ETV Bharat / bharat

जेव्हा एका पंतप्रधानाने जनतेला एक वेळ उपाशी राहण्याचे केले आवाहन अन् जनतेनेही आनंदाने स्वीकारले

author img

By

Published : Oct 2, 2021, 6:10 AM IST

माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची आज 2 ऑक्टोबर जयंती. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांच्या निधनानंतर लाल बहादुर शास्त्री देशाचे दूसरे पीएम बनले. त्यांनी देशवासीयांना जय जवान जय किसान असा नारा दिला. त्यांच्या जयंतीदिनी जाणून घेऊया त्यांचे विचार व त्यांच्या जीवनकार्याविषयी..

lal bahudur shahstri
lal bahudur shahstri

हैदराबाद - माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची आज 2 ऑक्टोबर जयंती. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेश राज्यातील मुगलसराय येथे 1904 मध्ये झाला. ते 1920 मध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली. त्याचसोबत 1921 चे असहकार आंदोलन, 1930 ची दांडी यांत्रा आणि 1942 मध्ये सुरु करण्यात आलेले भारत छोडो आंदोलन यात त्यांची विशेष सहभाग राहिला आहे. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान पंडित जवारहलाल नेहरु यांच्या निधनानंतर देशाचे दुसरे पंतप्रधान झाले. पंतप्रधान असताना त्यांनी 'जय जवान, जय किसान' हा नारा दिला.

2 ऑक्टोबर रोजी भारतातील दोन महान नेत्यांचा जन्मदिवस असतो. याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचीही जयंती असते तर देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचा जन्मदिवसही याच दिवशी असतो.

लाल बहादुर शास्त्रींचा जीवन परिचय -

लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तरप्रदेश राज्यातील मुगलसराय येथे झाला होता. त्यांनी काशी विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. 1928 मध्ये त्यांचा विवाह ललिता यांच्याशी झाला. त्यांना एकूण सहा मुले झाली. त्यामध्ये दोन मुली कुसुम आणि सुमन व चार मुले हरिकृष्ण, अनिल, सुनील व अशोक आहेत.

शास्त्रीजी नऊ वेळा गेले आहेत तरुंगात -

स्वतंत्र्य संग्रामात लाल बहादुर शास्त्री अनेक वेळा तुरुंगात गेले होते. 1930 मध्ये मीठ सत्याग्रहात त्यांना अडीच वर्षे तरुंगवास झाला होता. त्यानंतर त्यांना 1942 च्या भारत छोड़ो आंदोलनादरम्यान चार वर्षे तुरुंगवास झाला. जीवनात त्यांना एकूण 9 वेळा तुरुंगवारी करावी लागली.

पंडित नेहरूनंतर पंतप्रधान पदाची माळ पडली शास्त्रीजींच्या गळ्यात -

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांच्या निधनानंतर लाल बहादुर शास्त्री देशाचे दूसरे पीएम बनले. त्यांनी देशवासीयांना जय जवान जय किसान असा नारा दिला. पंडित नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान पदासासाठी लाल बहादुर शास्त्री आणि मोरारजी देसाई यांची नावे सर्वात पुढे होती. मात्र पंतप्रधान पदाची माळ शास्त्रीजींच्या गळ्यात पडली व त्यांनी ही जबाबदारी खूपच चांगल्या पद्धतीने निभावली. 9 जून 1964 रोजी लाल बहादुर शास्त्री यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.

पंतप्रधान बनल्यानंतर अनेक आव्हानांचा सामना -

जेव्हा शास्त्री पंतप्रधान बनले तेव्हा देशात अन्नधान्याची कमी एक मोठे आव्हान होते. त्यावेळी अन्नधान्यासाठी भारत अमेरिकेवर अवलंबून होता. त्यांनी आपल्या पहिल्याच संबोधनात देशात खाद्यान्न मुल्यांची वृद्धी रोखण्याला प्राधान्य असल्याचे सांगितले. त्याचवेळी 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता.

जय जवान, जय किसान चा नारा -

पाकिस्तानशी सुरू असलेल्या युद्धावेळी देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. त्याचवेळी देशाला आत्मविश्वास देण्यासाठी शास्त्रींनी 'जय जवान, जय किसान ' चा नारा दिला होता. अन्नाच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या देशाला रुळावर आणण्यासाठी त्यांनी देशवासीयांना आवाहन केले की, एक वेळचे जेवण त्याग करा, हे आवाहन जनतेने खुशी-खुशी स्वीकारले.

ताश्कंद करारानंतर अचानक मृत्यू -

1965 च्या युद्धावेळी शास्त्रींचे नेतृत्व प्रखरतेने उभरले होते. त्यानंतर अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर भारतावर युद्ध समाप्त करण्याचा दबाव वाढत गेला. शास्त्रीजींना रशियामध्ये बोलवले गेले. करारादरम्यान शास्त्रींनी सर्व अटी मानल्या मात्र ते पाकिस्तानला जमीन परत करण्यासाठी तयार नव्हते. मात्र त्यांच्यावर जबाव वाढवून 10 जानेवराी 1966 रोजी ताश्कंद करारपत्रावर स्वाक्षरी घेण्यात आली. मात्र त्यानंतर काही तासातच 11 जानेवारी 1966 च्या रात्री त्यांचा मृत्यू झाला.

लालबहादुर शास्त्री काशी विद्यापीठात गेले. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव 'शास्त्री' असे होते. विशेष म्हणजे पुढे त्यांनाच शास्त्री या नावाने म्हणजे पदीवीनेच ओळखले जाऊ लागले.

लाल बहादुर शास्त्रींच्या जयंतीदिवशी त्यांचे 10 विचार ( Lal Bahadur Shastri Slogans ) -

'आपण राहू किंवा न राहू देश मजबूत राहिला पाहिजे व झेंडा डौलाने फडकला पाहिजे

देशाविषयीची निष्ठा सर्व प्रकारच्या निष्ठांच्या आधी येते. कारण हीच खरी निष्ठा असते कारण कोणी असा विचार करत नाही की, त्या बदल्यात आपल्याला काय मिळते.

''आम्ही केवळ स्वत:चा नाही तर संपूर्ण जगाची शांती, विकास आणि कल्याणमध्ये विश्वास ठेवतो'

'जर एखादा व्यक्ती आपल्या देशात अस्पृश्य म्हटला जात असेत तर भारताला आपली मान शरमेने खाली घालावी लागेल.'

' जर मी एक हुमूकशाह असतो तर धर्म व राष्ट्र वेग-वेगळे असते. मी धर्मासाठी आपला जीवही देईन मात्र हे माझे खासगी जीवन आहे. राष्ट्राशी याचा संबंध नाही'

''लोकांना खरी लोकशाही व स्वराज्य कधीही हिंसेने व असत्याने प्राप्त होणार नाही''

''देशाच्या विकासासाठी आपल्याला आपापसात लढण्यापेक्षा गरिबी, रोगराई व अज्ञानाशी लढावे लागेल'

-'स्वातंत्र्याचे रक्षण केवळ सैनिकांचे काम नाही, संपूर्ण देशाला मजबूत व्हावे लागेल'

-''जे सत्तेत आहेत, त्यांनी पाहिले पाहिजे की, लोक प्रशासनाबाबत काय प्रतिक्रिया व्यक्त करतात. शेवटी जनताच प्रमुख आहे '

'भलेही आपल्याला देशाचे स्वातंत्र्य पाहिजे, मात्र त्यासाठी आपण कोणाचा शोषण केले पाहिजे व न ही दुसऱ्या देशाला कमी लेखले पाहिजे.'

हैदराबाद - माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची आज 2 ऑक्टोबर जयंती. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेश राज्यातील मुगलसराय येथे 1904 मध्ये झाला. ते 1920 मध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली. त्याचसोबत 1921 चे असहकार आंदोलन, 1930 ची दांडी यांत्रा आणि 1942 मध्ये सुरु करण्यात आलेले भारत छोडो आंदोलन यात त्यांची विशेष सहभाग राहिला आहे. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान पंडित जवारहलाल नेहरु यांच्या निधनानंतर देशाचे दुसरे पंतप्रधान झाले. पंतप्रधान असताना त्यांनी 'जय जवान, जय किसान' हा नारा दिला.

2 ऑक्टोबर रोजी भारतातील दोन महान नेत्यांचा जन्मदिवस असतो. याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचीही जयंती असते तर देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचा जन्मदिवसही याच दिवशी असतो.

लाल बहादुर शास्त्रींचा जीवन परिचय -

लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तरप्रदेश राज्यातील मुगलसराय येथे झाला होता. त्यांनी काशी विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. 1928 मध्ये त्यांचा विवाह ललिता यांच्याशी झाला. त्यांना एकूण सहा मुले झाली. त्यामध्ये दोन मुली कुसुम आणि सुमन व चार मुले हरिकृष्ण, अनिल, सुनील व अशोक आहेत.

शास्त्रीजी नऊ वेळा गेले आहेत तरुंगात -

स्वतंत्र्य संग्रामात लाल बहादुर शास्त्री अनेक वेळा तुरुंगात गेले होते. 1930 मध्ये मीठ सत्याग्रहात त्यांना अडीच वर्षे तरुंगवास झाला होता. त्यानंतर त्यांना 1942 च्या भारत छोड़ो आंदोलनादरम्यान चार वर्षे तुरुंगवास झाला. जीवनात त्यांना एकूण 9 वेळा तुरुंगवारी करावी लागली.

पंडित नेहरूनंतर पंतप्रधान पदाची माळ पडली शास्त्रीजींच्या गळ्यात -

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांच्या निधनानंतर लाल बहादुर शास्त्री देशाचे दूसरे पीएम बनले. त्यांनी देशवासीयांना जय जवान जय किसान असा नारा दिला. पंडित नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान पदासासाठी लाल बहादुर शास्त्री आणि मोरारजी देसाई यांची नावे सर्वात पुढे होती. मात्र पंतप्रधान पदाची माळ शास्त्रीजींच्या गळ्यात पडली व त्यांनी ही जबाबदारी खूपच चांगल्या पद्धतीने निभावली. 9 जून 1964 रोजी लाल बहादुर शास्त्री यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.

पंतप्रधान बनल्यानंतर अनेक आव्हानांचा सामना -

जेव्हा शास्त्री पंतप्रधान बनले तेव्हा देशात अन्नधान्याची कमी एक मोठे आव्हान होते. त्यावेळी अन्नधान्यासाठी भारत अमेरिकेवर अवलंबून होता. त्यांनी आपल्या पहिल्याच संबोधनात देशात खाद्यान्न मुल्यांची वृद्धी रोखण्याला प्राधान्य असल्याचे सांगितले. त्याचवेळी 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता.

जय जवान, जय किसान चा नारा -

पाकिस्तानशी सुरू असलेल्या युद्धावेळी देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. त्याचवेळी देशाला आत्मविश्वास देण्यासाठी शास्त्रींनी 'जय जवान, जय किसान ' चा नारा दिला होता. अन्नाच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या देशाला रुळावर आणण्यासाठी त्यांनी देशवासीयांना आवाहन केले की, एक वेळचे जेवण त्याग करा, हे आवाहन जनतेने खुशी-खुशी स्वीकारले.

ताश्कंद करारानंतर अचानक मृत्यू -

1965 च्या युद्धावेळी शास्त्रींचे नेतृत्व प्रखरतेने उभरले होते. त्यानंतर अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर भारतावर युद्ध समाप्त करण्याचा दबाव वाढत गेला. शास्त्रीजींना रशियामध्ये बोलवले गेले. करारादरम्यान शास्त्रींनी सर्व अटी मानल्या मात्र ते पाकिस्तानला जमीन परत करण्यासाठी तयार नव्हते. मात्र त्यांच्यावर जबाव वाढवून 10 जानेवराी 1966 रोजी ताश्कंद करारपत्रावर स्वाक्षरी घेण्यात आली. मात्र त्यानंतर काही तासातच 11 जानेवारी 1966 च्या रात्री त्यांचा मृत्यू झाला.

लालबहादुर शास्त्री काशी विद्यापीठात गेले. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव 'शास्त्री' असे होते. विशेष म्हणजे पुढे त्यांनाच शास्त्री या नावाने म्हणजे पदीवीनेच ओळखले जाऊ लागले.

लाल बहादुर शास्त्रींच्या जयंतीदिवशी त्यांचे 10 विचार ( Lal Bahadur Shastri Slogans ) -

'आपण राहू किंवा न राहू देश मजबूत राहिला पाहिजे व झेंडा डौलाने फडकला पाहिजे

देशाविषयीची निष्ठा सर्व प्रकारच्या निष्ठांच्या आधी येते. कारण हीच खरी निष्ठा असते कारण कोणी असा विचार करत नाही की, त्या बदल्यात आपल्याला काय मिळते.

''आम्ही केवळ स्वत:चा नाही तर संपूर्ण जगाची शांती, विकास आणि कल्याणमध्ये विश्वास ठेवतो'

'जर एखादा व्यक्ती आपल्या देशात अस्पृश्य म्हटला जात असेत तर भारताला आपली मान शरमेने खाली घालावी लागेल.'

' जर मी एक हुमूकशाह असतो तर धर्म व राष्ट्र वेग-वेगळे असते. मी धर्मासाठी आपला जीवही देईन मात्र हे माझे खासगी जीवन आहे. राष्ट्राशी याचा संबंध नाही'

''लोकांना खरी लोकशाही व स्वराज्य कधीही हिंसेने व असत्याने प्राप्त होणार नाही''

''देशाच्या विकासासाठी आपल्याला आपापसात लढण्यापेक्षा गरिबी, रोगराई व अज्ञानाशी लढावे लागेल'

-'स्वातंत्र्याचे रक्षण केवळ सैनिकांचे काम नाही, संपूर्ण देशाला मजबूत व्हावे लागेल'

-''जे सत्तेत आहेत, त्यांनी पाहिले पाहिजे की, लोक प्रशासनाबाबत काय प्रतिक्रिया व्यक्त करतात. शेवटी जनताच प्रमुख आहे '

'भलेही आपल्याला देशाचे स्वातंत्र्य पाहिजे, मात्र त्यासाठी आपण कोणाचा शोषण केले पाहिजे व न ही दुसऱ्या देशाला कमी लेखले पाहिजे.'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.