ETV Bharat / bharat

Govt Bans 54 Chinese Apps : पुन्हा एकदा चीनला दणका; आणखी 54 अ‌ॅप्सवर बंदी

author img

By

Published : Feb 14, 2022, 12:22 PM IST

चीनच्या 54 अॅप्सवर भारत सरकारने बंदी ( Govt Bans 54 Chinese Apps ) घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या अॅप्समुळे भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका असल्याचे कारण देत या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येत असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले.

चीनी अॅप्सवर बंदी
Govt Bans 54 Chinese Apps

नवी दिल्ली - चीनच्या आडमुठ्या व हेकेखोर स्वभावामुळे दोन्ही देशांदरम्यान सीमेवर तणाव कायम असल्याचे दिसून येत आहे. यातच मोठी बातमी समोर येत आहे. चीनच्या 54 अॅप्सवर भारत सरकारने बंदी ( Govt Bans 54 Chinese Apps ) घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या अॅप्समुळे भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका असल्याचे कारण देत या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येत असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले.

  • Govt of India to ban 54 Chinese apps that pose a threat to India’s security: Sources

    — ANI (@ANI) February 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बॅन करण्यात येत असलेले हे 54 चीनी अॅप कथितपणे युजर्सकडून विविध परवानग्या घेतात आणि संवेदनशील डेटा संकलित करतात. संकलित केलेल्या रीअल-टाइम डेटाचा गैरवापर केला जात असल्याचे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

बंदी घातलेल्या अॅप्सच्या यादीमध्ये -

स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा - सेल्फी कॅमेरा, गॅरेना फ्री फायर - इल्युमिनेट, व्हिवा व्हिडिओ एडिटर, टेनसेंट एक्सरिव्हर, ऑनम्योजी अरेना, अॅपलॉक आणि ड्युअल स्पेस लाइट यांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशानुसार हे अ‌ॅप्स प्लेस्टोरवरून हटवण्यात येत आहेत.

यापूर्वी केले होते अ‌ॅप बॅन -

सरकारने 29 जून 2020 ला टिकटॉक, यूसी ब्राऊजर, कॅम स्कॅनर अशा 59 चिनी अ‌ॅप्सवर देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षिततेला धोका असल्याचे कारण देत बंदी घातली होती. त्यानंतर पुन्हा अशाच आणखी 47 अ‌ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा 54 अॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अंतर्गत अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले होते. चीनसोबत सीमा तणाव निर्माण झाल्यानंतर मे 2020 पासून आतापर्यंत भारताकडून जवळपास 300 अॅप्स ब्लॉक करण्यात आली आहेत.

पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली येथे चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. त्यानंतर 29 जून 2020 मध्ये चीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. भारताच्या या कारवाईने चीनला चांगलाच दणका बसला होता. चीनने भारताच्या या निर्णयाचा विरोध केला होता.

हेही वाचा - 59 अ‌ॅप्सच्या बंदीवर चीनने व्यक्त केली चिंता; म्हणाले...

नवी दिल्ली - चीनच्या आडमुठ्या व हेकेखोर स्वभावामुळे दोन्ही देशांदरम्यान सीमेवर तणाव कायम असल्याचे दिसून येत आहे. यातच मोठी बातमी समोर येत आहे. चीनच्या 54 अॅप्सवर भारत सरकारने बंदी ( Govt Bans 54 Chinese Apps ) घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या अॅप्समुळे भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका असल्याचे कारण देत या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येत असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले.

  • Govt of India to ban 54 Chinese apps that pose a threat to India’s security: Sources

    — ANI (@ANI) February 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बॅन करण्यात येत असलेले हे 54 चीनी अॅप कथितपणे युजर्सकडून विविध परवानग्या घेतात आणि संवेदनशील डेटा संकलित करतात. संकलित केलेल्या रीअल-टाइम डेटाचा गैरवापर केला जात असल्याचे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

बंदी घातलेल्या अॅप्सच्या यादीमध्ये -

स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा - सेल्फी कॅमेरा, गॅरेना फ्री फायर - इल्युमिनेट, व्हिवा व्हिडिओ एडिटर, टेनसेंट एक्सरिव्हर, ऑनम्योजी अरेना, अॅपलॉक आणि ड्युअल स्पेस लाइट यांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशानुसार हे अ‌ॅप्स प्लेस्टोरवरून हटवण्यात येत आहेत.

यापूर्वी केले होते अ‌ॅप बॅन -

सरकारने 29 जून 2020 ला टिकटॉक, यूसी ब्राऊजर, कॅम स्कॅनर अशा 59 चिनी अ‌ॅप्सवर देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षिततेला धोका असल्याचे कारण देत बंदी घातली होती. त्यानंतर पुन्हा अशाच आणखी 47 अ‌ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा 54 अॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अंतर्गत अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले होते. चीनसोबत सीमा तणाव निर्माण झाल्यानंतर मे 2020 पासून आतापर्यंत भारताकडून जवळपास 300 अॅप्स ब्लॉक करण्यात आली आहेत.

पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली येथे चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. त्यानंतर 29 जून 2020 मध्ये चीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. भारताच्या या कारवाईने चीनला चांगलाच दणका बसला होता. चीनने भारताच्या या निर्णयाचा विरोध केला होता.

हेही वाचा - 59 अ‌ॅप्सच्या बंदीवर चीनने व्यक्त केली चिंता; म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.