ETV Bharat / bharat

ये क्या जादू हो रहा है राहुल जी? VIDEO शेअर करत जेपी नड्डांचा हल्लाबोल

भाजपाचे राष्ट्रध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राहुल गांधींचा एक जुना व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर हल्लाबोल केला. त्यासोबत, ये क्या जादू हो रहा है राहुलजी? असा प्रश्न नड्डा यांनी केला.

author img

By

Published : Dec 27, 2020, 4:06 PM IST

नड्डा-राहुल
नड्डा-राहुल

नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी कृषी कायद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. यावर आज भाजपाचे राष्ट्रध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राहुल गांधींचा एक जुना व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर हल्लाबोल केला. त्यासोबत, ये क्या जादू हो रहा है राहुलजी? असा प्रश्न नड्डा यांनी केला.

राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर ढोंगीपणाचा आरोप केला आहे. यापूर्वी तुम्ही जी भूमिका घेतली होती. तीच भूमिका आता का बदलत आहात, असा सवाल त्यांनी केला. देशाचे हित, शेतकऱ्यांचे हित, याबाबत तुम्हाला काही देणे-घेणे नाही. तुम्हाला फक्त राजकारण करायचे आहे. मात्र, येथून पुढे अशी ढोंगबाजी चालणार नाही. देशातील जनतेने तुमचा दुटप्पीपणा पाहिला आहे, असे नड्डा म्हणाले.

काय म्हणाले राहुल गांधी व्हिडिओमध्ये -

राहुल गांधी यांचा सभागृहातील एका भाषणाचा जूना व्हिडिओ आहे. यात ते एका मध्य प्रदेशातील एका शेतकऱयाच्या भेटीविषयी सांगत आहेत. मी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होतो. तेव्हा मला एका शेतकऱ्यांने प्रश्न विचारला की, जे बटाट्याचं पीक आम्ही घेतो. ते बटाटा 2 रुपये किलोने विकतो. मात्र, त्याच बटाट्यापासून बनवणारे चिप्स विकत घेण्यासाठी आम्हाला 10 रुपये मोजावे लागतात. आमच्यात आणि कंपन्यांमध्ये थेट व्यवहार होत नसून दलालांमार्फत व्यवहार होतो. त्यामुळेच अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपला माल थेट कंपन्यांना विकता आला पाहिजे, दलालांचं वर्चस्व संपलं पाहिजे असं मत राहुल यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केलं.

शेतकरी आंदोलन -

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने तीन नव्या कृषी कायद्यांना मंजुरी दिली आहे. मात्र, या कायद्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या कायद्यांविरोधात गेल्या 30 दिवसांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत आंदोलन सुरू आहे. हे कायदे तातडीने रद्द करावेत अशी मागणी हे शेतकरी करत आहेत, मात्र गेल्या 30 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या या शेतकऱ्यांची अद्यापही सरकारने दखल घेतलेली नाही. विरोधकांकडून नव्या कृषी कायद्यांबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. कृषी कायद्यावर सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहे. अशी भूमिका केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनावर घेतली आहे.

काय आहेत कृषी कायदे -

गेल्या 17 सप्टेंबरला कृषी विधयेक पास झाली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर त्यांचे कायद्यात रुपांतर झाले. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांपैकी पहिल्या कायद्यांनुसार शेतकऱ्याला देशात कोणत्याही ठिकाणी त्याचा कृषीमाल विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. तर दुसऱ्या कायद्यानुसार शेतकऱ्याने व्यापाऱ्यासोबत केलेल्या कराराला कायदेशीर मान्यता मिळेल. तसेच तिसऱ्या कायद्यामुळे डाळी, तेल बियाणे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यावरील निर्बंध दूर झाले आहेत.

हेही वाचा - पतीचे निधन झाल्याचे समजताच पत्नीचाही मृत्यू

नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी कृषी कायद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. यावर आज भाजपाचे राष्ट्रध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राहुल गांधींचा एक जुना व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर हल्लाबोल केला. त्यासोबत, ये क्या जादू हो रहा है राहुलजी? असा प्रश्न नड्डा यांनी केला.

राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर ढोंगीपणाचा आरोप केला आहे. यापूर्वी तुम्ही जी भूमिका घेतली होती. तीच भूमिका आता का बदलत आहात, असा सवाल त्यांनी केला. देशाचे हित, शेतकऱ्यांचे हित, याबाबत तुम्हाला काही देणे-घेणे नाही. तुम्हाला फक्त राजकारण करायचे आहे. मात्र, येथून पुढे अशी ढोंगबाजी चालणार नाही. देशातील जनतेने तुमचा दुटप्पीपणा पाहिला आहे, असे नड्डा म्हणाले.

काय म्हणाले राहुल गांधी व्हिडिओमध्ये -

राहुल गांधी यांचा सभागृहातील एका भाषणाचा जूना व्हिडिओ आहे. यात ते एका मध्य प्रदेशातील एका शेतकऱयाच्या भेटीविषयी सांगत आहेत. मी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होतो. तेव्हा मला एका शेतकऱ्यांने प्रश्न विचारला की, जे बटाट्याचं पीक आम्ही घेतो. ते बटाटा 2 रुपये किलोने विकतो. मात्र, त्याच बटाट्यापासून बनवणारे चिप्स विकत घेण्यासाठी आम्हाला 10 रुपये मोजावे लागतात. आमच्यात आणि कंपन्यांमध्ये थेट व्यवहार होत नसून दलालांमार्फत व्यवहार होतो. त्यामुळेच अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपला माल थेट कंपन्यांना विकता आला पाहिजे, दलालांचं वर्चस्व संपलं पाहिजे असं मत राहुल यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केलं.

शेतकरी आंदोलन -

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने तीन नव्या कृषी कायद्यांना मंजुरी दिली आहे. मात्र, या कायद्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या कायद्यांविरोधात गेल्या 30 दिवसांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत आंदोलन सुरू आहे. हे कायदे तातडीने रद्द करावेत अशी मागणी हे शेतकरी करत आहेत, मात्र गेल्या 30 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या या शेतकऱ्यांची अद्यापही सरकारने दखल घेतलेली नाही. विरोधकांकडून नव्या कृषी कायद्यांबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. कृषी कायद्यावर सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहे. अशी भूमिका केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनावर घेतली आहे.

काय आहेत कृषी कायदे -

गेल्या 17 सप्टेंबरला कृषी विधयेक पास झाली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर त्यांचे कायद्यात रुपांतर झाले. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांपैकी पहिल्या कायद्यांनुसार शेतकऱ्याला देशात कोणत्याही ठिकाणी त्याचा कृषीमाल विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. तर दुसऱ्या कायद्यानुसार शेतकऱ्याने व्यापाऱ्यासोबत केलेल्या कराराला कायदेशीर मान्यता मिळेल. तसेच तिसऱ्या कायद्यामुळे डाळी, तेल बियाणे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यावरील निर्बंध दूर झाले आहेत.

हेही वाचा - पतीचे निधन झाल्याचे समजताच पत्नीचाही मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.