ETV Bharat / bharat

जेईई-नीट परीक्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सहा राज्यांकडून पुर्नविचार याचिका दाखल

author img

By

Published : Aug 28, 2020, 3:13 PM IST

आज सर्वोच्च न्यायालयामध्ये 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. 17 ऑगस्टला दिलेल्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्यात यावा आणि परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी याचिकेत केली आहे.

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा रद्द करण्यसाठी काँग्रेसकडून देशभरामध्ये जेईई-नीट परीक्षांविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू आहे. यातच आज सर्वोच्च न्यायालयामध्ये 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. 17 ऑगस्टला दिलेल्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्यात यावा आणि परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी याचिकेत केली आहे.

  • Ministers from 6 States- West Bengal, Jharkhand, Rajasthan, Chhattisgarh, Punjab & Maharashtra file review petition in the Supreme Court seeking review of August 17 order of the Court and postponement of #JEE_NEET scheduled to be held in September. pic.twitter.com/G3GXYufrkY

    — ANI (@ANI) August 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या पार्श्वभूमीवर काँग्रेसशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यातील चर्चेनंतर या राज्यांनी हे पाऊल उचलले आहे. पुर्नविचार याचिका दाखल केलेल्या 6 राज्यांमध्ये पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान, छत्तीसगढ, पंजाब, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. कोरोना संकटकाळात परीक्षा घेण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. तसेच कोरोनामुळे सध्या देशातील पायाभूत सुविधा परीक्षा घेण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीत, असे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल म्हणाले.

दरम्यान, जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर 2020 दरम्यान होणार असून, नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईईसाठी सुमारे 8.58 लाख विद्यार्थ्यांनी, तर नीटसाठी सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा रद्द करण्यसाठी काँग्रेसकडून देशभरामध्ये जेईई-नीट परीक्षांविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू आहे. यातच आज सर्वोच्च न्यायालयामध्ये 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. 17 ऑगस्टला दिलेल्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्यात यावा आणि परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी याचिकेत केली आहे.

  • Ministers from 6 States- West Bengal, Jharkhand, Rajasthan, Chhattisgarh, Punjab & Maharashtra file review petition in the Supreme Court seeking review of August 17 order of the Court and postponement of #JEE_NEET scheduled to be held in September. pic.twitter.com/G3GXYufrkY

    — ANI (@ANI) August 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या पार्श्वभूमीवर काँग्रेसशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यातील चर्चेनंतर या राज्यांनी हे पाऊल उचलले आहे. पुर्नविचार याचिका दाखल केलेल्या 6 राज्यांमध्ये पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान, छत्तीसगढ, पंजाब, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. कोरोना संकटकाळात परीक्षा घेण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. तसेच कोरोनामुळे सध्या देशातील पायाभूत सुविधा परीक्षा घेण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीत, असे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल म्हणाले.

दरम्यान, जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर 2020 दरम्यान होणार असून, नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईईसाठी सुमारे 8.58 लाख विद्यार्थ्यांनी, तर नीटसाठी सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.