ETV Bharat / bharat

India vs Sri Lanka : विराट फटेबाजीने सामना जिंकला! भारताकडून श्रीलंकेचा ६७ धावांनी पराभव - गुवाहाटी येथील एसीए स्टेडियमवर एकदिवसीय सामना

या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज गुवाहाटी येथील एसीए स्टेडियमवर खेळवला जात आहे. (India vs Sri Lanka ) या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दुखापतीनंतर रोहित शर्माने 41 चेंडूत अर्धशतक झळकावून शानदार पुनरागमन केले आहे. रोहित शर्माने 13व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.

India vs Sri Lanka
भारताकडून श्रीलंकेचा ६७ धावांनी पराभव
author img

By

Published : Jan 10, 2023, 4:37 PM IST

Updated : Jan 10, 2023, 10:12 PM IST

गुवाहाटी : भारताने श्रीलंकेचा ६७ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 373 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 306 धावाच करू शकला. श्रीलंकेकडून कर्णधार दासुन शनाकाने सर्वाधिक 108 धावा केल्या. (Barsapara Cricket Stadium Guwahati) त्याचवेळी भारताकडून उमरान मलिकने तीन विकेट घेतल्या. त्याचवेळी विराट कोहलीने पहिल्या डावात शतक झळकावले त्यामुळे विजयाकडे घोडदौड करणे सोपे गेले.

भारताने 373 धावांची खेळी : नाणेफेक हरल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सामना सुरू झाल्यानंतर भारताने चांगली सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने शतकी भागीदारी केली. गिल ७० आणि रोहित ८३ धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहलीने 113 धावा करत सामन्यात मोठी भागेदारी केली. या तिन्ही फलंदाजांच्या शानदार योगदानामुळे भारताने 373 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

108 धावांवर नाबाद : यानंतर प्रत्युत्तरात श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावल्यानंतर श्रीलंकेला पुनरागमन करणे कठीण झाले. यामध्ये निशांक 72 धावा करून बाद झाला. दरम्यान, धनंजय डिसिल्वाने 47 धावा केल्या, पण त्या पुरेशा ठरल्या नाहीत. शेवटी, दासुन शनाकाने 108 धावांची खेळी केली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता अशी परिस्थिती होती. शनाका एका टोकाला 108 धावांवर नाबाद राहिला, पण श्रीलंकेचा सामना 67 धावांनी गमवावा लागला.

टीम इंडियाचा विजय : या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकानेही शतक झळकावले. त्याने 88 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या, पण त्याची खेळी श्रीलंकेसाठी कामी आली नाही. श्रीलंकेच्या धावसंख्येने आठ विकेट गमावून 300 धावांचा टप्पा ओलांडला असला तरी टीम इंडियाचा विजय झाला.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), 2 शुभमन गिल, 3 विराट कोहली, 4 केएल राहुल (यष्टीरक्षक), 5 श्रेयस अय्यर, 6 हार्दिक पंड्या, 7 अक्षर पटेल, 8 युझवेंद्र चहल, 9 मोहम्मद सिराज, 10 मोहम्मद शमी, 11 उमरान मलिक

श्रीलंकेचा संघ : 1 कुसल मेंडिस (विकेटकीपर), 2 पाथुम निसांका, 3 अविष्का फर्नांडो, 4 धनंजया डी सिल्वा, 5 चरित अस्लंका, 6 दासुन शनाका (क), 7 वानिंदू हसरंगा, 8 चमिका करुणारत्ने, 9 दुनिथ काजुएला, 10 विकेट , 11 दिलशान मधुशंका

गुवाहाटी : भारताने श्रीलंकेचा ६७ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 373 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 306 धावाच करू शकला. श्रीलंकेकडून कर्णधार दासुन शनाकाने सर्वाधिक 108 धावा केल्या. (Barsapara Cricket Stadium Guwahati) त्याचवेळी भारताकडून उमरान मलिकने तीन विकेट घेतल्या. त्याचवेळी विराट कोहलीने पहिल्या डावात शतक झळकावले त्यामुळे विजयाकडे घोडदौड करणे सोपे गेले.

भारताने 373 धावांची खेळी : नाणेफेक हरल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सामना सुरू झाल्यानंतर भारताने चांगली सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने शतकी भागीदारी केली. गिल ७० आणि रोहित ८३ धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहलीने 113 धावा करत सामन्यात मोठी भागेदारी केली. या तिन्ही फलंदाजांच्या शानदार योगदानामुळे भारताने 373 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

108 धावांवर नाबाद : यानंतर प्रत्युत्तरात श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावल्यानंतर श्रीलंकेला पुनरागमन करणे कठीण झाले. यामध्ये निशांक 72 धावा करून बाद झाला. दरम्यान, धनंजय डिसिल्वाने 47 धावा केल्या, पण त्या पुरेशा ठरल्या नाहीत. शेवटी, दासुन शनाकाने 108 धावांची खेळी केली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता अशी परिस्थिती होती. शनाका एका टोकाला 108 धावांवर नाबाद राहिला, पण श्रीलंकेचा सामना 67 धावांनी गमवावा लागला.

टीम इंडियाचा विजय : या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकानेही शतक झळकावले. त्याने 88 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या, पण त्याची खेळी श्रीलंकेसाठी कामी आली नाही. श्रीलंकेच्या धावसंख्येने आठ विकेट गमावून 300 धावांचा टप्पा ओलांडला असला तरी टीम इंडियाचा विजय झाला.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), 2 शुभमन गिल, 3 विराट कोहली, 4 केएल राहुल (यष्टीरक्षक), 5 श्रेयस अय्यर, 6 हार्दिक पंड्या, 7 अक्षर पटेल, 8 युझवेंद्र चहल, 9 मोहम्मद सिराज, 10 मोहम्मद शमी, 11 उमरान मलिक

श्रीलंकेचा संघ : 1 कुसल मेंडिस (विकेटकीपर), 2 पाथुम निसांका, 3 अविष्का फर्नांडो, 4 धनंजया डी सिल्वा, 5 चरित अस्लंका, 6 दासुन शनाका (क), 7 वानिंदू हसरंगा, 8 चमिका करुणारत्ने, 9 दुनिथ काजुएला, 10 विकेट , 11 दिलशान मधुशंका

Last Updated : Jan 10, 2023, 10:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.