ETV Bharat / bharat

Buddha Purnima : इतरांच्या कल्याणासाठी जीवन समर्पित करा, बुद्ध पोर्णिमेनिमित्त दलाई लामांचा अनुयायांना संदेश

author img

By

Published : May 5, 2023, 9:51 AM IST

बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी अनुयायांना भगवान बुद्धांच्या जयंतीनिमित्त संदेश दिला आहे. आपल्या अनुयायांनी इतरांच्या कल्याणासाठी समर्पित जीवन जगण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला आहे.

Buddha Purnima 2023
अनुयायांना संदेश देताना दलाई लामा

हैदराबाद : इतरांच्या कल्याणासाठी जीवन समर्पित करण्याचा संदेश तिबेटचे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी त्यांच्या अनुयायांना दिला आहे. वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. त्यामुळे भगवान बुद्धांची जयंती वैशाख पोर्णिमेला साजरी करण्यात येते. भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्तीचा अनोखा योग वैशाख पौर्णिमेला असल्याने दलाई लामा यांनी त्यांच्या अनुयायांना हा विशेष संदेश दिला. यात त्यांनी इतर बौद्धांना अर्थपूर्ण जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

धर्मग्रंथात बोधगयाला विशेष महत्व : भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्तीच्या या शुभ स्मरणार्थ जगभरातील बौद्ध बांधवांना माझ्या शुभेच्छा देताना आनंद होत आहे, असे दलाई लामा म्हणाले. बोधगयाला आपल्या धर्मग्रंथांमध्ये विशेष स्थान असल्याने ओळखले जाते. बोधगया आपल्या आध्यात्मिक परंपरेत बौद्ध तीर्थक्षेत्रांपैकी सर्वात पवित्र स्थान असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. येथेच बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर भगवान बुद्धांनी चार उदात्त सत्ये, आत्मज्ञानाचे सदतीस घटकांसह शिकवण दिली. भगवान बुद्धांच्या शिकवणीची गुरुकिल्ली म्हणजे मनाला शिस्त लावण्याची शिकवण असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बुद्धाची शिकवण जगाला शांती देते : बुद्धाच्या शिकवणीचे हृदय म्हणजे करुणा आणि ज्ञानांचा एकत्रित सराव असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. चित्ताची एकाग्रता, ज्ञानप्राप्त करणारा परोपकारी आत्मा, हे त्यांच्या सर्व शिकवणीचे सार आहे. इतरांच्या कल्याणाची काळजी आपण जितकी घेऊ तितके आपण इतरांना आपल्यापेक्षा प्रिय समजू असेही त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही एकमेकांवरचे आमचे अवलंबित्व ओळखून जगातील 8 अब्ज नागरिक आनंदी राहण्याचे इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आध्यात्मिक बंधू भगिनींनी अर्थपूर्ण जीवन जगले पाहिजे. त्यासह त्यांनी इतरांच्या कल्याणासाठी समर्पित राहण्याची विनंती करतो. जगातील शांतता ही सौहार्दाची गुरुकिल्ली आहे, असे दलाई लामा यांनी आपल्या विशेष संदेशात म्हटले आहे.

आज बुद्ध पौर्णिमा : आज देशभरात बुद्ध पोर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. वैशाख पौर्णिमा हा बुद्धाचा जन्म, ज्ञान आणि मृत्यू यांचे स्मरण करणारा दिवस आहे. एक धर्म म्हणून बौद्ध धर्म आणि तत्वज्ञान बुद्धाच्या शिकवणीतून विकसित झाले. ब्रिटानिका विश्वकोशानुसार बुद्ध या नावाचा अर्थ संस्कृतमध्ये जागृत व्यक्ती असा होतो. भगवान बुद्ध भारतात 6 व्या शतकाच्या मध्यापासून आणि 4 व्या शतकाच्या मध्यापर्यंत वास्तव्य करत होते. त्यांची शिकवण भारतापासून मध्य आणि आग्नेय आशिया, चीन, कोरिया आणि जपानपर्यंत पसरली. आशियातील अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात तत्त्वज्ञानाची मध्यवर्ती भूमिका आहे. प्राचीन बौद्ध धर्मग्रंथ आणि सिद्धांत प्राचीन भारतातील अनेक जवळून संबंधित साहित्यिक भाषांमध्ये विकसित झाले.

हेही वाचा - Aligarh Crime : यमुना एक्सप्रेस वेवर यूट्यूबर अगस्त्य चौहानचा मृत्यू, बाईक रायडिंग स्पर्धेतून खून झाल्याचा कुटुंबाचा आरोप

हैदराबाद : इतरांच्या कल्याणासाठी जीवन समर्पित करण्याचा संदेश तिबेटचे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी त्यांच्या अनुयायांना दिला आहे. वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. त्यामुळे भगवान बुद्धांची जयंती वैशाख पोर्णिमेला साजरी करण्यात येते. भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्तीचा अनोखा योग वैशाख पौर्णिमेला असल्याने दलाई लामा यांनी त्यांच्या अनुयायांना हा विशेष संदेश दिला. यात त्यांनी इतर बौद्धांना अर्थपूर्ण जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

धर्मग्रंथात बोधगयाला विशेष महत्व : भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्तीच्या या शुभ स्मरणार्थ जगभरातील बौद्ध बांधवांना माझ्या शुभेच्छा देताना आनंद होत आहे, असे दलाई लामा म्हणाले. बोधगयाला आपल्या धर्मग्रंथांमध्ये विशेष स्थान असल्याने ओळखले जाते. बोधगया आपल्या आध्यात्मिक परंपरेत बौद्ध तीर्थक्षेत्रांपैकी सर्वात पवित्र स्थान असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. येथेच बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर भगवान बुद्धांनी चार उदात्त सत्ये, आत्मज्ञानाचे सदतीस घटकांसह शिकवण दिली. भगवान बुद्धांच्या शिकवणीची गुरुकिल्ली म्हणजे मनाला शिस्त लावण्याची शिकवण असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बुद्धाची शिकवण जगाला शांती देते : बुद्धाच्या शिकवणीचे हृदय म्हणजे करुणा आणि ज्ञानांचा एकत्रित सराव असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. चित्ताची एकाग्रता, ज्ञानप्राप्त करणारा परोपकारी आत्मा, हे त्यांच्या सर्व शिकवणीचे सार आहे. इतरांच्या कल्याणाची काळजी आपण जितकी घेऊ तितके आपण इतरांना आपल्यापेक्षा प्रिय समजू असेही त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही एकमेकांवरचे आमचे अवलंबित्व ओळखून जगातील 8 अब्ज नागरिक आनंदी राहण्याचे इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आध्यात्मिक बंधू भगिनींनी अर्थपूर्ण जीवन जगले पाहिजे. त्यासह त्यांनी इतरांच्या कल्याणासाठी समर्पित राहण्याची विनंती करतो. जगातील शांतता ही सौहार्दाची गुरुकिल्ली आहे, असे दलाई लामा यांनी आपल्या विशेष संदेशात म्हटले आहे.

आज बुद्ध पौर्णिमा : आज देशभरात बुद्ध पोर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. वैशाख पौर्णिमा हा बुद्धाचा जन्म, ज्ञान आणि मृत्यू यांचे स्मरण करणारा दिवस आहे. एक धर्म म्हणून बौद्ध धर्म आणि तत्वज्ञान बुद्धाच्या शिकवणीतून विकसित झाले. ब्रिटानिका विश्वकोशानुसार बुद्ध या नावाचा अर्थ संस्कृतमध्ये जागृत व्यक्ती असा होतो. भगवान बुद्ध भारतात 6 व्या शतकाच्या मध्यापासून आणि 4 व्या शतकाच्या मध्यापर्यंत वास्तव्य करत होते. त्यांची शिकवण भारतापासून मध्य आणि आग्नेय आशिया, चीन, कोरिया आणि जपानपर्यंत पसरली. आशियातील अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात तत्त्वज्ञानाची मध्यवर्ती भूमिका आहे. प्राचीन बौद्ध धर्मग्रंथ आणि सिद्धांत प्राचीन भारतातील अनेक जवळून संबंधित साहित्यिक भाषांमध्ये विकसित झाले.

हेही वाचा - Aligarh Crime : यमुना एक्सप्रेस वेवर यूट्यूबर अगस्त्य चौहानचा मृत्यू, बाईक रायडिंग स्पर्धेतून खून झाल्याचा कुटुंबाचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.