ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशमध्ये युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू , प्रियंका गांधी यांचा भाजपवर हल्लाबोल

author img

By

Published : Oct 17, 2019, 11:20 PM IST

उत्तर प्रदेशमधील हापूर पोलीस कोठडीमध्ये युवकाचा मृत्यू झाला आहे. त्यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला

प्रियंका गांधी

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील हापूर येथील पोलीस कोठडीमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. त्यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. हापूरमध्ये एका शेतकऱ्यांच्या मुलाला पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्या लहान मुलाला खायला देऊन गप्प राहण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार खुपच लाजिरवाणा असल्याचे सांगत प्रियांका गांधी यांनी टि्वटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.


भाजप सरकार वाढती गुन्हेगारी थांबवण्यामध्ये पुर्णपणे अपयशी ठरले आहे. तर पोलिसांकडून नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना रोज घडत आहेत, असे प्रियंका यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

  • हापुड़ में एक किसान के बेटे को पुलिस ने टॉर्चर किया और उसकी जान चली गयी। उसके बेटे को पुलिस ने चिप्स का लालच देकर चुप रहने को कहा।

    शर्मनाक है ये।

    भाजपा सरकार अपराध रोक पाने में तो पूरी तरह नाकाम है। लेकिन पुलिस ज्यादती की घटनाएँ हर रोज आ रही हैं। https://t.co/28QVkxyUAo

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


हापूरमधील पिलखुवा भागात दोन महिन्यापूर्वी एका महिलेची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी एका युवकाला अटक केली होती. त्या युवकाचा गेल्या रविवारी कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांनी त्या युवकावर थर्ड डिग्री चार्ज केल्याची माहिती आहे. याप्रकरणी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडून उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील हापूर येथील पोलीस कोठडीमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. त्यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. हापूरमध्ये एका शेतकऱ्यांच्या मुलाला पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्या लहान मुलाला खायला देऊन गप्प राहण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार खुपच लाजिरवाणा असल्याचे सांगत प्रियांका गांधी यांनी टि्वटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.


भाजप सरकार वाढती गुन्हेगारी थांबवण्यामध्ये पुर्णपणे अपयशी ठरले आहे. तर पोलिसांकडून नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना रोज घडत आहेत, असे प्रियंका यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

  • हापुड़ में एक किसान के बेटे को पुलिस ने टॉर्चर किया और उसकी जान चली गयी। उसके बेटे को पुलिस ने चिप्स का लालच देकर चुप रहने को कहा।

    शर्मनाक है ये।

    भाजपा सरकार अपराध रोक पाने में तो पूरी तरह नाकाम है। लेकिन पुलिस ज्यादती की घटनाएँ हर रोज आ रही हैं। https://t.co/28QVkxyUAo

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


हापूरमधील पिलखुवा भागात दोन महिन्यापूर्वी एका महिलेची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी एका युवकाला अटक केली होती. त्या युवकाचा गेल्या रविवारी कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांनी त्या युवकावर थर्ड डिग्री चार्ज केल्याची माहिती आहे. याप्रकरणी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडून उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी करण्यात आले आहे.

Intro:Body:

िुि


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.