ETV Bharat / bharat

भाजपा अन् ओवेसी एकाच नाण्याच्या दोन बाजू, काँग्रेसचा आरोप

author img

By

Published : Oct 7, 2020, 5:16 PM IST

Updated : Oct 7, 2020, 5:52 PM IST

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपावर टीका केली आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काल (मंगळवार) राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला तर, महागठबंधनमध्येही जागावाटप झाले आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बिहार निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यावरुन काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ओवेसी यांना टोला लगावला आहे.

'राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेसच्या महागठबंधनला नुकसान पोहचविण्यासाठी ओेवेसी भाजपाच्या सांगण्यावरून बिहार निवडणूक लढत आहेत. भाजपा आणि ओवेसी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे', असे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे. बिहार निवडणूक लढण्याचे अधिकृत पत्रक एमआयएमने जारी केल्यानंतर सिंह यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

ओवेसींचा एआयएमआयएम हा पक्ष आरएलएसपी आणि बीएसपीसोबत मिळून बिहार निवडणूक लढणार आहे. त्यामुळे राज्यातील मतविभागणी होण्याची शक्यता आहे. या मतविभागणीचा नक्की फायदा कोणत्या पक्षाला होतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. राज्यामध्ये महागठबंधन आणि एनडीएमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, इतर पक्षही धक्का देण्याच्या तयारीत आहेत. चिराग पासवान यांचा एलजेपी पक्ष एनडीएसोबतची आघाडी तोडून एकटा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि जदयूमध्ये जागावाटपाचा फॉर्म्यूला निश्चित झाला आहे. यानुसार जेडीयू 122 तर, भाजपा 121 जागा लढवणार आहेत. पाटण्यात जनता दल (संयुक्त) आणि भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज (मंगळवारी) संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काल (मंगळवार) राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला तर, महागठबंधनमध्येही जागावाटप झाले आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बिहार निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यावरुन काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ओवेसी यांना टोला लगावला आहे.

'राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेसच्या महागठबंधनला नुकसान पोहचविण्यासाठी ओेवेसी भाजपाच्या सांगण्यावरून बिहार निवडणूक लढत आहेत. भाजपा आणि ओवेसी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे', असे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे. बिहार निवडणूक लढण्याचे अधिकृत पत्रक एमआयएमने जारी केल्यानंतर सिंह यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

ओवेसींचा एआयएमआयएम हा पक्ष आरएलएसपी आणि बीएसपीसोबत मिळून बिहार निवडणूक लढणार आहे. त्यामुळे राज्यातील मतविभागणी होण्याची शक्यता आहे. या मतविभागणीचा नक्की फायदा कोणत्या पक्षाला होतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. राज्यामध्ये महागठबंधन आणि एनडीएमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, इतर पक्षही धक्का देण्याच्या तयारीत आहेत. चिराग पासवान यांचा एलजेपी पक्ष एनडीएसोबतची आघाडी तोडून एकटा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि जदयूमध्ये जागावाटपाचा फॉर्म्यूला निश्चित झाला आहे. यानुसार जेडीयू 122 तर, भाजपा 121 जागा लढवणार आहेत. पाटण्यात जनता दल (संयुक्त) आणि भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज (मंगळवारी) संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.

Last Updated : Oct 7, 2020, 5:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.