ETV Bharat / bharat

आज.. आत्ता.. रविवार २६ मे रात्री १२ पर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्यावर एक नजर

मुंबईत कुर्ला रेल्वे स्थानकावर लोकल रूळावरून घसरल्याने मध्ये रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत. यंदा राज्यात मान्सून एक आठवडा उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तविला आहे. शनि शिंगणापूरजवळ झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हळद लागण्यापूर्वीच नवरदेवाचा ह्रदयविकाने मृत्यू झाला आहे. तर संतनगरी शेगावत भूत दिसल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

author img

By

Published : May 27, 2019, 12:00 AM IST

आज आत्ता

LIVE: कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ लोकल रुळावरुन घसरली; मध्य रेल्वेच्या ५० हून अधिक गाड्या रद्द
मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ३ वर आज रात्री ९ वाजता लोकल रुळावरुन घसरली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, मध्य रेल्वेची वाहतुक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. जवळपास ५० पेक्षा अधिक गाड्या रद्द केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. अधिक वाचा...

उकाड्यापासून तुर्तास दिलासा नाहीच.. राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, हवामान विशेषज्ञांचा अंदाज
मुंबई -
राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मान्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल संथ गतीने राहणार आहे. त्यामुळे केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी आहे. राज्यात किमान ८ जूनपर्यंत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता नाही. अधिक वाचा...

शनी-शिंगणापूरजवळ ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, ५ जण जखमी
अहमदनगर -
मनमाड राहुरी नजिक शनी-शिंगणापूर फाट्याजवळ दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अधिक वाचा...

सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा.. हळद निघण्यापूर्वीच नवरदेवाचा हृदयविकाराने मृत्यू
बीड -
अनेकजण आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवत असतात. लग्नानंतर काय करायचे, कोठे फिरायला जायचे याचे नियोजन अगोदरपासूनच करत असतात. मात्र, लग्नानंतर चार दिवसात नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अधिक वाचा...


CCTV : शेगावात दिसले भूत? तर्क-वितर्कांना आला ऊत
बुलडाणा -
जिल्ह्यातील शेगाव शहरात सध्या अंधश्रद्धेचे भूत फिरत असल्याची चर्चा आहे. आजच्या प्रगत जगात विज्ञानाचा प्रसार झाल्यामुळे भूत, जादुटोणा आणि पिशाच्च विद्या यासारख्या ‘वेडगळ समजुती’ काही प्रमाणात कमी झाली आहे. कायद्याने तर ती पूर्णत: अमान्य केली आहे. मात्र, आजही अशिक्षित तसेच सुशिक्षित लोकसुद्धा भूत, करणीसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. याचा प्रत्यय सध्या शेगावात येत आहे.अधिक वाचा...

LIVE: कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ लोकल रुळावरुन घसरली; मध्य रेल्वेच्या ५० हून अधिक गाड्या रद्द
मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ३ वर आज रात्री ९ वाजता लोकल रुळावरुन घसरली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, मध्य रेल्वेची वाहतुक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. जवळपास ५० पेक्षा अधिक गाड्या रद्द केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. अधिक वाचा...

उकाड्यापासून तुर्तास दिलासा नाहीच.. राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, हवामान विशेषज्ञांचा अंदाज
मुंबई -
राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मान्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल संथ गतीने राहणार आहे. त्यामुळे केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी आहे. राज्यात किमान ८ जूनपर्यंत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता नाही. अधिक वाचा...

शनी-शिंगणापूरजवळ ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, ५ जण जखमी
अहमदनगर -
मनमाड राहुरी नजिक शनी-शिंगणापूर फाट्याजवळ दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अधिक वाचा...

सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा.. हळद निघण्यापूर्वीच नवरदेवाचा हृदयविकाराने मृत्यू
बीड -
अनेकजण आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवत असतात. लग्नानंतर काय करायचे, कोठे फिरायला जायचे याचे नियोजन अगोदरपासूनच करत असतात. मात्र, लग्नानंतर चार दिवसात नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अधिक वाचा...


CCTV : शेगावात दिसले भूत? तर्क-वितर्कांना आला ऊत
बुलडाणा -
जिल्ह्यातील शेगाव शहरात सध्या अंधश्रद्धेचे भूत फिरत असल्याची चर्चा आहे. आजच्या प्रगत जगात विज्ञानाचा प्रसार झाल्यामुळे भूत, जादुटोणा आणि पिशाच्च विद्या यासारख्या ‘वेडगळ समजुती’ काही प्रमाणात कमी झाली आहे. कायद्याने तर ती पूर्णत: अमान्य केली आहे. मात्र, आजही अशिक्षित तसेच सुशिक्षित लोकसुद्धा भूत, करणीसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. याचा प्रत्यय सध्या शेगावात येत आहे.अधिक वाचा...

जोगेश्वरीत गॅस सिलेंडर स्फोटातील जखमी महिलेचा मृत्यू
मुंबई - 
पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी, बेहराम बाग येथील हनुमान चाळीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन 14 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेत जखमी झालेल्या एका महिलेचा आज कस्तुरबा रुग्णालायत मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे. शकुंतला कागल असे या मृत महिलेचे नाव आहे.
     
जोगेश्वरी पश्चिम येथील बेहराम बागमधील हनुमान चाळीत 21 मे ला रात्री गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. गॅस सिलिंडरच्या स्फोटाची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. या स्फोटात 14 जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी 13 जणांवर नजीकच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात तर एकावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर अधिक उपाचारासाठी जखमींना सायन, कस्तुरबा आदी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी शकुंतला कागल या 46 वर्षीय महिलेचा आज पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. अद्यापही ट्रॉमा रुग्णालयात 5, सायन रुग्णालयात 2, कस्तुरबा रुग्णालयात 2 रुग्णांवर उपाचार सुरू असून 5 जणांना घरी सोडून देण्यात आले आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्याचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

नोट

फोटो मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.