ETV Bharat / bharat

Top 10 @ 9 AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

author img

By

Published : Sep 5, 2020, 8:59 AM IST

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 At 9 AM
सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या
  • मुंबई - थोर भारतीय तत्वज्ञ, विद्वान आणि राजकारणी सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज १३२वी जयंती आहे. त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. राधाकृष्णन यांनी १९०९ ते १९४८ पर्यंत शै‍क्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १९८८ रोजी ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रांतातील तिरुत्तानी येथे झाला. त्यांच्या तत्वज्ञानाचा आणि उपदेशाचा जगभरात मोठा परिणाम झाला.

सविस्तर वाचा- दिनविशेष : कोरोनाकाळातील 'शिक्षक दिन'

  • पालघर -लॉकडाऊननंतर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. सध्या त्यावर अंमल सुरू असून सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र या ऑनलाइन शिक्षणाचा फटका अतिदुर्गम, ग्रामीण, भागातील विद्यार्थ्यांना बसल्याचे पाहायला मिळले. तरीही या अडथळ्यांवर मात करत पालघरमध्ये एक अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे.

सविस्तर वाचा- असेही शिक्षक...मोखाड्यातील अतिदुर्गम भागात स्पीकरच्या माध्यमातून भरते बोलकी शाळा

  • शिरूर (पुणे) - जीवनाला दिशा देण्यात आणि माणसाच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. त्यामुळेच शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात आहे. विविध देशांत वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो भारतात शिक्षक दिन ५ सप्टेंबरला साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस. त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली.

सविस्तर वाचा- शिक्षक दिन : कोरोनाच्या संकटातही वाबळेवाडीच्या गुरुजनांचे ज्ञानदान; 'ग्रुप होम स्कूल'चा यशस्वी प्रयोग

  • मुंबई - आधी मुंबई पोलीस आणि त्यानंतर थेट मुंबई शहराची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना रणौतचा सूर अखेर काहीसा मवाळ झाला आहे. मुंबईबाबत तिने केलेल्या वक्तव्याबाबत टिकेची धनी झालेल्या कंगनाने 'मुंबई ही माझी कर्मभूमी असून मी तिला मैय्या यशोदेप्रमाणे मानते, मात्र माझे या शहरावर किती प्रेम आहे याचे प्रमाण मला इतरांना देण्याची गरज नाही.' असे ट्विट करून सारवासारव तिने करण्याचा प्रयत्न केला आहे.

सविस्तर वाचा- कंगनाचा सूर नरमला, म्हणे 'मुंबई हीच माझी कर्मभूमी तिच माझी यशोदा मैय्या'

  • मुंबई - शुक्रवारी कोरोनाचे १९२९ नवे रुग्ण आढळून आले असून ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २८ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये २५ पुरुष तर १० महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ५२ हजार २४ वर पोहोचला आहे.

सविस्तर वाचा- मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत तिसऱ्या दिवशीही वाढ, २४ तासात नव्या १९२९ रुग्णांची नोंद

  • जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ शहरातील न्यू एरिया वॉर्डातील एका 53 वर्षीय अत्यवस्थ महिलेस सव्वातास प्रतीक्षा करूनही रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी तिला चक्क हातगाडीवर झोपवून रुग्णालयामध्ये नेले. हा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री साडेदहा वाजता घडला. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
    सविस्तर वाचा- धक्कादायक : अत्यवस्थ महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने हातगाडीवरून नेले रुग्णालयात!
  • मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात झाडे पडण्याच्या घटना घडतात. अशा दुर्घटनेत नागरिक जखमी होण्याच्या तसेच मृत्यू होण्याच्या घटना घडतात. अशीच एक घटना लोअर परळ येथे घडली आहे. अंगावर झाड पडून एका ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

सविस्तर वाचा- लोअर परळ येथे अंगावर झाड कोसळून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू

  • नागपूर - शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून आज अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्याकडून हा पदभार स्वीकारण्यात आला. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, हाच मुख्य उद्देश असल्याचे मतही अमितेश कुमार यांनी यावेळी मांडले. पोलीस आयुक्त कार्यालयात हा पदभार स्वीकारण्यात आला.

सविस्तर वाचा- नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी स्वीकारला पदभार

  • उस्मानाबाद - सॅनिटायझरची गरज लक्षात घेऊन जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी घरोघरी जाऊन मोफत सॅनिटायझर वाटले आहेत. परंतु, सध्या या सॅनिटायझरचा हात निर्जंतूक करण्यासाठी कमी अन् चूल पेटवण्यासाठी जास्त वापर केला जात आहे.

सविस्तर वाचा- सॅनिटायझरचा वापर भलत्याच कामासाठी, 'हे' वाचाल तर धक्का बसेल..!

  • हैदराबाद- भारतात सध्या कोरोनाची एकूण ३९ लाख ३६ हजार ७४७ प्रकरणे आढळली असून ६८ हजार ४७२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असले तरी भारतात लोकांचा बरे होण्याचा दरही सतत वाढत आहे. आता हा दर ७७.१ टक्के असा आहे.

सविस्तर वाचा- भारतातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

  • मुंबई - थोर भारतीय तत्वज्ञ, विद्वान आणि राजकारणी सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज १३२वी जयंती आहे. त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. राधाकृष्णन यांनी १९०९ ते १९४८ पर्यंत शै‍क्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १९८८ रोजी ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रांतातील तिरुत्तानी येथे झाला. त्यांच्या तत्वज्ञानाचा आणि उपदेशाचा जगभरात मोठा परिणाम झाला.

सविस्तर वाचा- दिनविशेष : कोरोनाकाळातील 'शिक्षक दिन'

  • पालघर -लॉकडाऊननंतर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. सध्या त्यावर अंमल सुरू असून सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र या ऑनलाइन शिक्षणाचा फटका अतिदुर्गम, ग्रामीण, भागातील विद्यार्थ्यांना बसल्याचे पाहायला मिळले. तरीही या अडथळ्यांवर मात करत पालघरमध्ये एक अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे.

सविस्तर वाचा- असेही शिक्षक...मोखाड्यातील अतिदुर्गम भागात स्पीकरच्या माध्यमातून भरते बोलकी शाळा

  • शिरूर (पुणे) - जीवनाला दिशा देण्यात आणि माणसाच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. त्यामुळेच शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात आहे. विविध देशांत वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो भारतात शिक्षक दिन ५ सप्टेंबरला साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस. त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली.

सविस्तर वाचा- शिक्षक दिन : कोरोनाच्या संकटातही वाबळेवाडीच्या गुरुजनांचे ज्ञानदान; 'ग्रुप होम स्कूल'चा यशस्वी प्रयोग

  • मुंबई - आधी मुंबई पोलीस आणि त्यानंतर थेट मुंबई शहराची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना रणौतचा सूर अखेर काहीसा मवाळ झाला आहे. मुंबईबाबत तिने केलेल्या वक्तव्याबाबत टिकेची धनी झालेल्या कंगनाने 'मुंबई ही माझी कर्मभूमी असून मी तिला मैय्या यशोदेप्रमाणे मानते, मात्र माझे या शहरावर किती प्रेम आहे याचे प्रमाण मला इतरांना देण्याची गरज नाही.' असे ट्विट करून सारवासारव तिने करण्याचा प्रयत्न केला आहे.

सविस्तर वाचा- कंगनाचा सूर नरमला, म्हणे 'मुंबई हीच माझी कर्मभूमी तिच माझी यशोदा मैय्या'

  • मुंबई - शुक्रवारी कोरोनाचे १९२९ नवे रुग्ण आढळून आले असून ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २८ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये २५ पुरुष तर १० महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ५२ हजार २४ वर पोहोचला आहे.

सविस्तर वाचा- मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत तिसऱ्या दिवशीही वाढ, २४ तासात नव्या १९२९ रुग्णांची नोंद

  • जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ शहरातील न्यू एरिया वॉर्डातील एका 53 वर्षीय अत्यवस्थ महिलेस सव्वातास प्रतीक्षा करूनही रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी तिला चक्क हातगाडीवर झोपवून रुग्णालयामध्ये नेले. हा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री साडेदहा वाजता घडला. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
    सविस्तर वाचा- धक्कादायक : अत्यवस्थ महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने हातगाडीवरून नेले रुग्णालयात!
  • मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात झाडे पडण्याच्या घटना घडतात. अशा दुर्घटनेत नागरिक जखमी होण्याच्या तसेच मृत्यू होण्याच्या घटना घडतात. अशीच एक घटना लोअर परळ येथे घडली आहे. अंगावर झाड पडून एका ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

सविस्तर वाचा- लोअर परळ येथे अंगावर झाड कोसळून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू

  • नागपूर - शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून आज अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्याकडून हा पदभार स्वीकारण्यात आला. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, हाच मुख्य उद्देश असल्याचे मतही अमितेश कुमार यांनी यावेळी मांडले. पोलीस आयुक्त कार्यालयात हा पदभार स्वीकारण्यात आला.

सविस्तर वाचा- नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी स्वीकारला पदभार

  • उस्मानाबाद - सॅनिटायझरची गरज लक्षात घेऊन जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी घरोघरी जाऊन मोफत सॅनिटायझर वाटले आहेत. परंतु, सध्या या सॅनिटायझरचा हात निर्जंतूक करण्यासाठी कमी अन् चूल पेटवण्यासाठी जास्त वापर केला जात आहे.

सविस्तर वाचा- सॅनिटायझरचा वापर भलत्याच कामासाठी, 'हे' वाचाल तर धक्का बसेल..!

  • हैदराबाद- भारतात सध्या कोरोनाची एकूण ३९ लाख ३६ हजार ७४७ प्रकरणे आढळली असून ६८ हजार ४७२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असले तरी भारतात लोकांचा बरे होण्याचा दरही सतत वाढत आहे. आता हा दर ७७.१ टक्के असा आहे.

सविस्तर वाचा- भारतातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.