ETV Bharat / bharat

विशाखापट्टनम येथील वायूगळती शमविण्यासाठी गुजरातवरून मागविले केमिकल

author img

By

Published : May 7, 2020, 7:48 PM IST

PTBC नावाचे ५०० किलो विशेष रसायन विमानाने गुजरातवरून आंध्रप्रदेशातील विशाखापट्टनम येथे आणण्यात येणार आहे.

gas leak
वायू गळती

नवी दिल्ली - विशाखापट्टनम येथील एलजी पॉलिमर इंडस्ट्रीत रासायनिक वायू गळती होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गुजरातवरून विशेष केमिकल विमानाने आणण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यास परवानगी दिली आहे. या केमिकलमुळे परिसरात पसरलेला वायूचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत होणार आहे.

PTBC नावाचे ५०० किलो विशेष रसायन विमानाने गुजरातवरून आंध्रप्रदेशातील विशाखापट्टनम येथे आणण्यात येणार आहे. दमन विमानतळावर हे रसायन उतरवण्यात येणार आहे. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. गुजरातमधील वापी बंदरावरून हे रसायन विशाखापट्टनमला विमानाने आणण्यात येणार आहे.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीतील विषारी वायू गळती झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. यानंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. एका लहान मुलासह ११ जणांचा यात मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासन आणि नौदलाने कारखान्याजवळील पाच गावे रिकामी केली आहेत.

विषारी वायूमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशामक विभागाचे वाहन, रुग्णवाहिका व पोलीस दाखल झाले आहेत. अनेक लोकांना सध्या स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या विषारी वायूचा प्रादुर्भाव जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत पसरला आहे.

नवी दिल्ली - विशाखापट्टनम येथील एलजी पॉलिमर इंडस्ट्रीत रासायनिक वायू गळती होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गुजरातवरून विशेष केमिकल विमानाने आणण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यास परवानगी दिली आहे. या केमिकलमुळे परिसरात पसरलेला वायूचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत होणार आहे.

PTBC नावाचे ५०० किलो विशेष रसायन विमानाने गुजरातवरून आंध्रप्रदेशातील विशाखापट्टनम येथे आणण्यात येणार आहे. दमन विमानतळावर हे रसायन उतरवण्यात येणार आहे. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. गुजरातमधील वापी बंदरावरून हे रसायन विशाखापट्टनमला विमानाने आणण्यात येणार आहे.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीतील विषारी वायू गळती झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. यानंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. एका लहान मुलासह ११ जणांचा यात मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासन आणि नौदलाने कारखान्याजवळील पाच गावे रिकामी केली आहेत.

विषारी वायूमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशामक विभागाचे वाहन, रुग्णवाहिका व पोलीस दाखल झाले आहेत. अनेक लोकांना सध्या स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या विषारी वायूचा प्रादुर्भाव जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत पसरला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.