ETV Bharat / bharat

गहु उत्पादक शेतकऱ्यांचे समाधान, काड मिश्रणातून पशूंसाठी बनवा 'असे' पौष्टिक आहार - जनावरांसाठी पौष्टिक आहार

गव्हाचे कोठार, अशी पंजबाची ओळख आहे. मात्र, गव्हाची रास झाल्यानंतर जो टाकाऊ चोथा म्हणजेच काड शिल्लक राहतो. त्याची विल्हेवाट करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक शेतकरी काड जाळून टाकतात. यामुळे परिसरात प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढतो. मात्र, लुधियाना येथील गुरु अंगद देव पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाच्या संशोधकांनी यावर उत्तम उपाय शोधला असून याचा वापर पशुचा पौष्टिक आहार म्हणून करता येतो.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Mar 26, 2022, 4:21 PM IST

Updated : Mar 26, 2022, 8:15 PM IST

लुधियाना - पंजाबमध्ये दरवर्षी सुमारे 29.68 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाचे उत्पादन केले जाते. मात्र, गव्हाची काढणी, रास झाल्यानंतर जो शिल्लक टाकाऊ माल राहतो त्यास काड किंवा गव्हाचा कडबा म्हणतात. मात्र, मागील काही दिवसांपासून काड जळण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. यामुळे परिसरातील प्रदुषणात वाढ तर होत आहेच सोबतच यामुळे नागरिाकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. मात्र, संशोधकांनी यासाठी एक उत्तम उपाय शोधून काढला आहे.

सुरुवातील पारंपारिक शेती करणारा शेतकरी आता आधुनिकतेच कास धरत आहे. यासाठी लागणारी यंत्र, सामग्रीही तो खरेदी करत आहे. मात्र, हे यंत्र, सामग्री खूप महाग असल्याने छोट्या शेतकऱ्यांना खरेदी करण्यास अडचणी येत होत्या. पण, पंजाब सरकार मागील काही वर्षांपासून यंत्रसामग्री भाड्याने देण्याची योजना राबवत आहे. यामुळे छोटा शेतकरीही मोठ्या प्रमाणात उत्पादन आपल्या शेतात करू लागला आहे. यामुळे गव्हाचे काडही मोठ्या प्रमाणात शिल्लक पडत आहे. मात्र, त्या जळण्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठी डोकेदुखी झाली आहे.

तीन वर्षांत लाखो घटना - मागील तीन वर्षांत काड जाळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून तब्बल दोन लाख दोन हजार 826 घटनांची नोंद झाली आहे. मागील 10 वर्षांची आकडेवारी पाहिली तर 2019 मध्ये 55 हजार 210, 2020 मध्ये 70 हजार 592, 2021 मध्ये 71 हजार 24 घटना समोर आल्या आहेत. 2020 मध्ये 17.96 लाख हेक्टर क्षेत्र पंजाबच्या शेतकऱ्यांनी आग लावली. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ झाली. कोरोना काळात याचा प्रभाव मानवी शरिरावर जास्त दिसला. कोरोना काळात खोकला, घशात खवखव यासह अनेक समस्या उत्तर भारतात पहायला मिळाल्या. काड जाळण्याच्या वेळात याची संख्या जास्त होते.

गडवासु (GADVASU) चे संशोधन - गुरु अंगद देव पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाने काडच्या विल्हेवाटासाठी एक संशोधन केले आहे. काडमध्ये यूरिया मोलासिस मिसळून एक मिश्रण तयार केले जाते. ते मिश्रण पशु खाऊ शकतात. असे खाद्य खाल्ल्यानंतर प्राणांमध्ये सकारात्मक बदल दिसून आले.

मिश्रण दिल्यास पचनक्रिया वाढण्यास मदत - गुरु अंगद देव पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाच्या डॉ. आर.एस.ग्रेवाल यांच्या म्हणण्यानुसार केवळ काड जनावरांच्या खाद्य म्हणून दिल्यास त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, त्यामध्ये युरिया मोलासिस मिसळून जनावरांना दिल्यास 45 ते 50 टक्के पचनक्रिया वाढू शकते. व ते जनावरांच्या आरोग्यासाठीही उत्तम असते.

शेतकऱ्यांनी घ्यावी 'ही' काळजी - डॉ. आर.एस. ग्रेवाल म्हणाले, शेतकऱ्यांनी योग्य प्रमाणात मिश्रण तयार करावे. या प्रक्रियेस यूरिया मोलासेस ट्रीटमेंट ऑफ पैडी स्ट्रा ( Urea Molasses Treatment of Paddy Straw ) म्हटले जाते. यात 1 क्विंटल काड घ्यावी त्यात 3 किलोग्रॅम शीला हीरा व 1 किलोग्रॅम यूरिया 30 किलो पाण्यात टाकून मिश्रण तयार केले जाते. ते म्हणाले चार महिन्यापेक्षा कमी वय असलेल्या प्राण्यांना हे मिश्रण देऊ नये. पण, दुध देणाऱ्या प्राण्यांना हे मिश्रण दोन दोन किलो खावू घालावे. जर प्राणी दूध देत नसेल तर हे मिश्रण दररोज 4 ते 5 किलो खाऊ घालावे.

गोशाळांसाठी लाभदायक - गुरु अंगद देव पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, याचा प्रयोग अनेक गोळाशेत झाला आहे. गोशाळेत भटक्या गायींची पचनक्रिया सुधारावी यासाठी त्यांना प्रतीदिन 4 ते 5 किलोग्रॅम मिश्रण देण्यात आले. त्यानंतर हे मिश्रण त्यांच्यासाठी अत्यंत फायदेमंत सिद्ध झाले आहे.

हेही वाचा - पंजाबमधील सरकारी शाळांचा लिलाव?; शिरोमणी अकाली दल-'आप'मध्ये खडाजंगी

लुधियाना - पंजाबमध्ये दरवर्षी सुमारे 29.68 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाचे उत्पादन केले जाते. मात्र, गव्हाची काढणी, रास झाल्यानंतर जो शिल्लक टाकाऊ माल राहतो त्यास काड किंवा गव्हाचा कडबा म्हणतात. मात्र, मागील काही दिवसांपासून काड जळण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. यामुळे परिसरातील प्रदुषणात वाढ तर होत आहेच सोबतच यामुळे नागरिाकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. मात्र, संशोधकांनी यासाठी एक उत्तम उपाय शोधून काढला आहे.

सुरुवातील पारंपारिक शेती करणारा शेतकरी आता आधुनिकतेच कास धरत आहे. यासाठी लागणारी यंत्र, सामग्रीही तो खरेदी करत आहे. मात्र, हे यंत्र, सामग्री खूप महाग असल्याने छोट्या शेतकऱ्यांना खरेदी करण्यास अडचणी येत होत्या. पण, पंजाब सरकार मागील काही वर्षांपासून यंत्रसामग्री भाड्याने देण्याची योजना राबवत आहे. यामुळे छोटा शेतकरीही मोठ्या प्रमाणात उत्पादन आपल्या शेतात करू लागला आहे. यामुळे गव्हाचे काडही मोठ्या प्रमाणात शिल्लक पडत आहे. मात्र, त्या जळण्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठी डोकेदुखी झाली आहे.

तीन वर्षांत लाखो घटना - मागील तीन वर्षांत काड जाळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून तब्बल दोन लाख दोन हजार 826 घटनांची नोंद झाली आहे. मागील 10 वर्षांची आकडेवारी पाहिली तर 2019 मध्ये 55 हजार 210, 2020 मध्ये 70 हजार 592, 2021 मध्ये 71 हजार 24 घटना समोर आल्या आहेत. 2020 मध्ये 17.96 लाख हेक्टर क्षेत्र पंजाबच्या शेतकऱ्यांनी आग लावली. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ झाली. कोरोना काळात याचा प्रभाव मानवी शरिरावर जास्त दिसला. कोरोना काळात खोकला, घशात खवखव यासह अनेक समस्या उत्तर भारतात पहायला मिळाल्या. काड जाळण्याच्या वेळात याची संख्या जास्त होते.

गडवासु (GADVASU) चे संशोधन - गुरु अंगद देव पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाने काडच्या विल्हेवाटासाठी एक संशोधन केले आहे. काडमध्ये यूरिया मोलासिस मिसळून एक मिश्रण तयार केले जाते. ते मिश्रण पशु खाऊ शकतात. असे खाद्य खाल्ल्यानंतर प्राणांमध्ये सकारात्मक बदल दिसून आले.

मिश्रण दिल्यास पचनक्रिया वाढण्यास मदत - गुरु अंगद देव पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाच्या डॉ. आर.एस.ग्रेवाल यांच्या म्हणण्यानुसार केवळ काड जनावरांच्या खाद्य म्हणून दिल्यास त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, त्यामध्ये युरिया मोलासिस मिसळून जनावरांना दिल्यास 45 ते 50 टक्के पचनक्रिया वाढू शकते. व ते जनावरांच्या आरोग्यासाठीही उत्तम असते.

शेतकऱ्यांनी घ्यावी 'ही' काळजी - डॉ. आर.एस. ग्रेवाल म्हणाले, शेतकऱ्यांनी योग्य प्रमाणात मिश्रण तयार करावे. या प्रक्रियेस यूरिया मोलासेस ट्रीटमेंट ऑफ पैडी स्ट्रा ( Urea Molasses Treatment of Paddy Straw ) म्हटले जाते. यात 1 क्विंटल काड घ्यावी त्यात 3 किलोग्रॅम शीला हीरा व 1 किलोग्रॅम यूरिया 30 किलो पाण्यात टाकून मिश्रण तयार केले जाते. ते म्हणाले चार महिन्यापेक्षा कमी वय असलेल्या प्राण्यांना हे मिश्रण देऊ नये. पण, दुध देणाऱ्या प्राण्यांना हे मिश्रण दोन दोन किलो खावू घालावे. जर प्राणी दूध देत नसेल तर हे मिश्रण दररोज 4 ते 5 किलो खाऊ घालावे.

गोशाळांसाठी लाभदायक - गुरु अंगद देव पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, याचा प्रयोग अनेक गोळाशेत झाला आहे. गोशाळेत भटक्या गायींची पचनक्रिया सुधारावी यासाठी त्यांना प्रतीदिन 4 ते 5 किलोग्रॅम मिश्रण देण्यात आले. त्यानंतर हे मिश्रण त्यांच्यासाठी अत्यंत फायदेमंत सिद्ध झाले आहे.

हेही वाचा - पंजाबमधील सरकारी शाळांचा लिलाव?; शिरोमणी अकाली दल-'आप'मध्ये खडाजंगी

Last Updated : Mar 26, 2022, 8:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.