ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 7 हजार 500 जनऔषधी केंद्रांचे उद्घाटन - Jan Aushadhi Diwas

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी’ परियोजनेच्या लार्भाथ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी 7 हजार 500 व्या जनऔषधी केंद्राचं लोकार्पण केलं.

मोदी
मोदी
author img

By

Published : Mar 7, 2021, 11:09 AM IST

नवी दिल्ली - देशभरात 1 ते 7 मार्च हा आठवडा ‘जनऔषधी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. लोकांना स्वस्त दरात गुणवत्तापूर्ण औषधं मिळावीत यासाठी जनऔषधी योजना सुरु करण्यात आली आहे. त्याबाबत जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी’ परियोजनेच्या लार्भाथ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी 7 हजार 500 व्या जनऔषधी केंद्राचं लोकार्पण केलं.

शिलाँग इथल्या इंदिरा गांधी आरोग्य आणि आयुर्विज्ञान क्षेत्रिय केंद्रात हे व्या जनऔषधी केंद्र उभारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनऔषधी दिवस कार्यक्रमात सहभागी झाले.

औषधी महाग होत आहेत. यासाठी जनऔषधी योजनेची सुरवात केली. या योजनेमुळे गरिबांना औषधे उपलब्ध होतील. त्यांचे पैसे वाचतील. लोकांनी जास्तीत जास्त औषधे जनऔषधी केंद्रातून खरेदी करावीत, असे आवाहन मोदींनी केले.

देशभर जनऔषधी केंद्र -

डॉक्टरांनी दिलेला कोर्स रुग्ण पैशाअभावी पूर्ण करत नाहीत. परिणामी रुग्णांचे आजार बळावतात, असे निदर्शनास आले आहे . त्यामुळे काँग्रेसच्या काळात पंतप्रधान जनऔषधी योजना सुरू करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला गती देत देशभर जनऔषधी केंद्र उभारण्यास प्रोत्साहन दिले. त्यानुसार गेल्या काही वर्षांत भारतासह महाराष्ट्रात जनऔषधी केंद्राची संख्या वाढत चालली आहे.

नवी दिल्ली - देशभरात 1 ते 7 मार्च हा आठवडा ‘जनऔषधी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. लोकांना स्वस्त दरात गुणवत्तापूर्ण औषधं मिळावीत यासाठी जनऔषधी योजना सुरु करण्यात आली आहे. त्याबाबत जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी’ परियोजनेच्या लार्भाथ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी 7 हजार 500 व्या जनऔषधी केंद्राचं लोकार्पण केलं.

शिलाँग इथल्या इंदिरा गांधी आरोग्य आणि आयुर्विज्ञान क्षेत्रिय केंद्रात हे व्या जनऔषधी केंद्र उभारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनऔषधी दिवस कार्यक्रमात सहभागी झाले.

औषधी महाग होत आहेत. यासाठी जनऔषधी योजनेची सुरवात केली. या योजनेमुळे गरिबांना औषधे उपलब्ध होतील. त्यांचे पैसे वाचतील. लोकांनी जास्तीत जास्त औषधे जनऔषधी केंद्रातून खरेदी करावीत, असे आवाहन मोदींनी केले.

देशभर जनऔषधी केंद्र -

डॉक्टरांनी दिलेला कोर्स रुग्ण पैशाअभावी पूर्ण करत नाहीत. परिणामी रुग्णांचे आजार बळावतात, असे निदर्शनास आले आहे . त्यामुळे काँग्रेसच्या काळात पंतप्रधान जनऔषधी योजना सुरू करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला गती देत देशभर जनऔषधी केंद्र उभारण्यास प्रोत्साहन दिले. त्यानुसार गेल्या काही वर्षांत भारतासह महाराष्ट्रात जनऔषधी केंद्राची संख्या वाढत चालली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.