ETV Bharat / bharat

कानपूरमध्ये अपहरणाची घटना... कायदा सुव्यवस्थेवरून प्रियांका गांधींची योगी सरकारवर टीका

राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. गुंड विकास दुबे प्रकरणावरून वादळ उठलेले असताना कानपूरमध्ये अपहरणाची घटना समोर आली आहे.

author img

By

Published : Jul 15, 2020, 4:41 PM IST

प्रियंका गांधी
प्रियंका गांधी

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पुन्हा योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. कानपूरमध्ये अपहरकर्त्याला खंडणी देण्यास पोलिसांनीच सांगितल्याचा आरोप त्यांनी ठेवला आहे. राज्यात विकास दुबे चकमक प्रकरणावरून वादळ उठलेले असतानाचा कायदा सुव्यवस्थेवरून त्यांनी पुन्हा सरकारवर टीका केली.

फेसबुकवरून त्यांनी योगी सरकारवर निशाणा साधला. 'कानपूरमध्ये एका तरुणाचे अपहरण करुन कुटुंबीयांकडे 30 लाख खंडणी मागीतली होती. कुटुंबीयांनी घर आणि सोने विकून 30 लाखांची व्यवस्था केली. पोलिसांच्या सांगण्यावरून पैशांची बॅग अपहरणकर्त्यांना देण्यात आली. मात्र, पोलिसांनी अपहरणकर्त्याला अटकही केली नाही अन् तरुणाची सुटकाही केली नाही. या घटनेनंतर कुटुंबीय अतीव दु: खात आहेत. हेच ते कानपूर, जेथे काही दिवसांपूर्वी मोठी घटना घडली होती. यावरून उत्तरप्रदेशात कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे, याची तुम्ही कल्पना करु शकता, असे त्या म्हणाल्या.

कुटुंबीयांनी मुलाला सोडविण्यासाठी 30 लाखांची रक्कम जमा केली. अपहरणकर्त्यांनी सांगितल्यानुसार गुजैनी रेल्वे लाईनजवळ कुटुंबातील सदस्य पैसे घेवून गेला होता. मात्र, पोलिसांच्या जाळ्यातून अपहरणकर्ता पैसे घेवून पळून गेला. अपहरण झालेल्या तरुणालाही सोडविण्यात यश आले नाही.

संदीप सिंग असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव असून तो कानपूरमधील एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करतो. 22 जूनला त्याचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेनंतर संदीपचे वडील चमन सिंग यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तेव्हा पोलिसांनी खंडणीची रक्कम तयार ठेवण्यास सांगितले होते. मात्र, पैसे जाऊनही मुलगा माघारी मिळाला नाही. या प्रकरणावरून प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. कुटुंबीयांचा आक्रोश करताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पुन्हा योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. कानपूरमध्ये अपहरकर्त्याला खंडणी देण्यास पोलिसांनीच सांगितल्याचा आरोप त्यांनी ठेवला आहे. राज्यात विकास दुबे चकमक प्रकरणावरून वादळ उठलेले असतानाचा कायदा सुव्यवस्थेवरून त्यांनी पुन्हा सरकारवर टीका केली.

फेसबुकवरून त्यांनी योगी सरकारवर निशाणा साधला. 'कानपूरमध्ये एका तरुणाचे अपहरण करुन कुटुंबीयांकडे 30 लाख खंडणी मागीतली होती. कुटुंबीयांनी घर आणि सोने विकून 30 लाखांची व्यवस्था केली. पोलिसांच्या सांगण्यावरून पैशांची बॅग अपहरणकर्त्यांना देण्यात आली. मात्र, पोलिसांनी अपहरणकर्त्याला अटकही केली नाही अन् तरुणाची सुटकाही केली नाही. या घटनेनंतर कुटुंबीय अतीव दु: खात आहेत. हेच ते कानपूर, जेथे काही दिवसांपूर्वी मोठी घटना घडली होती. यावरून उत्तरप्रदेशात कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे, याची तुम्ही कल्पना करु शकता, असे त्या म्हणाल्या.

कुटुंबीयांनी मुलाला सोडविण्यासाठी 30 लाखांची रक्कम जमा केली. अपहरणकर्त्यांनी सांगितल्यानुसार गुजैनी रेल्वे लाईनजवळ कुटुंबातील सदस्य पैसे घेवून गेला होता. मात्र, पोलिसांच्या जाळ्यातून अपहरणकर्ता पैसे घेवून पळून गेला. अपहरण झालेल्या तरुणालाही सोडविण्यात यश आले नाही.

संदीप सिंग असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव असून तो कानपूरमधील एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करतो. 22 जूनला त्याचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेनंतर संदीपचे वडील चमन सिंग यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तेव्हा पोलिसांनी खंडणीची रक्कम तयार ठेवण्यास सांगितले होते. मात्र, पैसे जाऊनही मुलगा माघारी मिळाला नाही. या प्रकरणावरून प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. कुटुंबीयांचा आक्रोश करताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.