ETV Bharat / bharat

पालक आणि विद्यार्थ्यांच्या सततच्या दबावामुळे जेईई, एनईईटी परीक्षा होणार : शिक्षणमंत्री

author img

By

Published : Aug 26, 2020, 6:35 PM IST

कोविड - 19 च्या फैलावामुळे देशभरातील महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, 'पालक व विद्यार्थ्यांच्या सततच्या दबावामुळे' या परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे, असे शासकीय प्रसार वाहिनी डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक म्हणाले.

शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक
शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक

नवी दिल्ली - संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) आणि राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (एनईईटी-यूजी) सप्टेंबरमध्ये वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनीही या विषयावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा प्रथमच जाहीरपणे बचाव केला.

कोविड - 19 च्या फैलावामुळे देशभरातील महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, 'पालक व विद्यार्थ्यांच्या सततच्या दबावामुळे' या परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे, असे शासकीय प्रसार वाहिनी डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत निशांक म्हणाले.

जेईई परीक्षेला बसणाऱ्या 80 टक्के विद्यार्थ्यांनी आधीपासूनच प्रवेशपत्रे डाउनलोड केली आहेत, असे ते म्हणाले. 'आणखी किती काळ अभ्यास करत रहावा लागेल, या चिंतेत विद्यार्थी होते,' असे शिक्षणमंत्र्यांनी डीडी न्यूजला सांगितले. दरम्यान, जगात आणि देशात कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन सर्व व्यवस्था केली जाईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - अयोध्या मशीद निर्माणासाठी IICF लोगो जारी, ही आहेत खास वैशिष्ट्ये

"आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. त्यांची सुरक्षा प्रथम येते, नंतर त्यांचे शिक्षण," निशांक म्हणाले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सांगितले की, परीक्षा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत. यात परीक्षा केंद्रांची संख्या वाढविणे, पर्यायी आसन योजना, प्रत्येक खोलीत मर्यादित उमेदवार, प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या रस्त्यावर गर्दी होऊ न देणे यांचा यात समावेश आहे.

संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. तर, राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट - एनईईटी-यूजी) 13 सप्टेंबरला होण्याचे नियोजित केले आहे.

"जेईई मुख्य परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्याही 570 वरून 660 वर नेण्यात आली आहे. तर, नीट (एनईईटी)साठी ही संख्या 2,546 वरून 3,843 नेण्यात आली आहे. जेईई- मुख्य परीक्षा ही संगणक-आधारित चाचणी आहे. तर, नीट (एनईईटी) ही लेखन स्वरूपातील परीक्षा आहे,' एसे एनटीएने निवेदनात म्हटले आहे.

जेईई मुख्य परीक्षेसाठी एकूण 9.53 लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे. तर, एनईईटीसाठी 15.97 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

नवी दिल्ली - संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) आणि राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (एनईईटी-यूजी) सप्टेंबरमध्ये वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनीही या विषयावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा प्रथमच जाहीरपणे बचाव केला.

कोविड - 19 च्या फैलावामुळे देशभरातील महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, 'पालक व विद्यार्थ्यांच्या सततच्या दबावामुळे' या परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे, असे शासकीय प्रसार वाहिनी डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत निशांक म्हणाले.

जेईई परीक्षेला बसणाऱ्या 80 टक्के विद्यार्थ्यांनी आधीपासूनच प्रवेशपत्रे डाउनलोड केली आहेत, असे ते म्हणाले. 'आणखी किती काळ अभ्यास करत रहावा लागेल, या चिंतेत विद्यार्थी होते,' असे शिक्षणमंत्र्यांनी डीडी न्यूजला सांगितले. दरम्यान, जगात आणि देशात कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन सर्व व्यवस्था केली जाईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - अयोध्या मशीद निर्माणासाठी IICF लोगो जारी, ही आहेत खास वैशिष्ट्ये

"आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. त्यांची सुरक्षा प्रथम येते, नंतर त्यांचे शिक्षण," निशांक म्हणाले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सांगितले की, परीक्षा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत. यात परीक्षा केंद्रांची संख्या वाढविणे, पर्यायी आसन योजना, प्रत्येक खोलीत मर्यादित उमेदवार, प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या रस्त्यावर गर्दी होऊ न देणे यांचा यात समावेश आहे.

संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. तर, राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट - एनईईटी-यूजी) 13 सप्टेंबरला होण्याचे नियोजित केले आहे.

"जेईई मुख्य परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्याही 570 वरून 660 वर नेण्यात आली आहे. तर, नीट (एनईईटी)साठी ही संख्या 2,546 वरून 3,843 नेण्यात आली आहे. जेईई- मुख्य परीक्षा ही संगणक-आधारित चाचणी आहे. तर, नीट (एनईईटी) ही लेखन स्वरूपातील परीक्षा आहे,' एसे एनटीएने निवेदनात म्हटले आहे.

जेईई मुख्य परीक्षेसाठी एकूण 9.53 लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे. तर, एनईईटीसाठी 15.97 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.