ETV Bharat / bharat

श्रीनगरच्या विमानतळावरून गुलाम नबी आझादांना पाठवले परत

author img

By

Published : Aug 8, 2019, 10:34 PM IST

काँग्रेसने जम्मू-काश्मीरपासून लडाखला वेगळे करण्यास तसेच, दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यास विरोध दर्शवला होता. आझाद यांनी जम्मू-काश्मीरमधील लोकांवर घातलेल्या निर्बंधांवर नाराजी व्यक्त केली होती.

गुलाम नबी आझाद

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून काँग्रेसने सरकारला तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली होती. राज्यसभा खासदार आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आज जम्मू-काश्मीरमधील पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी श्रीनगरला पोहोचले होते. मात्र, स्थानिक प्रशासनाने त्यांना पुढे जाण्यास मज्जाव करत विमानतळावरच रोखले. त्यानंतर त्यांना नंतरच्या विमानाने दिल्लीला परत पाठवण्यात आले आहे.

आझाद यांना दुपारी ३.३० च्या विमानाने परत पाठवण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. 'संसदेचे सत्र संपल्यानंतर मी नेहमीच काश्मीरला जात असतो. मी कोणाचीही परवानगी घेतली नाही. लोकांच्या कठीण काळामध्ये त्यांच्यासोबत राहण्यासाठी मी निघालो आहे,' असे आझाद यांनी म्हटले होते.

काँग्रेसने जम्मू-काश्मीरपासून लडाखला वेगळे करण्यास तसेच, दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यास विरोध दर्शवला होता. आझाद यांनी जम्मू-काश्मीरमधील लोकांवर घातलेल्या निर्बंधांवर नाराजी व्यक्त केली होती. 'जम्मू-काश्मीरमधील लोक चिडले आहेत. आधी संचारबंदी लागू झाली आणि नंतर कायदा मंजूर झाला, असे हे पहिलेच राज्य आहे,' असे ते म्हणाले.

पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्याला तसेच, आर्टिकल ३७० हटवण्याला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूरी दिली होती.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून काँग्रेसने सरकारला तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली होती. राज्यसभा खासदार आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आज जम्मू-काश्मीरमधील पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी श्रीनगरला पोहोचले होते. मात्र, स्थानिक प्रशासनाने त्यांना पुढे जाण्यास मज्जाव करत विमानतळावरच रोखले. त्यानंतर त्यांना नंतरच्या विमानाने दिल्लीला परत पाठवण्यात आले आहे.

आझाद यांना दुपारी ३.३० च्या विमानाने परत पाठवण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. 'संसदेचे सत्र संपल्यानंतर मी नेहमीच काश्मीरला जात असतो. मी कोणाचीही परवानगी घेतली नाही. लोकांच्या कठीण काळामध्ये त्यांच्यासोबत राहण्यासाठी मी निघालो आहे,' असे आझाद यांनी म्हटले होते.

काँग्रेसने जम्मू-काश्मीरपासून लडाखला वेगळे करण्यास तसेच, दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यास विरोध दर्शवला होता. आझाद यांनी जम्मू-काश्मीरमधील लोकांवर घातलेल्या निर्बंधांवर नाराजी व्यक्त केली होती. 'जम्मू-काश्मीरमधील लोक चिडले आहेत. आधी संचारबंदी लागू झाली आणि नंतर कायदा मंजूर झाला, असे हे पहिलेच राज्य आहे,' असे ते म्हणाले.

पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्याला तसेच, आर्टिकल ३७० हटवण्याला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूरी दिली होती.

Intro:Body:

mea to pakistan article 370 is entirely internal affair of india

mea, pakistan, article 370, internal affair of india, आर्टिकल ३७०, indopak relations

---------------

आर्टिकल ३७० ही आमची अंतर्गत बाब, भारताने पाकला सुनावले खडे बोल

नवी दिल्ली - भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने भारताशी राजनैतिक आणि व्याापरी संबंध तोडल्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'जम्मू-काश्मीरशी संबंधित आर्टिकल ३७० चा निर्णय ही आमची देशांतर्गत बाब आहे. यावर पाकने प्रतिक्रिया देण्याचा संबंधच येत नाही. पाकिस्तान जगासमोर विनाकारण कांगावा करून दाखवत आहे. तसेच, भारताशी असलेले द्विपक्षीय संबंध चिंताजनक स्थितीत पोहोचल्याचे चित्र उभे करत आहे,' असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरविषयी भारताने घेतलेल्या आक्रमक निर्णयामुळे पाकिस्तान बेचैन झाला आहे. पाककडून एकामागोमाग एक भारतविरोधी निर्णय घेतले जात आहेत. पाकमध्ये भारतीय चित्रपटांवरही बंदी आणली आहे. मात्र, 'भारतीय संविधानानुसार, हा भारताचा अंतर्गत विषय होता आणि पुढेही राहील. भारताशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांविषयी चिंताजनक चित्र तयार करून आमच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करण्याचा पाकचा कावा कधीही यशस्वी ठरणार नाही,' असे परराष्ट्र मंत्रालयाने पाकला ठणकावून सांगितले आहे.

'पाकिस्तानने द्विपक्षीय संबंधांविषयी उचललेल्या पावलांचा भारत सरकार निषेध करत आहे. पाकिस्ताने हे निर्णय एकतर्फीच घेतले आहेत. त्यांनी स्वतःच याचे पुनरावलोकन करून संबंध सामान्य पातळीवर आणण्यासाठी परिस्थिती तयार करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत,' असे भारताने म्हटले आहे.

'पाकने उचललेली पावले केवळ जगासमोर भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध बिघडल्याचे चित्र उभे करण्यासाठी आहेत. कारण ही पावले उचलताना पाकने दिलेली कारणे प्रत्यक्षातील परिस्थितीशी मुळीच संबंधित नाहीत. उलट, भारताने सध्या घेतलेला निर्णय जम्मू-काश्मीरच्या विकासाची धोरणे राबवण्याच्या उद्देशाने आहे. संविधानातील एक तरतूद याच्या आड येत होती. केवळ ती बाजूला करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मद्देनजर लैंगिक, सामाजिक, आर्थिक भेदभाव दूर करणे शक्य होईल. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील सर्वच लोकांचे जीवनमान उंचावेल,'असे भारताने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरशी संबंधित भारतात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना पाकिस्तानकडून नकारात्मकदृष्ट्या पाहिले जाते, यामध्ये कोणतेच आश्चर्य वाटत नाही. तसेच, पाककडून यासंदर्भआत पसरवल्या जाणाऱ्या भावनांचा सीमेपलीकडून दहशतवादाची निर्यात करण्यासाठी वापर केला जातो. तसेच, दहशतवादी कारवायांना योग्य ठरवण्यासाठी स्पष्टीकरणेही दिली जातात.




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.