ETV Bharat / bharat

चौथ्या टप्प्यातही गंभीर गुन्हेगार रिंगणात; भाजप पहिल्या तर काँग्रेस 'या' स्थानावर

author img

By

Published : Apr 25, 2019, 8:32 PM IST

चौथ्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये उभ्या असलेल्या ९४३ उमेदवारांपैकी ९८२ उमेदवारांचा एडीआरने अभ्यास केला. उरलेल्या १५ उमेदवारांचे शपथपत्र स्पष्ट नसल्यामुळे त्यांना या अहवालातून वगळण्यात आले आहे. सर्व ९२८ उमेदवारांपैकी २०५ उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांतील आहेत.

सांकेतिक छायाचित्र

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आता देश चौथ्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. चौथ्या टप्प्यात ८ राज्यातील ७१ लोकसभा मतदार संघांसाठी २९ एप्रिलला मतदान होईल. यासाठी एकूण ९४३ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार तब्बल १७ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने या उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास केला. त्यावर एक नजर...


चौथ्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये उभ्या असलेल्या ९४३ उमेदवारांपैकी ९८२ उमेदवारांचा एडीआरने अभ्यास केला. उरलेल्या १५ उमेदवारांचे शपथपत्र स्पष्ट नसल्यामुळे त्यांना या अहवालातून वगळण्यात आले आहे. सर्व ९२८ उमेदवारांपैकी २०५ उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांतील आहेत. तर, ४८ उमेदवार हे स्थानिक पक्षांतील आणि ३४६ मान्यता प्राप्त नसलेले मात्र नोंदणीकृत पक्षातील आहेत.

एडीआरने या गुन्ह्यांचे ८ भागात वर्गिकरण केले आहे. त्यावरुन त्यांनी उमेदवारांची टक्केवरी ठरवली. यात सामान्य गुन्हे, गंभीर गुन्हे आणि दोषसिद्ध झालेले उमेदवार, हत्या, हत्येचा प्रयत्न करणारे आणि अपहरणाचा आरोप असलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय यात महिलांवर अत्याचार करणारे आणि उग्र भाषण करणाऱ्या उमेदवारांचाही समावेश आहे.

गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या उमेदवारांची संख्या -
चौथ्या टप्प्यामध्ये रिंगणात असलेल्या ९२८ उमेदवारांपैकी १५८ उमेदवार यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. म्हणजे एकूण १७ टक्के उमेदवार, असे आहेत की त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Chart3
गुन्ह्याचे प्रकार

गंभीर गुन्हे म्हणजे काय ?
एडीआरने गंभीर गुन्हे ठरवण्यासाठी काही मापदंड ठरवले आहेत. त्यानुसार
१. पाच किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेले उमेदवार.
२. अजामीनपात्र गुन्हे.
३. निवडणुकींशी संबंधीत गुन्हे.
४. सरकारी खजिन्याला नुकसान पोहोचवण्याचा अपराध.
५. हल्ला, हत्या, अपहरण आणि बलात्कार या सारखे गुन्हे.
६. लोक प्रतिनिधींच्या अधिनियमातील गुन्हे.
७. भ्रष्टाचार निरोधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल असेलेले उमेदवार गंभीर गुन्ह्यांच्या यादीत मोडतात.

सामान्य गुन्हे दाखल असणारे उमेदवार - उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार ९२८ उमेदवारांपैकी २१० उमेदवारांनी आपल्यावर सामान्य गुन्हे दाखल असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच चौथ्या टप्प्यातील २३ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.

दोष सिद्ध झालेले उमेदवार - १२ उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर दोष सिद्ध झाले आहेत. म्हणजेच रिंगणात उभे असलेल्या १. २९ टक्के उमेदवारांवर विविध गुन्ह्यामध्ये दोष सिद्ध झाले आहेत.

हत्येशी संबंधीत उमेदवार - चौथ्या टप्प्यातील ९२८ उमेदवारांपैकी ५ उमेदवारांवर हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर भादंवि कलम ३०२ उंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

हत्येचा प्रयत्न करणारे उमेदवार - २४ उमेदवारांवर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. म्हणजेच २.५ टक्के उमेदवारांवर भादंवि कलम ३०७ नुसार खटला चालत आहे.

अपहरणाशी संबंधित उमेदवार - ९२८ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी आपल्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे घोषित केले आहे.

महिलांवर अत्याचार करणारे उमेदवार - महिलांवर बलप्रयोग करणे, त्या स्त्रीच्या पती आणि कुटुंबीयांना त्रास देणे तसेच विनय भंग करण्यासारखे गुन्हे यामध्ये मोडतात. यामध्ये २१ उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर यावरून खटला सुरू आहे. म्हणजेच २.२६ टक्के उमेदवारांवर भादंवि ३५४ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

उग्र भाषण देणारे उमेदवार - तब्बल १६ उमेदवारांनी उग्र भाषण देण्याचे गुन्हे दाखल असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.

Chart2
गुन्हेगारांच्या प्रकारानुसार उमेदवारांची संख्या


कोणता पक्ष वरचढ -
लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पक्षाच्या आधारावर अभ्यास केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजप, काँग्रेस आणि बसप या पक्षांचा समावेश आहे. यामध्ये भाजपच्या ५७ उमेदवारांपैकी २० म्हणजेच ३५ टक्के उमेदवार गंभीर गुन्ह्याखाली आहेत. तर, काँग्रेसमधील ५७ पैकी ९ म्हणजेच १६ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. बसपवर नजर टाकली तर ५४ पैकी १० म्हणजेच १९ टक्के उमेदवार हे गंभीर गुन्ह्याखाली आहेत.

सामान्य गुन्हेगारीमध्ये भाजपच्या ५७ उमेदवारांपैकी २५ म्हणजेच ४४ टक्के उमेदवार गंभीर गुन्ह्याखाली आहेत. तर, काँग्रेसमधील ५७ पैकी १८ म्हणजे ३२ टक्के उमेदवारांवर सामान्य गुन्हे दाखल आहेत. बसपवर नजर टाकली तर ५४ पैकी ११ म्हणजेच २० टक्के उमेदवार हे सामान्य गुन्ह्याखाली आहेत.

Chart1
पक्षातील गुन्हेगारांची टक्केवारी

एकंदरीत यावेळी भाजपने सर्वात जास्त गुन्हेगारांना तिकीट दिली आहे. त्यामुळे चौथ्याटप्प्यात भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. मागच्या टप्प्यात काँग्रेसने सर्वात जास्त गुन्हेगारांना उमेदवारी दिली होती.


राज्यपातळीवर हे चित्र अधिकच गंभीर स्वरुपाचे आहे. शिवसेनेतील २१ उमेदवारांपैकी १२ उमेदवार म्हणजेच ५७ टक्के उमेदवारांवर सामान्य आणि ६ म्हणजेच ४३ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अपक्ष निवडणूक लढवणाऱ्यांमध्ये १७ टक्के उमेदवारांवर सामान्य आणि १३ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आता देश चौथ्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. चौथ्या टप्प्यात ८ राज्यातील ७१ लोकसभा मतदार संघांसाठी २९ एप्रिलला मतदान होईल. यासाठी एकूण ९४३ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार तब्बल १७ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने या उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास केला. त्यावर एक नजर...


चौथ्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये उभ्या असलेल्या ९४३ उमेदवारांपैकी ९८२ उमेदवारांचा एडीआरने अभ्यास केला. उरलेल्या १५ उमेदवारांचे शपथपत्र स्पष्ट नसल्यामुळे त्यांना या अहवालातून वगळण्यात आले आहे. सर्व ९२८ उमेदवारांपैकी २०५ उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांतील आहेत. तर, ४८ उमेदवार हे स्थानिक पक्षांतील आणि ३४६ मान्यता प्राप्त नसलेले मात्र नोंदणीकृत पक्षातील आहेत.

एडीआरने या गुन्ह्यांचे ८ भागात वर्गिकरण केले आहे. त्यावरुन त्यांनी उमेदवारांची टक्केवरी ठरवली. यात सामान्य गुन्हे, गंभीर गुन्हे आणि दोषसिद्ध झालेले उमेदवार, हत्या, हत्येचा प्रयत्न करणारे आणि अपहरणाचा आरोप असलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय यात महिलांवर अत्याचार करणारे आणि उग्र भाषण करणाऱ्या उमेदवारांचाही समावेश आहे.

गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या उमेदवारांची संख्या -
चौथ्या टप्प्यामध्ये रिंगणात असलेल्या ९२८ उमेदवारांपैकी १५८ उमेदवार यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. म्हणजे एकूण १७ टक्के उमेदवार, असे आहेत की त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Chart3
गुन्ह्याचे प्रकार

गंभीर गुन्हे म्हणजे काय ?
एडीआरने गंभीर गुन्हे ठरवण्यासाठी काही मापदंड ठरवले आहेत. त्यानुसार
१. पाच किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेले उमेदवार.
२. अजामीनपात्र गुन्हे.
३. निवडणुकींशी संबंधीत गुन्हे.
४. सरकारी खजिन्याला नुकसान पोहोचवण्याचा अपराध.
५. हल्ला, हत्या, अपहरण आणि बलात्कार या सारखे गुन्हे.
६. लोक प्रतिनिधींच्या अधिनियमातील गुन्हे.
७. भ्रष्टाचार निरोधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल असेलेले उमेदवार गंभीर गुन्ह्यांच्या यादीत मोडतात.

सामान्य गुन्हे दाखल असणारे उमेदवार - उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार ९२८ उमेदवारांपैकी २१० उमेदवारांनी आपल्यावर सामान्य गुन्हे दाखल असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच चौथ्या टप्प्यातील २३ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.

दोष सिद्ध झालेले उमेदवार - १२ उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर दोष सिद्ध झाले आहेत. म्हणजेच रिंगणात उभे असलेल्या १. २९ टक्के उमेदवारांवर विविध गुन्ह्यामध्ये दोष सिद्ध झाले आहेत.

हत्येशी संबंधीत उमेदवार - चौथ्या टप्प्यातील ९२८ उमेदवारांपैकी ५ उमेदवारांवर हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर भादंवि कलम ३०२ उंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

हत्येचा प्रयत्न करणारे उमेदवार - २४ उमेदवारांवर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. म्हणजेच २.५ टक्के उमेदवारांवर भादंवि कलम ३०७ नुसार खटला चालत आहे.

अपहरणाशी संबंधित उमेदवार - ९२८ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी आपल्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे घोषित केले आहे.

महिलांवर अत्याचार करणारे उमेदवार - महिलांवर बलप्रयोग करणे, त्या स्त्रीच्या पती आणि कुटुंबीयांना त्रास देणे तसेच विनय भंग करण्यासारखे गुन्हे यामध्ये मोडतात. यामध्ये २१ उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर यावरून खटला सुरू आहे. म्हणजेच २.२६ टक्के उमेदवारांवर भादंवि ३५४ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

उग्र भाषण देणारे उमेदवार - तब्बल १६ उमेदवारांनी उग्र भाषण देण्याचे गुन्हे दाखल असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.

Chart2
गुन्हेगारांच्या प्रकारानुसार उमेदवारांची संख्या


कोणता पक्ष वरचढ -
लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पक्षाच्या आधारावर अभ्यास केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजप, काँग्रेस आणि बसप या पक्षांचा समावेश आहे. यामध्ये भाजपच्या ५७ उमेदवारांपैकी २० म्हणजेच ३५ टक्के उमेदवार गंभीर गुन्ह्याखाली आहेत. तर, काँग्रेसमधील ५७ पैकी ९ म्हणजेच १६ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. बसपवर नजर टाकली तर ५४ पैकी १० म्हणजेच १९ टक्के उमेदवार हे गंभीर गुन्ह्याखाली आहेत.

सामान्य गुन्हेगारीमध्ये भाजपच्या ५७ उमेदवारांपैकी २५ म्हणजेच ४४ टक्के उमेदवार गंभीर गुन्ह्याखाली आहेत. तर, काँग्रेसमधील ५७ पैकी १८ म्हणजे ३२ टक्के उमेदवारांवर सामान्य गुन्हे दाखल आहेत. बसपवर नजर टाकली तर ५४ पैकी ११ म्हणजेच २० टक्के उमेदवार हे सामान्य गुन्ह्याखाली आहेत.

Chart1
पक्षातील गुन्हेगारांची टक्केवारी

एकंदरीत यावेळी भाजपने सर्वात जास्त गुन्हेगारांना तिकीट दिली आहे. त्यामुळे चौथ्याटप्प्यात भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. मागच्या टप्प्यात काँग्रेसने सर्वात जास्त गुन्हेगारांना उमेदवारी दिली होती.


राज्यपातळीवर हे चित्र अधिकच गंभीर स्वरुपाचे आहे. शिवसेनेतील २१ उमेदवारांपैकी १२ उमेदवार म्हणजेच ५७ टक्के उमेदवारांवर सामान्य आणि ६ म्हणजेच ४३ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अपक्ष निवडणूक लढवणाऱ्यांमध्ये १७ टक्के उमेदवारांवर सामान्य आणि १३ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Intro:Body:

Nikhil


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.