ETV Bharat / bharat

GUJARAT ELECTION 2022: गुजरात विधानसभेसाठी सौराष्ट्रातील 48 जागांवर मोठी भीस्त

author img

By

Published : Nov 3, 2022, 6:33 PM IST

गुजरात विधानसभा निवडणूकीत (GUJARAT ASSEMBLY ELECTION 2022 ) सौराष्ट्रातील 48 जागांवर मोठी भीस्त असणार आहे. ( SAURASHTRA ASSEMBLY SEATS IMPORTANCE) गुजरात पुन्हा जिंकत 27 वर्षांची सत्ता टिकवायची असेल, तर भाजपला सर्व सौराष्ट्रासाठी विशेष रणनीती (All special strategies to BJP) आखावी लागणार आहे. येथील ४८ जागां निर्णायक राहणार आहेत. या भागात काँग्रेसचे वातावरण चांगले आहे. पाहुया तीथले वातावरण.

GUJARAT ELECTION 2022
गुजरात विधानसभा निवडणूक

जुनागड: गुजरात विधानसभा निवडणूकीची (GUJARAT ASSEMBLY ELECTION 2022 ) घोषना झाली. या निवडणुकीत भाजपला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागु शकतो असे काही जाणकारांचे मत आहे. सौराष्ट्रात 48 जागा आहेत, साहजिकच कोणताही पक्ष मोठ्या संख्येने जिंकल्याशिवाय येथे सरकार स्थापन करू शकत नाही. त्यामुळे गुजरातच्या सिंहासनावर बसायचे असेल तर सौराष्ट्रातील (Saurashtra) निकालावर मोठी भिस्त राहणार आहे. सौराष्ट्रातील जागांवर सर्वच पक्षांचा जोर दिसत आहे.

सौराष्ट्रातील बलाबल : 2017 मध्ये शहरी भागावर भाजपचा तर ग्रामीण भागात काँग्रेसचा प्रभाव सिद्ध झाला त्यावेळी अमरेली, मोरबी आणि सोमनाथ जिल्ह्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. जुनागडमधील केशोदच्या 5 पैकी केवळ एक जागा भाजपने जिंकली. तर पोरबंदर आणि बोताड जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रत्येकी एक जागा जिंकली. राजकोटमध्ये भाजपने 8 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. तसेच भावनगर शहरातील 7 पैकी 6 जागा भाजपने जिंकल्या आहेत. या निकालांवरून एक स्पष्ट निष्कर्ष काढला जाऊ शकतो की 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरी मतदारांवर भाजपचा वरचष्मा होता आणि ग्रामीण मतदारांवर काँग्रेसचा.

जातीय समीकरणे: सौराष्ट्रातील विधानसभेच्या 18 जागांवर पाटीदार समाज तर 10 जागांवर कोळी मतदारांचा प्रभाव पहायला मिळतो. याशिवाय गोंडल विधानसभा मतदारसंघात भावनगर आणि जामनगरसह क्षत्रिय दरबार आणि गरासिया राजपूत महत्त्वाचे मानले जातात. कोळी मतदार असतानाही अमरेली जिल्ह्यातील राजुला मतदारसंघातून काँग्रेसचे अहिर उमेदवार अमरीश डेर आमदार होण्यात यशस्वी झाले. मोरबी, टंकारा, विसावदार, राजकोट पूर्व, गोंडल, धोराजी, कलावद, मानवदर, जामजोधपूर, जेतपूर, अमरेली, लाठी, गरियाधर, धारी, सावरकुंडला आणि बोताड या जागांवर पटेल बहुसंख्य मतदार आहेत. दुसरीकडे भावनगर गाव, पालिताना, तळजा, महुवा, राजुला, उना, तलाळा, सोमनाथ, केशोद आणि जसदण विधानसभा जागांवर कोळी मतदार बहुसंख्य आहेत. या वैशिष्ट्यामुळेच सौराष्ट्रातील 48 विधानसभा जागा महत्त्वाच्या ठरतात. येथे कोळी आणि पाटीदार मतदार हे निर्णायक मानले जातात.

कोळी, पाटीदार समाज : कोळी आणि पाटीदार समाजाचे समीकरण हा निकाल ठरवु शकतात. या दोन्ही समाजाच्या मतदारांवरच या विभागाचा आणि त्यातुन सरकार कोणाचे याचा कौल समोर येऊ शकतो येथील सर्व 48 जागांवर पाटीदार मतदार बहुसंख्य आहेत, तेथे पाटीदार सोडून इतर जातीच्या उमेदवारांना पाटीदार मते मिळण्याची शक्यता नाही. तसेच कोळी जातीच्या मतांमुळे कोळी नसलेल्या जातीचे उमेदवार मिळणे अशक्य आहे.

निवडणुकीचे मुद्दे: महागाई, बेरोजगारी आणि शेतकर्‍यांची दुरवस्था, या तीन मुद्द्यांमुळे सौराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. राजकीय तज्ज्ञ कार्तिकभाई उपाध्याय यांनी ईटीव्ही भारतशी खास बातचीत करताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, 'महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सरकारी कर्मचाऱ्यांची दुरवस्था या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी नक्कीच पाहायला मिळतील. सतत वाढणारी महागाई गरीब आणि मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, वीज, भाजीपाला, डाळी, धान्य, दूध, मांस तसेच मासळीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यात राज्य आणि केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. केवळ हिंदुत्वाच्या बळावर निवडणूक जिंकण्यावर मत मोजणाऱ्या सत्ताधारी पक्षाने महागाईच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून आपली निवडणूक रणनीती आखली तर त्याचा फायदा भाजपशिवाय इतर राजकीय पक्षांना नक्कीच होईल. सध्या महागाईचा दर सातत्याने वाढत आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलरची जोरदार वाटचाल सुरू आहे. जी भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत करण्यासाठी पुरेशी आहे.

सौराष्ट्र अधिक महत्त्वाचे का: याबाबत तपास केला तर लक्षात येईल की, राजकीय दृष्टीने सौराष्ट्र हे महत्त्वाचे का मानले जाते. सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी सौराष्ट्रला अधिक महत्त्व देण्याचे कारण म्हणजे येथील सौराष्ट्र मतदारांचे वैशिष्ट्य.. बहुतांश जागांवर पाटीदारांचे वर्चस्व आहे. त्याचबरोबर अन्य काही जागांवरही कोळी समाजाचा प्रभाव दिसून येत आहे. भावनगर आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यांतील विधानसभा जागांवर क्षत्रिय राजपूत आणि गरासिया दरबारही आपल्या मताने कोणत्याही राजकीय पक्षाचे समीकरण बिघडू शकतात.

मतदारांची संख्या: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नुकतीच अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. त्यानुसार सौराष्ट्र विभागातील 11 जिल्ह्यांमध्ये एकूण 1 कोटी 12 लाख 28 हजार 209 मतदारांची नोंदणी झाली आहे. यात एकूण 58 लाख 896 पुरुष तर 54 लाख 11 हजार 313 महिला मतदारांची नोंदणी झाली आहे. इतरांमधे १९२ मतदारांची नोंदणी झाली आहे.

व्होट बँक तुटू नये म्हणून: भाजपने या विभागावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. कारण भाजपचे 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य़ आहे. विजय रुपानी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकोटमधील जनता नाराज झाली आहे. त्यामुळेच राजकोटवासीयांची आणि सौराष्ट्राची व्होट बँक तुटू नये म्हणून पंतप्रधान मोदी नरेंद्र यांनी जमकादोर्णामध्ये सभा घेतली. जनाधार वाढवण्यासाठी घरा घरात भाजप पोहोचवण्याच्या मोहीमे सोबत काँग्रेस नेते आणि समर्थकांना भाजप समर्थक बनवण्यात येत आहे. भाजपला आक्रमकपणे विरोध करणारे विसावदर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हर्षद रिबडीया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसची पकड राहणार का: 2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला सौराष्ट्रच्या 48 जागांवर मोठा संघर्ष करावा लागला होता. शहरी भागातील विधानसभा जागा वगळता ग्रामीण भागातील विधानसभा जागांवर काँग्रेसने पकड ठेवली आणि दणदणीत विजय मिळवला. यावेळी आम आदमी पक्षासमोर तिसऱ्या राजकीय पक्षाचे नवे आव्हान उभे राहिले आहे. आपचा जोर वाढला तर येथे तीरंगी सामना पहायला मिळू शकतो.

निवडणुकीत मोदींचाच चेहरा : पुन्हा एकदा विकास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) चेहरा घेऊन भाजप पुढे जाईल. तसेच, पंतप्रधानांचा चेहरा पुढे नेला जाईल असे चित्र सध्या या भागात दिसत आहे. हेच मुद्दे केंद्रस्थानी ठेवून भाजपचा निवडणूक प्रचार सुरु आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा गेल्या 2 दशकांत नरेंद्र मोदी हेच निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत. मोदी सध्या पंतप्रधान म्हणून काम करत आहेत, त्यानुसार भाजप निवडणूक प्रचार आणि रणनीतीमध्ये पुढे जाईल, असे जुनागडचे माजी आमदार महेंद्र मश्रू यांनी सांगितले.

सर्वच पक्षांसाठी आव्हान : सौराष्ट्रात 48 पैकी राखीव जागा वगळता बहुतांश जागांवर पाटीदार आणि कोळी बहुसंख्य मतदार आहेत. त्यापैकी राजकोट, जामनगर, जुनागढ, अमरेली आणि मोरबी जिल्ह्यातील जागा पाटीदार मतदार असलेल्या जागा मानल्या जातात. गीर सोमनाथ जिल्ह्यातील चार विधानसभा जागांवर कोळी मतदार हा प्रभावशाली घटक आहे. पोरबंदर जिल्ह्यातील पोरबंदर आणि कुतियाना विधानसभा मतदारसंघात मीर जातीचे प्राबल्य आहे. जसदन ही जागा कोळी मतदारांच्या ताब्यात, वांकानेरच्या जागेवर मुस्लिम मतदार अजूनही निर्णायक मानला जातो गटबाजीमुळे नेते स्तब्ध होते. विधानसभेच्या 182 जागांपैकी सौराष्ट्रातील एकूण 48 जागा सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. अशावेळी सौराष्ट्रातील काँग्रेसप्रेमी जनता कोणाकडे झुकते हे पाहावे लागेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

जुनागड: गुजरात विधानसभा निवडणूकीची (GUJARAT ASSEMBLY ELECTION 2022 ) घोषना झाली. या निवडणुकीत भाजपला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागु शकतो असे काही जाणकारांचे मत आहे. सौराष्ट्रात 48 जागा आहेत, साहजिकच कोणताही पक्ष मोठ्या संख्येने जिंकल्याशिवाय येथे सरकार स्थापन करू शकत नाही. त्यामुळे गुजरातच्या सिंहासनावर बसायचे असेल तर सौराष्ट्रातील (Saurashtra) निकालावर मोठी भिस्त राहणार आहे. सौराष्ट्रातील जागांवर सर्वच पक्षांचा जोर दिसत आहे.

सौराष्ट्रातील बलाबल : 2017 मध्ये शहरी भागावर भाजपचा तर ग्रामीण भागात काँग्रेसचा प्रभाव सिद्ध झाला त्यावेळी अमरेली, मोरबी आणि सोमनाथ जिल्ह्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. जुनागडमधील केशोदच्या 5 पैकी केवळ एक जागा भाजपने जिंकली. तर पोरबंदर आणि बोताड जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रत्येकी एक जागा जिंकली. राजकोटमध्ये भाजपने 8 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. तसेच भावनगर शहरातील 7 पैकी 6 जागा भाजपने जिंकल्या आहेत. या निकालांवरून एक स्पष्ट निष्कर्ष काढला जाऊ शकतो की 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरी मतदारांवर भाजपचा वरचष्मा होता आणि ग्रामीण मतदारांवर काँग्रेसचा.

जातीय समीकरणे: सौराष्ट्रातील विधानसभेच्या 18 जागांवर पाटीदार समाज तर 10 जागांवर कोळी मतदारांचा प्रभाव पहायला मिळतो. याशिवाय गोंडल विधानसभा मतदारसंघात भावनगर आणि जामनगरसह क्षत्रिय दरबार आणि गरासिया राजपूत महत्त्वाचे मानले जातात. कोळी मतदार असतानाही अमरेली जिल्ह्यातील राजुला मतदारसंघातून काँग्रेसचे अहिर उमेदवार अमरीश डेर आमदार होण्यात यशस्वी झाले. मोरबी, टंकारा, विसावदार, राजकोट पूर्व, गोंडल, धोराजी, कलावद, मानवदर, जामजोधपूर, जेतपूर, अमरेली, लाठी, गरियाधर, धारी, सावरकुंडला आणि बोताड या जागांवर पटेल बहुसंख्य मतदार आहेत. दुसरीकडे भावनगर गाव, पालिताना, तळजा, महुवा, राजुला, उना, तलाळा, सोमनाथ, केशोद आणि जसदण विधानसभा जागांवर कोळी मतदार बहुसंख्य आहेत. या वैशिष्ट्यामुळेच सौराष्ट्रातील 48 विधानसभा जागा महत्त्वाच्या ठरतात. येथे कोळी आणि पाटीदार मतदार हे निर्णायक मानले जातात.

कोळी, पाटीदार समाज : कोळी आणि पाटीदार समाजाचे समीकरण हा निकाल ठरवु शकतात. या दोन्ही समाजाच्या मतदारांवरच या विभागाचा आणि त्यातुन सरकार कोणाचे याचा कौल समोर येऊ शकतो येथील सर्व 48 जागांवर पाटीदार मतदार बहुसंख्य आहेत, तेथे पाटीदार सोडून इतर जातीच्या उमेदवारांना पाटीदार मते मिळण्याची शक्यता नाही. तसेच कोळी जातीच्या मतांमुळे कोळी नसलेल्या जातीचे उमेदवार मिळणे अशक्य आहे.

निवडणुकीचे मुद्दे: महागाई, बेरोजगारी आणि शेतकर्‍यांची दुरवस्था, या तीन मुद्द्यांमुळे सौराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. राजकीय तज्ज्ञ कार्तिकभाई उपाध्याय यांनी ईटीव्ही भारतशी खास बातचीत करताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, 'महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सरकारी कर्मचाऱ्यांची दुरवस्था या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी नक्कीच पाहायला मिळतील. सतत वाढणारी महागाई गरीब आणि मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, वीज, भाजीपाला, डाळी, धान्य, दूध, मांस तसेच मासळीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यात राज्य आणि केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. केवळ हिंदुत्वाच्या बळावर निवडणूक जिंकण्यावर मत मोजणाऱ्या सत्ताधारी पक्षाने महागाईच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून आपली निवडणूक रणनीती आखली तर त्याचा फायदा भाजपशिवाय इतर राजकीय पक्षांना नक्कीच होईल. सध्या महागाईचा दर सातत्याने वाढत आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलरची जोरदार वाटचाल सुरू आहे. जी भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत करण्यासाठी पुरेशी आहे.

सौराष्ट्र अधिक महत्त्वाचे का: याबाबत तपास केला तर लक्षात येईल की, राजकीय दृष्टीने सौराष्ट्र हे महत्त्वाचे का मानले जाते. सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी सौराष्ट्रला अधिक महत्त्व देण्याचे कारण म्हणजे येथील सौराष्ट्र मतदारांचे वैशिष्ट्य.. बहुतांश जागांवर पाटीदारांचे वर्चस्व आहे. त्याचबरोबर अन्य काही जागांवरही कोळी समाजाचा प्रभाव दिसून येत आहे. भावनगर आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यांतील विधानसभा जागांवर क्षत्रिय राजपूत आणि गरासिया दरबारही आपल्या मताने कोणत्याही राजकीय पक्षाचे समीकरण बिघडू शकतात.

मतदारांची संख्या: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नुकतीच अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. त्यानुसार सौराष्ट्र विभागातील 11 जिल्ह्यांमध्ये एकूण 1 कोटी 12 लाख 28 हजार 209 मतदारांची नोंदणी झाली आहे. यात एकूण 58 लाख 896 पुरुष तर 54 लाख 11 हजार 313 महिला मतदारांची नोंदणी झाली आहे. इतरांमधे १९२ मतदारांची नोंदणी झाली आहे.

व्होट बँक तुटू नये म्हणून: भाजपने या विभागावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. कारण भाजपचे 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य़ आहे. विजय रुपानी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकोटमधील जनता नाराज झाली आहे. त्यामुळेच राजकोटवासीयांची आणि सौराष्ट्राची व्होट बँक तुटू नये म्हणून पंतप्रधान मोदी नरेंद्र यांनी जमकादोर्णामध्ये सभा घेतली. जनाधार वाढवण्यासाठी घरा घरात भाजप पोहोचवण्याच्या मोहीमे सोबत काँग्रेस नेते आणि समर्थकांना भाजप समर्थक बनवण्यात येत आहे. भाजपला आक्रमकपणे विरोध करणारे विसावदर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हर्षद रिबडीया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसची पकड राहणार का: 2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला सौराष्ट्रच्या 48 जागांवर मोठा संघर्ष करावा लागला होता. शहरी भागातील विधानसभा जागा वगळता ग्रामीण भागातील विधानसभा जागांवर काँग्रेसने पकड ठेवली आणि दणदणीत विजय मिळवला. यावेळी आम आदमी पक्षासमोर तिसऱ्या राजकीय पक्षाचे नवे आव्हान उभे राहिले आहे. आपचा जोर वाढला तर येथे तीरंगी सामना पहायला मिळू शकतो.

निवडणुकीत मोदींचाच चेहरा : पुन्हा एकदा विकास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) चेहरा घेऊन भाजप पुढे जाईल. तसेच, पंतप्रधानांचा चेहरा पुढे नेला जाईल असे चित्र सध्या या भागात दिसत आहे. हेच मुद्दे केंद्रस्थानी ठेवून भाजपचा निवडणूक प्रचार सुरु आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा गेल्या 2 दशकांत नरेंद्र मोदी हेच निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत. मोदी सध्या पंतप्रधान म्हणून काम करत आहेत, त्यानुसार भाजप निवडणूक प्रचार आणि रणनीतीमध्ये पुढे जाईल, असे जुनागडचे माजी आमदार महेंद्र मश्रू यांनी सांगितले.

सर्वच पक्षांसाठी आव्हान : सौराष्ट्रात 48 पैकी राखीव जागा वगळता बहुतांश जागांवर पाटीदार आणि कोळी बहुसंख्य मतदार आहेत. त्यापैकी राजकोट, जामनगर, जुनागढ, अमरेली आणि मोरबी जिल्ह्यातील जागा पाटीदार मतदार असलेल्या जागा मानल्या जातात. गीर सोमनाथ जिल्ह्यातील चार विधानसभा जागांवर कोळी मतदार हा प्रभावशाली घटक आहे. पोरबंदर जिल्ह्यातील पोरबंदर आणि कुतियाना विधानसभा मतदारसंघात मीर जातीचे प्राबल्य आहे. जसदन ही जागा कोळी मतदारांच्या ताब्यात, वांकानेरच्या जागेवर मुस्लिम मतदार अजूनही निर्णायक मानला जातो गटबाजीमुळे नेते स्तब्ध होते. विधानसभेच्या 182 जागांपैकी सौराष्ट्रातील एकूण 48 जागा सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. अशावेळी सौराष्ट्रातील काँग्रेसप्रेमी जनता कोणाकडे झुकते हे पाहावे लागेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.