नवी दिल्ली - येत्या १२ तारखेला देशामध्ये गुरुनानक यांची ५५० वी जंयती साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सम-विषम योजना ११ आणि १२ नोव्हेंबरला लागू नसेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
-
Delhi Chief Minister Arvind Kejriwal: In the light of celebrations of 550th Guru Nanak Dev ji anniversary, Delhi govt has decided that #OddEven scheme won't apply on 11th and 12th November. pic.twitter.com/RpwiKSgKQR
— ANI (@ANI) November 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi Chief Minister Arvind Kejriwal: In the light of celebrations of 550th Guru Nanak Dev ji anniversary, Delhi govt has decided that #OddEven scheme won't apply on 11th and 12th November. pic.twitter.com/RpwiKSgKQR
— ANI (@ANI) November 8, 2019Delhi Chief Minister Arvind Kejriwal: In the light of celebrations of 550th Guru Nanak Dev ji anniversary, Delhi govt has decided that #OddEven scheme won't apply on 11th and 12th November. pic.twitter.com/RpwiKSgKQR
— ANI (@ANI) November 8, 2019
हेही वाचा - ओडिशा : एक लाखाचे इनाम असलेल्या महिला माओवाद्याचे आत्मसमर्पण
दिल्लीमध्ये वातावरणातील वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने गाड्यांची ऑड-इव्हन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच 'सम' तारखेला 'सम' क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर धावतील तर, 'विषम' तारखेला 'विषम' क्रमांकाच्या गाड्या धावतील. ४ नोव्हेंबरपासून ही योजना लागू झाली आहे.
हेही वाचा - बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलांना वाचवण्यासाठी मदुराईतील व्यक्तीने बनवलं नाविन्यपूर्ण मशिन
'नमस्ते दिल्ली! प्रदूषण कमी करण्यासाठी आजपासून ऑड-इव्हन सुरू होत आहे. स्वतःसाठी आणि आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी तसेच, कुटुंबीयांच्या श्वासासाठी ऑड-इव्हन प्रणालीचे नक्की पालन करावे. आपल्या चारचाकी इतरांसोबत शेअर करा. यामुळे मैत्री वाढेल, नवी नाती नयार होतील, पेट्रोल वाचेल आणि प्रदूषणही कमी होईल. दिल्ली पुन्हा एकदा करून दाखवेल,' असे ट्विट केजरीवाल यांनी करत योजना सुरू केली होती.