हैदराबाद - हैदराबाद, कर्नाटक, मुंबई येथे जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे पाण्याचा निचरा होण्याची समस्या निर्माण झाली. त्यात अनेकांचा जीव गेला आहे. शहरात पूर येण्याची समस्या काही नवीन नाही. मात्र, आता शहरी पुराची समस्या अधिकाधिक वाढत चालली आहे. दिवसेंदिवस शहरातील सामाजिक-पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. पुरामुळे शहरात वाहतूक कोंडी आणि जनजीवनात अडथळे येत आहेत.
पूर वर्षे -
- हैदराबाद - 1908, 1930, 1954, 1962, 1970, 2001 आणि 2012, 2020
- दिल्ली - 1924, 1947, 1967, 1971, 1975, 1976, 1988, 1993, 1995, 1998, 2002, 2003, 2009, 2010, 2011, 2013
- चेन्नई - 1943, 1976, 1985, 1996, 2005, 2004, 2015
- मुंबई - 2000, 2005, 2008, 2009, 2010
- कोलकाता - 1978, 2007
- सुरत - 2006
- जमशेदपूर - 2008
- गुवाहटी - 2010
- जयपूर - 2012
- जम्मू काश्मीर - 2014
- केरळ - 2018
हैदराबादमधील सांडपाणी व्यवस्थापन -
शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाची रचना (ड्रेनेज सिस्टम) प्रती तासानुसार 12 मिमी पाऊस गृहीत धरून केली आहे. झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे सांडपाणी वाहून नेणारे मार्ग एकतर अडवले गेले किंवा त्यावर नागरिकांनी अतिक्रमण केले.
ज्या ठिकाणी पाणी तुंबते, ते भाग कमी करण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. त्यासाठी घरांची रचना, उभी आणि आडवी एकरेषीय हवी. काही ठिकाणीच्या इमारती नव्या ठिकाणी हलवायला हव्यात.
दीर्घ काळाचा विचार करता, शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नव्याने ड्रेनेज व्यवस्था बांधण्यात यावी. हैदराबाद शहराचा विचार करता, मुशी नदीत पावसाचे पाणी जाण्याकरीता, उंच किंवा सखल भागातही सांडपाण्याची व्यवस्थाही उभारावी.
दीर्घकाळातील उपाययोजना या वेळखाऊ आणि खर्चिक आहे. त्यामुळे अल्पकालीन आणि दीर्घकालीन योजनेचा मेळ घालून सांडपाणी व्यवस्था करायला हवी.
ड्रेनेज सिस्टम धोक्यात
भारतात सांडपाण्याच्या स्थितीकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. बर्याच शहरांमध्ये ड्रेनेज सिस्टम धोक्यात आहे. घनकचऱ्याचे ढीग हटवण्याबरोबरच प्रतिबंधात्मक देखभाल न केल्याने नाल्यांना अडचणी येत आहेत. शहराचा विकास करताना नैसर्गिक ओढे, नाले, हंगामी नद्या आणि त्यांची पूरक्षेत्रे यांचा विचार कधीच केला जात नाही. मात्र, जेव्हा शहरात पूर येतो, तेव्हा या नाल्यांचे, जलसाठ्यांचे महत्त्व लक्षात येते.
2018-2019मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) राज्यातील प्रमुख शहरे आणि केंद्रशासित प्रदेशातील पावसाचा अभ्यास केला होता. त्यानुसार प्रत्येक शहरामध्ये 50 मिमी प्रती तास पाऊस पडल्याचे समोर आले. 2018-2019 वर्षात भूवनेश्वरमध्ये 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला होता.
25 जून 2018 ला कोलकातामध्ये 160 मिमी पाऊस झाला होता.
24 जून 2018ला मुंबईमध्ये 230 मिमी पावसाची नोंद झाली होती. जोपर्यंत सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची क्षमता वाढवण्यात येत नाही. तोपर्यंत पूरपरिस्थितीमध्ये सुधारणा होणार नाहीत, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मुंबईसारख्या शहरात पावसाळ्यात पूर येणे नित्याचे झाले आहे. पूर येऊ नये यासाठी नाले आणि गटारे यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करणे गरजचे आहे.