ETV Bharat / bharat

केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस डाव्या आघाडीसोबतच; मतभेद नाहीत - मुख्यमंत्री विजयन

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आमचा काही वाद नाही, एनसीपी आजही डाव्या लोकशाही आघाडीचा भाग आहे. प्रफुल्ल पटेल यांनी माझ्याशी फोनवरून संपर्क साधत चर्चा केली आहे. ते लवकरच केरळला येऊन भेट देतील, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली. एलडीएफने अद्याप तरी जागा वाटपावर चर्चा सुरू केली नसल्याही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

author img

By

Published : Feb 11, 2021, 1:34 PM IST

kerala elction
आमदार कप्पन आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन

तिरुअनंतपुरम - केरळ विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सध्या तिथे माकपाच्या नेतृत्वात डावे पक्ष सत्तारुढ आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्याही तीन आमदारांचा ही समावेश आहे. डाव्यासोबत राहून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीत आता पाला मतदारसंघावरून एलडीएफ सोबत मतभेद सुरु झाल्याच्या चर्चा माध्यमातून सुरू झाल्या आहेत.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आमचा काही वाद नाही, एनसीपी आजही डाव्या लोकशाही आघाडीचा भाग आहे. प्रफुल्ल पटेल यांनी माझ्याशी फोनवरून संपर्क साधत चर्चा केली आहे. ते लवकरच केरळला येऊन भेट देतील, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली. एलडीएफने अद्याप तरी जागा वाटपावर चर्चा सुरू केली नसल्याही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आमदार कप्पन यांना पक्षाचा निर्णय मान्य-

पालाचे आमदार आणि त्यांचा समर्थक गट हा एलडीएफ सोडून यूडीएफच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, सध्या ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्या फक्त माध्यमांनी सुरू केलेल्या आहेत. मी पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेईल, त्याचे पालन करेन. तसेच जर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने सध्या राष्ट्रवादीकडे असलेली पालाची जागा केरळ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर तेही मला मान्य असल्याची माहिती पाला मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार मणी सी कप्पन यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

केरळ काँग्रेस(मणी) नेते जोस के. मणी हे सध्या पाला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे आहे. जोस के मणी यांनी नुकताच राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या यूडीएफमध्ये असताना ही खासदारकी मिळवली होती. त्यानंतर आता त्यांनी एलडीएफच्या वाजूने आपले मत व्यक्त केले आहे.

२०१८ मध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांनी केरळ काँग्रेसला यूडीएफ सहभागी करण्यासाठी राज्यसभेची ऑफर दिली होती. त्यावेळी पालाचे आमदार असलेले दिवंगत नेते के एम मणी यांनी या प्रस्तावाला तत्काळ होकार दिला आणि स्वत;च्या मुलाला म्हणजे जोसे के मणी यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, वडील के एम मणी यांच्या निधनानंतर जोस यांनी यूडीएफची साथ सोडली आणि एलडीएफडी हात मिळवणी केली आहे. आता त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नशिब आजमावयचे आहे. तसेच त्यांनी पाल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

केरळा काँग्रेसचे नेते जोस मणी यांच्या या निर्णयामुळे आता राष्ट्रवादीमध्ये अडचण निर्माण झाली आहे. कारण तब्बल पाच दशकानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पाला मतदार संघ केरळ काँग्रेसकडून खेचून आणला आहे. केरळ काँग्रेसचे नेते के एम मणी यांच्या निधनानंतर २०१९ मध्ये झालेल्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादीने या जागेवर विजय मिळवला होता. आता या ठिकाणी राष्ट्रवादीचे मणी सी कप्पन हे आमदार आहेत.

आता जोस मणी यांच्या निवडणुकीच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष टी.पी. पितांम्बरन आणि आमदार कप्पन एलडीएफची साथ सोडून यूडीएफकडे जाण्याच्या विचाराधीन आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे एकमेव मंत्री ए.के. ससिंद्रन हे एलडीएफसोबत ठाम आहेत. ए के ससिंद्रन सध्या केरळ सरकारमध्ये परिवहन मंत्री आहेत.

या सर्व घडामोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही गटांसोबत चर्चा केली आहे. यावेळी शरद पवार यांनी पाला मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत न सोडण्याचे मत व्यक्त केल्याचे सुत्रांकडून समजते.

या सर्व चर्चेनंतर केरळचे मुख्यमंत्री माकप नेते पिनराई यांनी मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस यूडीएफसोबत जाणार नसून आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

२०१६ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन आमदार विजयी-

गत निवडणुकीत केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले होते. कुट्टनाड मतदारसंघातून थॉमस चांडी यांनी ४,८९१ मतांनी विजय मिळवला होता. तर दुसरीकडे इलथूर मतदारसंघातून ए.के.ससींद्रन यांनीही जेडीयूच्या किशन चंद यांचा तब्बल २९ हजार ५७ मतांनी पराभव केला होता.

तिरुअनंतपुरम - केरळ विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सध्या तिथे माकपाच्या नेतृत्वात डावे पक्ष सत्तारुढ आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्याही तीन आमदारांचा ही समावेश आहे. डाव्यासोबत राहून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीत आता पाला मतदारसंघावरून एलडीएफ सोबत मतभेद सुरु झाल्याच्या चर्चा माध्यमातून सुरू झाल्या आहेत.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आमचा काही वाद नाही, एनसीपी आजही डाव्या लोकशाही आघाडीचा भाग आहे. प्रफुल्ल पटेल यांनी माझ्याशी फोनवरून संपर्क साधत चर्चा केली आहे. ते लवकरच केरळला येऊन भेट देतील, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली. एलडीएफने अद्याप तरी जागा वाटपावर चर्चा सुरू केली नसल्याही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आमदार कप्पन यांना पक्षाचा निर्णय मान्य-

पालाचे आमदार आणि त्यांचा समर्थक गट हा एलडीएफ सोडून यूडीएफच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, सध्या ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्या फक्त माध्यमांनी सुरू केलेल्या आहेत. मी पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेईल, त्याचे पालन करेन. तसेच जर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने सध्या राष्ट्रवादीकडे असलेली पालाची जागा केरळ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर तेही मला मान्य असल्याची माहिती पाला मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार मणी सी कप्पन यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

केरळ काँग्रेस(मणी) नेते जोस के. मणी हे सध्या पाला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे आहे. जोस के मणी यांनी नुकताच राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या यूडीएफमध्ये असताना ही खासदारकी मिळवली होती. त्यानंतर आता त्यांनी एलडीएफच्या वाजूने आपले मत व्यक्त केले आहे.

२०१८ मध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांनी केरळ काँग्रेसला यूडीएफ सहभागी करण्यासाठी राज्यसभेची ऑफर दिली होती. त्यावेळी पालाचे आमदार असलेले दिवंगत नेते के एम मणी यांनी या प्रस्तावाला तत्काळ होकार दिला आणि स्वत;च्या मुलाला म्हणजे जोसे के मणी यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, वडील के एम मणी यांच्या निधनानंतर जोस यांनी यूडीएफची साथ सोडली आणि एलडीएफडी हात मिळवणी केली आहे. आता त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नशिब आजमावयचे आहे. तसेच त्यांनी पाल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

केरळा काँग्रेसचे नेते जोस मणी यांच्या या निर्णयामुळे आता राष्ट्रवादीमध्ये अडचण निर्माण झाली आहे. कारण तब्बल पाच दशकानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पाला मतदार संघ केरळ काँग्रेसकडून खेचून आणला आहे. केरळ काँग्रेसचे नेते के एम मणी यांच्या निधनानंतर २०१९ मध्ये झालेल्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादीने या जागेवर विजय मिळवला होता. आता या ठिकाणी राष्ट्रवादीचे मणी सी कप्पन हे आमदार आहेत.

आता जोस मणी यांच्या निवडणुकीच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष टी.पी. पितांम्बरन आणि आमदार कप्पन एलडीएफची साथ सोडून यूडीएफकडे जाण्याच्या विचाराधीन आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे एकमेव मंत्री ए.के. ससिंद्रन हे एलडीएफसोबत ठाम आहेत. ए के ससिंद्रन सध्या केरळ सरकारमध्ये परिवहन मंत्री आहेत.

या सर्व घडामोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही गटांसोबत चर्चा केली आहे. यावेळी शरद पवार यांनी पाला मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत न सोडण्याचे मत व्यक्त केल्याचे सुत्रांकडून समजते.

या सर्व चर्चेनंतर केरळचे मुख्यमंत्री माकप नेते पिनराई यांनी मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस यूडीएफसोबत जाणार नसून आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

२०१६ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन आमदार विजयी-

गत निवडणुकीत केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले होते. कुट्टनाड मतदारसंघातून थॉमस चांडी यांनी ४,८९१ मतांनी विजय मिळवला होता. तर दुसरीकडे इलथूर मतदारसंघातून ए.के.ससींद्रन यांनीही जेडीयूच्या किशन चंद यांचा तब्बल २९ हजार ५७ मतांनी पराभव केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.