-17 V5 हेलिकॉप्टरच्या मदतीने 32 जणांची सुटका केली होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास एक दु:खद घटनाही घडली. बचावकार्य करत असताना एका पर्यटकाला हेलिकॉप्टरवर बसवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा सेफ्टी बेल्ट उघडला आणि तो खाली खड्ड्यात पडला. दरम्यान, चार ट्रॉलींमध्ये एकूण 14 पर्यटक अजूनही अडकून पडले आहेत. 10 एप्रिलच्या संध्याकाळपासून सर्वजण अडकून पडले आहेत.

त्रिकूट डोंगरावर रोपवेमधील घटनेबद्दल आढावा

सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका होईल - 11 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत सर्व पर्यटकांना बाहेर काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले तरी ते शक्य झाले नाही. ते म्हणाले की, पर्वताची भौगोलिक स्थिती अशी आहे की बचाव कार्य चालवण्यात खूप अडचणी येत आहेत. 12 एप्रिल रोजी सकाळी कारवाई सुरू झाल्यानंतर काही तासांतच उर्वरित सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

चार ट्रॉलीमध्ये सुमारे 15 लोक अडकले - देवघरचे जिल्हा दंडाधिकारी मंजुनाथ भजंत्री यांनी सांगितले की, दिवसभर चाललेल्या या कारवाईत वेगवेगळ्या ट्रॉलींमधून ३२ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, सायंकाळी झालेल्या अपघातामुळे एकाला जीव गमवावा लागला. त्यांनी सांगितले की, सध्या चार ट्रॉलीमध्ये सुमारे 15 लोक अडकले आहेत.

चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई - जिल्हाधिकारी मंजुनाथ भजंत्री यांनी सांगितले की, अजूनही अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर कसे काढायचे हा प्रशासनाचा पहिला प्रयत्न आहे. ते म्हणाले की, १० एप्रिल रोजी अपघात झाल्यापासून संपूर्ण प्रशासन बचावकार्यात गुंतले आहे. या अपघाताची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

रांची येथील वायुसेनेची टीम गुंतलेली आहे - याशिवाय हवाई दलाचा एक कमांडोही ट्रॉलीमध्ये अडकला आहे. वास्तविक, तो बचावकार्यासाठी ट्रॉलीमध्ये आला होता. तसेच, 10 एप्रिल रोजी संध्याकाळी घडलेल्या घटनेनंतर लगेचच एनडीआरएफ टीम तसेच लष्कराच्या मदतीची मागणी करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावर तातडीने कारवाई करत केंद्र सरकारने सकाळपासूनच हवाई दल तसेच लष्कर आणि आयटीबीपीची टीम तैनात केली होती. त्यांनी सांगितले की, या ऑपरेशनमध्ये पश्चिम बंगालच्या खडकपूर एअरवेजसह रांची येथील वायुसेनेची टीम गुंतलेली आहे.

हेही वाचा - Tesco warehouse fire In Telangana : तेलंगणातील टेस्को गोदामाला भीषण आग; सुमारे ३५ कोटींचे नुकसान

देवघर - देवघरच्या त्रिकूट डोंगरावर रोपवेमध्ये अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी आज मंगळवार(12 एप्रिल)रोजी पुन्हा बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 8 जणांना सुखरूप खाली आणण्यात आले आहे. ज्यामध्ये एका गरुड कमांडोचाही समावेश आहे. अजूनही 7 पर्यटक तिथे अडकले आहेत. तत्पूर्वी, सोमवारी सुरू असलेली कारवाई रात्रीमुळे मागे घेण्यात आली होती.

त्रिकूट डोंगरावर रोपवेमध्ये बचावकार्य सुरू आहे

हेलिकॉप्टरवर बसवण्याचा प्रयत्न - यापूर्वी 11 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता हवाई दलाच्या गरुड कमांडोंच्या पथकाने MI-17 आणि MI-17 V5 हेलिकॉप्टरच्या मदतीने 32 जणांची सुटका केली होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास एक दु:खद घटनाही घडली. बचावकार्य करत असताना एका पर्यटकाला हेलिकॉप्टरवर बसवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा सेफ्टी बेल्ट उघडला आणि तो खाली खड्ड्यात पडला. दरम्यान, चार ट्रॉलींमध्ये एकूण 14 पर्यटक अजूनही अडकून पडले आहेत. 10 एप्रिलच्या संध्याकाळपासून सर्वजण अडकून पडले आहेत.

त्रिकूट डोंगरावर रोपवेमधील घटनेबद्दल आढावा

सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका होईल - 11 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत सर्व पर्यटकांना बाहेर काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले तरी ते शक्य झाले नाही. ते म्हणाले की, पर्वताची भौगोलिक स्थिती अशी आहे की बचाव कार्य चालवण्यात खूप अडचणी येत आहेत. 12 एप्रिल रोजी सकाळी कारवाई सुरू झाल्यानंतर काही तासांतच उर्वरित सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

चार ट्रॉलीमध्ये सुमारे 15 लोक अडकले - देवघरचे जिल्हा दंडाधिकारी मंजुनाथ भजंत्री यांनी सांगितले की, दिवसभर चाललेल्या या कारवाईत वेगवेगळ्या ट्रॉलींमधून ३२ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, सायंकाळी झालेल्या अपघातामुळे एकाला जीव गमवावा लागला. त्यांनी सांगितले की, सध्या चार ट्रॉलीमध्ये सुमारे 15 लोक अडकले आहेत.

चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई - जिल्हाधिकारी मंजुनाथ भजंत्री यांनी सांगितले की, अजूनही अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर कसे काढायचे हा प्रशासनाचा पहिला प्रयत्न आहे. ते म्हणाले की, १० एप्रिल रोजी अपघात झाल्यापासून संपूर्ण प्रशासन बचावकार्यात गुंतले आहे. या अपघाताची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

रांची येथील वायुसेनेची टीम गुंतलेली आहे - याशिवाय हवाई दलाचा एक कमांडोही ट्रॉलीमध्ये अडकला आहे. वास्तविक, तो बचावकार्यासाठी ट्रॉलीमध्ये आला होता. तसेच, 10 एप्रिल रोजी संध्याकाळी घडलेल्या घटनेनंतर लगेचच एनडीआरएफ टीम तसेच लष्कराच्या मदतीची मागणी करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावर तातडीने कारवाई करत केंद्र सरकारने सकाळपासूनच हवाई दल तसेच लष्कर आणि आयटीबीपीची टीम तैनात केली होती. त्यांनी सांगितले की, या ऑपरेशनमध्ये पश्चिम बंगालच्या खडकपूर एअरवेजसह रांची येथील वायुसेनेची टीम गुंतलेली आहे.

हेही वाचा - Tesco warehouse fire In Telangana : तेलंगणातील टेस्को गोदामाला भीषण आग; सुमारे ३५ कोटींचे नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.