ETV Bharat / bharat

तेलंगणामध्ये ट्रक-पिकअपचा भीषण अपघात,  6 ठार, 6 जखमी - तेलंगाणामध्ये अपघात

कोरोना विषाणूमुळे देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कामगार आपल्या घरी परतत होते. मिनी ट्रकमध्ये प्रवास करणारे ३० जण रस्ता बांधकाम मजूर होते. ते सर्वजण तेलंगाणामधील सूर्यापेठ येथून कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात आपल्या घरी परत जात होते.

six karnataka people died in Accident at shamshabad
six karnataka people died in Accident at shamshabad
author img

By

Published : Mar 28, 2020, 8:11 AM IST

Updated : Mar 28, 2020, 9:51 AM IST

हैदराबाद - तेलंगणामधील शमशाबाद येथे ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू तर अन्य 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडला.

कोरोना विषाणूमुळे देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कामगार आपल्या घरी परतत होते. मिनी ट्रकमध्ये प्रवास करणारे ३० जण रस्ता बांधकाम मजूर होते. ते सर्वजण तेलंगणामधील सूर्यापेठ येथून कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात आपल्या घरी परत जात होते.

दरम्यान, मोदींनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून ते येत्या 14 एप्रिलपर्यंत म्हणजेच 21 दिवस नागरिकांना जेथे आहे, तेथेच घरामध्ये थांबण्यास सांगितले आहे. कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण आणण्यासाठी लोकांनी जिथे आहे तिथेच राहणे आणि जनसंपर्क टाळणे आवश्यक आहे. या परिस्थितीत प्रवास करणे किंवा एका शहरातून दुसऱ्या शहराकडे किंवा गावांकडे जाणे धोकादायक आहे. यामुळे अनेक लोकांमध्ये हा संसर्ग फैलावण्याची शक्यता वाढते. मात्र, लोक अद्यापही स्थलांतर करण्यास प्राधान्य देत आहेत. सर्वच लोक 'लॉक डाऊन'चा उद्देश लक्षात घेत नसल्याचे दिसत आहे.

हैदराबाद - तेलंगणामधील शमशाबाद येथे ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू तर अन्य 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडला.

कोरोना विषाणूमुळे देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कामगार आपल्या घरी परतत होते. मिनी ट्रकमध्ये प्रवास करणारे ३० जण रस्ता बांधकाम मजूर होते. ते सर्वजण तेलंगणामधील सूर्यापेठ येथून कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात आपल्या घरी परत जात होते.

दरम्यान, मोदींनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून ते येत्या 14 एप्रिलपर्यंत म्हणजेच 21 दिवस नागरिकांना जेथे आहे, तेथेच घरामध्ये थांबण्यास सांगितले आहे. कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण आणण्यासाठी लोकांनी जिथे आहे तिथेच राहणे आणि जनसंपर्क टाळणे आवश्यक आहे. या परिस्थितीत प्रवास करणे किंवा एका शहरातून दुसऱ्या शहराकडे किंवा गावांकडे जाणे धोकादायक आहे. यामुळे अनेक लोकांमध्ये हा संसर्ग फैलावण्याची शक्यता वाढते. मात्र, लोक अद्यापही स्थलांतर करण्यास प्राधान्य देत आहेत. सर्वच लोक 'लॉक डाऊन'चा उद्देश लक्षात घेत नसल्याचे दिसत आहे.

Last Updated : Mar 28, 2020, 9:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.