ETV Bharat / bharat

'अजित डोवाल यांचे विधान चीन संदर्भात नाही', केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

author img

By

Published : Oct 26, 2020, 1:15 PM IST

अजित डोवाल यांचे विधान चीन संदर्भात नाही. तर भारताच्या अध्यात्मिक विचारांवर होते, असे केंद्र सरकारने म्हटलं आहे. ऋषीकेश येथील परमार्थ निकेतन आश्रमच्या कार्यक्रमाला अजित डोवाल यांनी संबोधीत केले होते. यावेळी भारताच्या सुरक्षेला धोका असेल तर भारत फक्त आपल्या भूमीत राहूनच लढणार नाही, तर परदेशात जाऊनही लढेल, असे विधान केले होते.

डोवाल
डोवाल

नवी दिल्ली - सध्या भारत आणि चीन दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहेत. यातच भारताच्या सुरक्षेला धोका असेल तर भारत फक्त आपल्या भूमीत राहूनच लढणार नाही, तर परदेशात जाऊनही लढेल, असे विधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले होते. अजित डोवाल यांच्या विधानावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. अजित डोवाल यांचे विधान चीन संदर्भात नाही. तर भारताच्या अध्यात्मिक विचारांवर होते, असे केंद्र सरकारने म्हटलं आहे.

अजित डोवाल यांनी कोणत्याही देशाचा किंवा विशिष्ट परिस्थितीचा उल्लेख करत, ते वक्तव्य केले नाही. ते चीन किंवा पूर्व लडाख प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाविषयी बोलत नव्हते, असे सरकारी अधिकाऱ्यांनी, काही माध्यमांचे अहवाल पाहिल्यानंतर स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले अजित डोवाल -

ऋषीकेश येथील परमार्थ निकेतन आश्रमच्या कार्यक्रमाला अजित डोवाल यांनी संबोधीत केले होते. व्यक्तीगत हितासाठी आपण कधीही कोणावर आक्रमण केलेले नाही. तुमच्या इच्छेनुसार नाही, तर धोक्याचे उगमस्थान असलेल्या ठिकाणी आम्ही लढू. तेव्हा आम्ही आमच्या भूमीवर आणि परकीय भूमीवरही लढू. मात्र, ही लढाई स्वार्थासाठी नाही. तर परमार्थासाठी असेल, असे डोवाल म्हणाले होते.

नवी दिल्ली - सध्या भारत आणि चीन दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहेत. यातच भारताच्या सुरक्षेला धोका असेल तर भारत फक्त आपल्या भूमीत राहूनच लढणार नाही, तर परदेशात जाऊनही लढेल, असे विधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले होते. अजित डोवाल यांच्या विधानावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. अजित डोवाल यांचे विधान चीन संदर्भात नाही. तर भारताच्या अध्यात्मिक विचारांवर होते, असे केंद्र सरकारने म्हटलं आहे.

अजित डोवाल यांनी कोणत्याही देशाचा किंवा विशिष्ट परिस्थितीचा उल्लेख करत, ते वक्तव्य केले नाही. ते चीन किंवा पूर्व लडाख प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाविषयी बोलत नव्हते, असे सरकारी अधिकाऱ्यांनी, काही माध्यमांचे अहवाल पाहिल्यानंतर स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले अजित डोवाल -

ऋषीकेश येथील परमार्थ निकेतन आश्रमच्या कार्यक्रमाला अजित डोवाल यांनी संबोधीत केले होते. व्यक्तीगत हितासाठी आपण कधीही कोणावर आक्रमण केलेले नाही. तुमच्या इच्छेनुसार नाही, तर धोक्याचे उगमस्थान असलेल्या ठिकाणी आम्ही लढू. तेव्हा आम्ही आमच्या भूमीवर आणि परकीय भूमीवरही लढू. मात्र, ही लढाई स्वार्थासाठी नाही. तर परमार्थासाठी असेल, असे डोवाल म्हणाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.