ETV Bharat / bharat

Diwali 2023 : तामिळनाडूतील 'या' १० गावांमध्ये पक्षांमुळे फटाके वर्ज्य! शांततेत साजरी होते दिवाळी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 10:41 PM IST

Diwali 2023 : तमिळनाडूतील काही गावांमध्ये दिवाळीचा सण अतिशय शांततेत साजरा करण्यात येतो. कारण इथल्या लोकांना पर्यावरणाला वाचवायचं आहे आणि अभयारण्यात राहणाऱ्या पक्ष्यांना त्रास द्यायचा नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथे दिवाळीत फटाके फोडले जात नाहीत.

More than 10 TN villages omit Diwali celebrations for birds and the environment
More than 10 TN villages omit Diwali celebrations for birds and the environment

चेन्नई Diwali 2023 : दिवाळी म्हटलं की फटाके आलेच. दरवर्षी देशभरात फटाके फोडून दिवाळीचा सण धूमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र तामिळनाडूतील काही गावांमध्ये पर्यावरणाच्या हितासाठी अत्यंत शांत वातावरणात दिवाळी साजरी करण्यात येते.

गावाबाहेर जाऊन फटाके फोडतात : तमिळनाडू सरकारनं शिवगंगई जिल्ह्यातील वेतांगुडी गावाला १९७७ मध्ये पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केलं. या अभयारण्यात परदेशातील २१७ हून अधिक जातींचे पक्षी वास्तव्य करतात. त्यामुळे वेतांगुडी आणि आसपासच्या पेरिया कोल्लुक्कुडी आणि चिन्ना कोल्लुक्कुडी या गावांतील लोकांनी गेल्या ४० वर्षांहून अधिक काळापासून दिवाळीत फटाके फोडलेले नाहीत. याबाबत पेरिया कोल्लुक्कुडी येथील रहिवासी चेल्लामनी यांनी सांगितलं की, इथले लोकच नाही तर मुलंही दिवाळीत फटाके फोडत नाहीत. "फटाके फोडायचे असल्यास आम्ही गावाबाहेर जाऊन फोडतो. गावात कोणीही फटाके फोडत नाही. हा पक्ष्यांचा प्रसुतीचा काळ असल्यानं फटाक्यांच्या आवाजानं पक्षी घाबरतात. म्हणून आम्ही फटाके फोडत नाही", असं त्यांनी सांगितलं.

पक्षांसाठी फटाके फोडत नाहीत : याशिवाय कोईम्बतूर जिल्ह्यातील किट्टमपालयम गावातील लोक गेल्या २० वर्षांपासून दिवाळीत फटाके फोडत नाहीत. या संदर्भात किट्टमपालयमचे ग्रामस्थ म्हणाले, "आमचं गाव समृद्ध करण्यासाठी वृक्षारोपण करणं हा आमचा उद्देश आहे. आम्ही शक्य तेवढी झाडं लावतो. याशिवाय आम्ही आमच्या शहरात पक्ष्यांची पैदास करण्याचा निर्णय घेतला". ते पुढे म्हणाले की, "जेव्हा विविध भागातून विविध प्रकारची फळं खाणारे वटवाघुळं आणि पक्षी आमच्या गावात येतात, तेव्हा मागे राहिलेल्या बिया वाढून येथे वृक्ष बनतात. आमच्या गावात येणाऱ्या वटवाघुळांचे हे फायदे लक्षात आल्यानंतर २० वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला".

वटवाघुळांमुळे फटाके न फोडण्याचा निर्णय : अनेक वर्षांपूर्वी धर्मपुरी जिल्ह्यातील एका गावानंही वटवाघुळांमुळे फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला होता. धर्मपुरी जिल्ह्यातील बालेनहल्ली गावात २०० हून अधिक लोक राहतात. शहरात तीन शतकं जुनी चिंचेची मोठी झाडं आणि एक वटवृक्ष आहे. सुमारे अर्धा एकर परिसरात पसरलेली ही झाडं दिसायला मोठी आहेत. शिवाय, या झाडांच्या भागात मुनिप्पन स्वामी मंदिर (तामिळनाडूचे ग्रामीण देवता) आहे. त्यांची परिसरातील लोक श्रद्धेनं पूजा करतात. मंदिराच्या वर असलेल्या चिंच आणि वटवृक्षांवर हजारो वटवाघुळं राहतात. वटवाघुळं रात्री भक्ष शोधतात आणि दिवसा परिसरातील झाडांचा आसरा घेतात. वटवाघुळांनी झाडांचा आश्रय घेतला असल्यानं परिसरातील ग्रामस्थ दिवाळीसह अन्य कोणत्याही सणाला फटाके फोडत नाहीत.

सलग १७व्या वर्षी फटाके न फोडता दिवाळी साजरी : तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील वेल्लोर पक्षी अभयारण्य सुमारे २४० एकर क्षेत्रात पसरलं आहे. या पक्षी अभयारण्याचं काही वर्षांपूर्वी २ कोटी ३५ लाख रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आलं. या पक्षी अभयारण्याच्या सभोवतालच्या १० हून अधिक गावांनी सलग १७व्या वर्षी फटाके न फोडता दिवाळी साजरी केली आहे.

हेही वाचा :

  1. Diwali Of Tharu Tribe : ना देवीची पूजा होते, ना फटाके फोडले जात; जाणून घ्या थारू आदिवासींच्या अनोख्या दिवाळीबाबत!
  2. Diwali 2023 : 'या' गावांमध्ये दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी! दिव्यांची आरासही करता येत नाही; वाचा काय आहे कारण

चेन्नई Diwali 2023 : दिवाळी म्हटलं की फटाके आलेच. दरवर्षी देशभरात फटाके फोडून दिवाळीचा सण धूमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र तामिळनाडूतील काही गावांमध्ये पर्यावरणाच्या हितासाठी अत्यंत शांत वातावरणात दिवाळी साजरी करण्यात येते.

गावाबाहेर जाऊन फटाके फोडतात : तमिळनाडू सरकारनं शिवगंगई जिल्ह्यातील वेतांगुडी गावाला १९७७ मध्ये पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केलं. या अभयारण्यात परदेशातील २१७ हून अधिक जातींचे पक्षी वास्तव्य करतात. त्यामुळे वेतांगुडी आणि आसपासच्या पेरिया कोल्लुक्कुडी आणि चिन्ना कोल्लुक्कुडी या गावांतील लोकांनी गेल्या ४० वर्षांहून अधिक काळापासून दिवाळीत फटाके फोडलेले नाहीत. याबाबत पेरिया कोल्लुक्कुडी येथील रहिवासी चेल्लामनी यांनी सांगितलं की, इथले लोकच नाही तर मुलंही दिवाळीत फटाके फोडत नाहीत. "फटाके फोडायचे असल्यास आम्ही गावाबाहेर जाऊन फोडतो. गावात कोणीही फटाके फोडत नाही. हा पक्ष्यांचा प्रसुतीचा काळ असल्यानं फटाक्यांच्या आवाजानं पक्षी घाबरतात. म्हणून आम्ही फटाके फोडत नाही", असं त्यांनी सांगितलं.

पक्षांसाठी फटाके फोडत नाहीत : याशिवाय कोईम्बतूर जिल्ह्यातील किट्टमपालयम गावातील लोक गेल्या २० वर्षांपासून दिवाळीत फटाके फोडत नाहीत. या संदर्भात किट्टमपालयमचे ग्रामस्थ म्हणाले, "आमचं गाव समृद्ध करण्यासाठी वृक्षारोपण करणं हा आमचा उद्देश आहे. आम्ही शक्य तेवढी झाडं लावतो. याशिवाय आम्ही आमच्या शहरात पक्ष्यांची पैदास करण्याचा निर्णय घेतला". ते पुढे म्हणाले की, "जेव्हा विविध भागातून विविध प्रकारची फळं खाणारे वटवाघुळं आणि पक्षी आमच्या गावात येतात, तेव्हा मागे राहिलेल्या बिया वाढून येथे वृक्ष बनतात. आमच्या गावात येणाऱ्या वटवाघुळांचे हे फायदे लक्षात आल्यानंतर २० वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला".

वटवाघुळांमुळे फटाके न फोडण्याचा निर्णय : अनेक वर्षांपूर्वी धर्मपुरी जिल्ह्यातील एका गावानंही वटवाघुळांमुळे फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला होता. धर्मपुरी जिल्ह्यातील बालेनहल्ली गावात २०० हून अधिक लोक राहतात. शहरात तीन शतकं जुनी चिंचेची मोठी झाडं आणि एक वटवृक्ष आहे. सुमारे अर्धा एकर परिसरात पसरलेली ही झाडं दिसायला मोठी आहेत. शिवाय, या झाडांच्या भागात मुनिप्पन स्वामी मंदिर (तामिळनाडूचे ग्रामीण देवता) आहे. त्यांची परिसरातील लोक श्रद्धेनं पूजा करतात. मंदिराच्या वर असलेल्या चिंच आणि वटवृक्षांवर हजारो वटवाघुळं राहतात. वटवाघुळं रात्री भक्ष शोधतात आणि दिवसा परिसरातील झाडांचा आसरा घेतात. वटवाघुळांनी झाडांचा आश्रय घेतला असल्यानं परिसरातील ग्रामस्थ दिवाळीसह अन्य कोणत्याही सणाला फटाके फोडत नाहीत.

सलग १७व्या वर्षी फटाके न फोडता दिवाळी साजरी : तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील वेल्लोर पक्षी अभयारण्य सुमारे २४० एकर क्षेत्रात पसरलं आहे. या पक्षी अभयारण्याचं काही वर्षांपूर्वी २ कोटी ३५ लाख रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आलं. या पक्षी अभयारण्याच्या सभोवतालच्या १० हून अधिक गावांनी सलग १७व्या वर्षी फटाके न फोडता दिवाळी साजरी केली आहे.

हेही वाचा :

  1. Diwali Of Tharu Tribe : ना देवीची पूजा होते, ना फटाके फोडले जात; जाणून घ्या थारू आदिवासींच्या अनोख्या दिवाळीबाबत!
  2. Diwali 2023 : 'या' गावांमध्ये दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी! दिव्यांची आरासही करता येत नाही; वाचा काय आहे कारण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.