नवी दिल्ली : किशोरावस्थेतील मुले तरुण होतात तेव्हा पालकांनी दिलेल्या मुल्यांचा पाया त्यांच्या नातेसंबंधांवर ( Relationship between parents and children ) होतो. किशोरावस्थेत पालकांचा सहभाग, पालकांची कळकळ आणि प्रभावी शिस्त यातील बदल पालक आणि मुलांतील नातेसंबंध यांच्या गुणवत्तेवर अवलंबून ( Relationships With Children ) असतात. याचे परीक्षण करणारा हा पहिला अभ्यास आहे. असे मानवी विकास आणि कौटुंबिक अभ्यासाचे प्राध्यापक आणि सहयोगी ग्रेग फॉस्को यांनी सांगितले. या अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच डेव्हलपमेंटल सायकॉलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहेत.
नात्यांत दुरावा : "संशोधनातून असे दिसून आले आहे की किशोरवयीन काळात पालकत्व खूप बदलू शकते पालक सहसा कमी प्रेमळपणा आणि प्रेम व्यक्त ( need to express concern with children ) करतात. त्यांच्या किशोरवयीन मुलांसोबत कमी वेळ घालवतात. त्यांच्या शिस्तीत अधिक कठोर होतात. सकारात्मक पालकत्व आणि सहभाग टिकवून ठेवण्यास सक्षम असलेले पालक जेव्हा त्यांच्या मुलांशी असे वागतात तेव्हा जवळच्या नातेसंबंधाचा पाया बिघडतो,” फॉस्को म्हणाले.
काळजी व्यक्त करण्याची गरज : आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सांगण्याची हा एक उत्तम प्रकार आहे. जसे की 'मी तुझ्यावर प्रेम करतो' किंवा 'मला तुझी काळजी आहे' किंवा मिठी मारणे, पाठीवर थाप देणे यासारखे शारीरिक अभिव्यक्ती गरजेच्या असतात असे संशोधकांचे म्हणणे आहे. असे केल्यास त्यांची मुले 20 वर्षांची असताना कमी विवाद होतात.
ओरडणे टाळले पाहिजे : कॉनकॉर्डिया विद्यापीठातील मानसशास्त्र विभागातील पोस्टडॉक्टरल फेलो आणि एडना बेनेट पियर्स प्रिव्हेंशन रिसर्चचे माजी पोस्टडॉक्टरल फेलो शिचेन फॅंगम्हणाले की "पालकांनी त्यांच्या किशोरवयीन मुलांसोबत कठोर वागणे, ओरडणे टाळले पाहिजे ( avoid Shout on children ) आणि शांत राहण्यासाठी आणि कौटुंबिक नियमांचे पालन करण्यासाठी विचार केले पाहिजे". मोठ्य़ा व्यक्तीसमोर आदरांची वागणूक मिळावी असे मुलांना वाटत असते.
निर्णय घेण्यामध्ये मुलांचा समावेश : जेव्हा योग्य असेल तेव्हा, कौटुंबिक नियमांबद्दल निर्णय घेण्यामध्ये किशोरवयीन मुलांचा समावेश करणे गरजेचे ( Involve children in decision making ) आहे. जसे की घरात उशीरा येण्याच्या नियमांमध्ये बदल करणे. "जेव्हा पालक या निर्णयांमध्ये त्यांच्या किशोरवयीन मुलांचा समावेश करू शकतात, तेव्हा ते ठरवलेल्या गोष्टींसह जाण्याची अधिक शक्यता असते," असे फॉस्को यांचे म्हणणे आहे.