औरंगाबाद - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ( Chhatrapati Shivaji Maharaj) मराठा संघटना आणि अभ्यासकांनी कोश्यारी यांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी केली आहे.
असे केले होते विधान
समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला रविवारी प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी आयुष्यात गुरूचे महत्व मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. (Governor on Shivaji Maharaj ) आपल्या देशात गुरुची परंपरा आहे ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो, समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते, समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते. चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, गुरुचे महत्त्व मोठे आहे समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे असे विधान भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
समर्थ रामदास गुरु नाहीत
छत्रपती शिवरायांचे रामदास हे गुरू नव्हते हे तज्ञ इतिहासकारांनी, अभ्यासकांनी सिद्ध केलेले आहे अशी माहिती संभाजी ब्रिगेड प्रवक्ते डॉ शिवानंद भानुसे यांनी दिली. तत्कालीन शिक्षणमंत्री वसंतरावजी पुरके यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ इतिहासकारांची, अभ्यासकांची समिती नेमण्यात आली होती. त्यामध्ये बाबा पुरंदरे सुद्धा होते. त्या समितीने अभ्यास करून सिद्ध केलेल आहे की रामदास हे शिवरायांचे गुरु नव्हते. एवढेच नव्हे तर छत्रपती शिवराय आणि रामदास यांची भेट सुद्धा झालेली नाही.
संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने धडा शिकवेल
2013 मध्ये मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सांगितले आहे की, रामदास शिवरायांचे गुरु नव्हते. त्यांची भेट सुद्धा झालेली नाही. रामदास आणि शिवरायांचा काही संबंध नाही. असे असताना सुद्धा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे जाणीवपूर्वक खोडसाळपणा करत आहेत. जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांचा अपमान करत आहेत. संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा संभाजी ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने धडा शिकवेल. असा इशारा संभाजी ब्रिगेड प्रवक्ते डॉ शिवानंद भानुसे यांनी दिला.
हेही वाचा - संभाजी राजेंसोबत झालेल्या चर्चेची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार - दिलीप वळसे-पाटील