ETV Bharat / bharat

गेल्या 24 तासात आढळले 1 हजार 396 कोरोनाबाधित, तर 48 जण दगावले

भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 1 हजार 396 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

author img

By

Published : Apr 27, 2020, 12:25 PM IST

India's COVID-19 count reaches 27,892, death toll at 872
India's COVID-19 count reaches 27,892, death toll at 872

नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 1 हजार 396 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 48 जण दगावले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 27 हजार 892 झाला आहे, यात 20 हजार 835 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 6 हजार 184 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 872 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये 8 हजार 68 कोरोनाबाधित असून 342 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 3 हजार 301 कोरोनाबाधित असून 151 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्येही 2 हजार 185 कोरोनाबाधित आढळले असून 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीमध्ये 2 हजार 918 कोरोनाबाधित तर 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 1 हजार 885 कोरोनाबाधित असून 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या कोरोनाशी लढण्यासाठी जगातील सर्वच देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे. देशभरातील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढविण्यात आला आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती सुधारत असताना काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. एक महिन्यापासून देशामध्ये संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत

नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 1 हजार 396 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 48 जण दगावले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 27 हजार 892 झाला आहे, यात 20 हजार 835 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 6 हजार 184 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 872 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये 8 हजार 68 कोरोनाबाधित असून 342 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 3 हजार 301 कोरोनाबाधित असून 151 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्येही 2 हजार 185 कोरोनाबाधित आढळले असून 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीमध्ये 2 हजार 918 कोरोनाबाधित तर 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 1 हजार 885 कोरोनाबाधित असून 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या कोरोनाशी लढण्यासाठी जगातील सर्वच देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे. देशभरातील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढविण्यात आला आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती सुधारत असताना काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. एक महिन्यापासून देशामध्ये संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.