ETV Bharat / bharat

आज 'भारत बंद'ची शेतकरी संघटनांची हाक; 'या' पक्षांनी दर्शवला पाठिंबा

author img

By

Published : Dec 7, 2020, 10:01 AM IST

Updated : Dec 8, 2020, 10:37 AM IST

आतापर्यंत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये ५ बैठका झाल्यात. मात्र, या चर्चांच्या फेरींमधून कोणताही तोडगा समोर आला नाही. यापुढील चर्चेची फेरी ९ डिसेंबर म्हणजे उद्या पार पडणार आहे. आज भारत बंद ठेवण्याचे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे.

farmers  call bharat band to oppose agriculture law political parties support
आज 'भारत बंद'ची शेतकरी संघटनांची हाक; 'या' पक्षांनी दर्शवला पाठिंबा

दिल्ली - गेल्या १२ दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दिल्ली चलो आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून दिवसेंदिवस अधिक पाठिंबा मिळत आहे. सुरुवातीला केवळ पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि गुजरातमधील शेतकरीही दिल्ली सीमेच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवाय, आपापल्या राज्यांमध्येही शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. हे आंदोलन सुरूच ठेवत आज मंगळवारी ८ डिसेंबरला भारत बंद ची हाक शेतकऱ्यांनी दिली आहे.

आज भारत बंद-

आतापर्यंत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये ५ बैठका झाल्यात. मात्र, या चर्चांच्या फेरींमधून कोणताही तोडगा समोर आला नाही. यापुढील चर्चेची फेरी ९ डिसेंबरला पार पडणार आहे. त्यापूर्वी आज म्हणजेच आठ डिसेंबरला भारत बंद ठेवण्याचे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे. या भारत बंद दरम्यान आपत्कालीन सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही याबाबत आपण विशेष काळजी घेणार असल्याचे शेतकरी संघटनांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचा पाठिंबा -

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी आजच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या बंदचा प्रभावही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दिसणार आहे.

भारत बंदला विविध पक्षांचा पाठिंबा -

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला आम आदमी पार्टी, तेलंगण राष्ट्र समिती आणि महाविकास आघाडीनेही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दिल्ली, तेलंगणा आणि महाराष्ट्रात हा बंद मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्याची चिन्हे आहे. यासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआय, राष्ट्रीय लोकशाही पार्टी, डीएमके, आरजेडी, जेएमएम, आरएसपी या पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. तृणमुल काँग्रेस, कमल हासन यांच्या मक्काल निधि मय्यम या पक्षांनी देखील पाठिंबा दर्शवला असून आजचा बंद यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते काम करतील.

शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट -

केवळ आपल्या देशामध्येच नव्हे, तर जगातील १७ ते १८ देशांना धान्य पुरवण्याचे काम पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी करतात. त्यामुळे तेथील शेतकरी जर रस्त्यावर उतरला आहे, तर त्याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. मात्र, ती केंद्र सरकारने घेतलेली दिसत नाही, असे टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे. याप्रकरणी चर्चा करण्यासाठी पवार हे ९ डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा भारत बंदला पाठिंबा -

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे. स्वामिनाथन आयोग, केंद्रीय कृषी मूल्य आयोग यांच्या शिफारशी मान्य कराव्यात आदी मागण्या करत अण्णांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा - '...तेव्हा बहुमताची सरकारेसुद्धा डचमळून कोसळतात व बलदंड समजले जाणारे नेतृत्व उडून जाते'

दिल्ली - गेल्या १२ दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दिल्ली चलो आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून दिवसेंदिवस अधिक पाठिंबा मिळत आहे. सुरुवातीला केवळ पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि गुजरातमधील शेतकरीही दिल्ली सीमेच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवाय, आपापल्या राज्यांमध्येही शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. हे आंदोलन सुरूच ठेवत आज मंगळवारी ८ डिसेंबरला भारत बंद ची हाक शेतकऱ्यांनी दिली आहे.

आज भारत बंद-

आतापर्यंत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये ५ बैठका झाल्यात. मात्र, या चर्चांच्या फेरींमधून कोणताही तोडगा समोर आला नाही. यापुढील चर्चेची फेरी ९ डिसेंबरला पार पडणार आहे. त्यापूर्वी आज म्हणजेच आठ डिसेंबरला भारत बंद ठेवण्याचे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे. या भारत बंद दरम्यान आपत्कालीन सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही याबाबत आपण विशेष काळजी घेणार असल्याचे शेतकरी संघटनांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचा पाठिंबा -

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी आजच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या बंदचा प्रभावही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दिसणार आहे.

भारत बंदला विविध पक्षांचा पाठिंबा -

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला आम आदमी पार्टी, तेलंगण राष्ट्र समिती आणि महाविकास आघाडीनेही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दिल्ली, तेलंगणा आणि महाराष्ट्रात हा बंद मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्याची चिन्हे आहे. यासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआय, राष्ट्रीय लोकशाही पार्टी, डीएमके, आरजेडी, जेएमएम, आरएसपी या पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. तृणमुल काँग्रेस, कमल हासन यांच्या मक्काल निधि मय्यम या पक्षांनी देखील पाठिंबा दर्शवला असून आजचा बंद यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते काम करतील.

शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट -

केवळ आपल्या देशामध्येच नव्हे, तर जगातील १७ ते १८ देशांना धान्य पुरवण्याचे काम पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी करतात. त्यामुळे तेथील शेतकरी जर रस्त्यावर उतरला आहे, तर त्याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. मात्र, ती केंद्र सरकारने घेतलेली दिसत नाही, असे टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे. याप्रकरणी चर्चा करण्यासाठी पवार हे ९ डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा भारत बंदला पाठिंबा -

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे. स्वामिनाथन आयोग, केंद्रीय कृषी मूल्य आयोग यांच्या शिफारशी मान्य कराव्यात आदी मागण्या करत अण्णांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा - '...तेव्हा बहुमताची सरकारेसुद्धा डचमळून कोसळतात व बलदंड समजले जाणारे नेतृत्व उडून जाते'

Last Updated : Dec 8, 2020, 10:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.