ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने पवन कुमारची याचिका फेटाळली

author img

By

Published : Mar 2, 2020, 11:51 AM IST

निर्भया प्रकरणातील चौथा दोषी पवन कुमारची सुधारती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

पवन कुमार
पवन कुमार

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील चौथा दोषी पवन कुमारची सुधारती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. पवनला या प्रकरणात फाशीची शिक्षा जाहीर झाली आहे. या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करावे, अशी मागणी त्याने या याचिकेमध्ये केली होती.

निर्भया प्रकरणातील दोषी आपली फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. पवननंतर दोषी अक्षय ठाकुरने पुन्हा एकदा दया याचिका दाखल केली आहे. फेटाळण्यात आलेल्या पहिल्या याचिकेमध्ये संपूर्ण तथ्य नव्हते, असे त्याने याचिकेमध्ये म्हटले आहे. त्याच्या याचिकेवरील निर्णय अद्याप यायचा बाकी आहे.

दरम्यान निर्भया प्रकरणातील दोषींना 3 मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने 17 फेब्रुवारीला ही तारीख जाहीर केली होती. त्यापूर्वी तीन वेळा संबंधित प्रकरणातील दोषींच्या फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

डिसेंबर 2012 मध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने यापूर्वी 11 मार्च 2013 मध्ये तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील चौथा दोषी पवन कुमारची सुधारती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. पवनला या प्रकरणात फाशीची शिक्षा जाहीर झाली आहे. या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करावे, अशी मागणी त्याने या याचिकेमध्ये केली होती.

निर्भया प्रकरणातील दोषी आपली फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. पवननंतर दोषी अक्षय ठाकुरने पुन्हा एकदा दया याचिका दाखल केली आहे. फेटाळण्यात आलेल्या पहिल्या याचिकेमध्ये संपूर्ण तथ्य नव्हते, असे त्याने याचिकेमध्ये म्हटले आहे. त्याच्या याचिकेवरील निर्णय अद्याप यायचा बाकी आहे.

दरम्यान निर्भया प्रकरणातील दोषींना 3 मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने 17 फेब्रुवारीला ही तारीख जाहीर केली होती. त्यापूर्वी तीन वेळा संबंधित प्रकरणातील दोषींच्या फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

डिसेंबर 2012 मध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने यापूर्वी 11 मार्च 2013 मध्ये तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.