ETV Bharat / bharat

केंद्राने जम्मू काश्मीर विकायला काढलंय, नव्या जमीन कायद्यावरून विरोधकांचा हल्लाबोल - Jammu and Kashmir

केंद्र सरकारने जमीन कायद्यात नव्याने जे बदल केले आहेत, त्यामुळे काश्मीर विकायला काढल्याचे दिसून येत आहे, असे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने म्हटले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनीही नव्या बदलांवर टीका केली आहे.

land laws
काश्मीरी नेते
author img

By

Published : Oct 27, 2020, 9:11 PM IST

Updated : Oct 27, 2020, 10:47 PM IST

श्रीनगर - 'पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन' मध्ये सहभागी असलेल्या काश्मीरी पक्षांनी नव्या जमीन कायद्यातील बदलांचा विरोध केला आहे. जम्मू काश्मीर विकायला काढलंय, अशा भावना नेत्यांनी व्यक्त केल्या. 'पीपल्स डेमॉक्रॅटीक पार्टी' ही संघटना काश्मीरातील सर्व पक्षांनी मिळून स्थापन केली आहे. काश्मीरची स्वायत्तता पुन्हा माघारी घेण्याचा उद्देश यामागे आहे.

काश्मीरी नेत्यांची प्रतिक्रिया

केंद्र सरकारने जमीन कायद्यात नव्याने जे बदल केले आहेत, त्यामुळे काश्मीर विकायला काढल्याचे दिसून येत आहे, असे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने म्हटले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनीही नव्या बदलांवर टीका केली आहे. जम्मू काश्मीर डेव्हलपमेंट कायदा हा काश्मीरी नागरिकांच्या हिताविरोधात असल्याचे ते म्हटले.

  • Unacceptable amendments to the land ownership laws of J&K. Even the tokenism of domicile has been done away with when purchasing non-agricultural land & transfer of agricultural land has been made easier. J&K is now up for sale & the poorer small land holding owners will suffer.

    — Omar Abdullah (@OmarAbdullah) October 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जुना नियम रद्द, नवीन लागू

जम्मू काश्मीर सुधारणा कायद्यानुसार (1970-XIX) आता जमीन खरेदीसाठी केंद्रशासित प्रदेशाचे कायमस्वरूपी रहिवासी असण्याची अट गरजेची नाही. १९९०च्या जमीन अधिग्रहण कायद्यातील सहाव्या भागानुसार अस्तित्वात असलेला जुना नियम रद्द करण्यात आला आहे. त्याजागी आता २०१३च्या पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कायद्यातील ३० वा नियम लागू करण्यात आला आहे.

जमिनीसंदर्भातील ११ कायद्यांमध्ये बदल

शासनाने जमीन खरेदी-विक्रीबाबत असलेल्या ११ कायद्यांमध्ये बदल केले आहेत. यात १९६० चा जमीन आणि शेतीचे विभाजन विरोध कायदा, १९७५ चा बागायती जमिनीचे विलगीकरण करणे आणि नागरी वस्तीत रुपांतर विरोध कायदा आणि १९३६ चा राईट ऑफ प्रायर पर्चेस कायद्याचा समावेश आहे. नवीन कायद्यानुसार खरेदी केलेल्या जमीनीची मालकी बदलता येणार नाही. फक्त सरकार आणि सरकारी संस्थांना जमीन देता येणार आहे. शेत जमीनही फक्त दुसऱ्या शेतकऱ्यालाच विकता येणार आहे.

  • Yet another step thats part of GOI’s nefarious designs to disempower & disenfranchise people of J&K. From the unconstitutional scrapping of Article 370 to facilitating loot of our natural resources & finally putting land in J&K up for sale.

    — Mehbooba Mufti (@MehboobaMufti) October 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

श्रीनगर - 'पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन' मध्ये सहभागी असलेल्या काश्मीरी पक्षांनी नव्या जमीन कायद्यातील बदलांचा विरोध केला आहे. जम्मू काश्मीर विकायला काढलंय, अशा भावना नेत्यांनी व्यक्त केल्या. 'पीपल्स डेमॉक्रॅटीक पार्टी' ही संघटना काश्मीरातील सर्व पक्षांनी मिळून स्थापन केली आहे. काश्मीरची स्वायत्तता पुन्हा माघारी घेण्याचा उद्देश यामागे आहे.

काश्मीरी नेत्यांची प्रतिक्रिया

केंद्र सरकारने जमीन कायद्यात नव्याने जे बदल केले आहेत, त्यामुळे काश्मीर विकायला काढल्याचे दिसून येत आहे, असे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने म्हटले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनीही नव्या बदलांवर टीका केली आहे. जम्मू काश्मीर डेव्हलपमेंट कायदा हा काश्मीरी नागरिकांच्या हिताविरोधात असल्याचे ते म्हटले.

  • Unacceptable amendments to the land ownership laws of J&K. Even the tokenism of domicile has been done away with when purchasing non-agricultural land & transfer of agricultural land has been made easier. J&K is now up for sale & the poorer small land holding owners will suffer.

    — Omar Abdullah (@OmarAbdullah) October 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जुना नियम रद्द, नवीन लागू

जम्मू काश्मीर सुधारणा कायद्यानुसार (1970-XIX) आता जमीन खरेदीसाठी केंद्रशासित प्रदेशाचे कायमस्वरूपी रहिवासी असण्याची अट गरजेची नाही. १९९०च्या जमीन अधिग्रहण कायद्यातील सहाव्या भागानुसार अस्तित्वात असलेला जुना नियम रद्द करण्यात आला आहे. त्याजागी आता २०१३च्या पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कायद्यातील ३० वा नियम लागू करण्यात आला आहे.

जमिनीसंदर्भातील ११ कायद्यांमध्ये बदल

शासनाने जमीन खरेदी-विक्रीबाबत असलेल्या ११ कायद्यांमध्ये बदल केले आहेत. यात १९६० चा जमीन आणि शेतीचे विभाजन विरोध कायदा, १९७५ चा बागायती जमिनीचे विलगीकरण करणे आणि नागरी वस्तीत रुपांतर विरोध कायदा आणि १९३६ चा राईट ऑफ प्रायर पर्चेस कायद्याचा समावेश आहे. नवीन कायद्यानुसार खरेदी केलेल्या जमीनीची मालकी बदलता येणार नाही. फक्त सरकार आणि सरकारी संस्थांना जमीन देता येणार आहे. शेत जमीनही फक्त दुसऱ्या शेतकऱ्यालाच विकता येणार आहे.

  • Yet another step thats part of GOI’s nefarious designs to disempower & disenfranchise people of J&K. From the unconstitutional scrapping of Article 370 to facilitating loot of our natural resources & finally putting land in J&K up for sale.

    — Mehbooba Mufti (@MehboobaMufti) October 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
Last Updated : Oct 27, 2020, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.