महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये डेंग्यूमुळं महिलेसह पाच वर्षीय मुलाचा मृत्यू; लक्षणं, उपाय आणि 'अशी' घ्या काळली

नाशिक शहरात डेंग्यू आजारानं थेमान घातलंय. डेंग्यूमुळं मागील 15 दिवसात शहरात दोघांचा मृत्यू झालाय. जाणून घ्या आजारावरील लक्षणं, उपाय...

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

नाशिक : शहरातील सातपूर भागात डेंग्यूची लागण झालेल्या एका महिलेसह पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने महानगरपालिकेचे सुस्त असलेलं आरोग्य प्रशासन आता जागं झालं आहे, महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी डेंग्यूची उत्पत्तीस्थळे शोधण्यासाठी धावपळ सुरू केली आहे..

दोघांचा मृत्यू :नाशिक शहरातील सातपूर भागात डेंग्यू आजारानं थैमान घातलं आहे. विविध रुग्णालयात 40 हून अधिक डेंग्यू बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सातपूर भागातील आयुष दातार या पाच वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. तसेच पंधरा दिवसापूर्वीच मधू निर्मळ या महिलेचाही डेंग्यूने मृत्यू झाला होता. सातपूर परिसरात सप्टेंबर महिन्यातही 150 हून अधिक डेंग्यू बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या घटनेनंतर महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाला जाग आली असून, महानगरपालिकेच्या पथकाने सातपूर भागातील श्रमिक नगरमधील आयुष दातार राहत असलेल्या कठेपठार व शालेय परिसरात पाहणी करत औषधाची फवारणी केली.

औषध फवारणी करावी : "पावसाळा सुरू होण्यापूर्वी महानगरपालिकेचे कर्मचारी डेंग्यूची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासाठी आली होती. त्यावेळी त्यांनी फवारणी देखील केली. मात्र, त्यानंतर ते फिरकलेच नाहीत. परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. वारंवार महानगरपालिका प्रशासनाला याबाबत कळवले. मात्र, त्याचा काही उपयोग होत नाही. लहान मुले या परिसरात खेळत असतात. आमच्या परिसरातील आयुष या पाच वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे आम्ही भयभीत झालो आहोत. महानगरपालिका प्रशासनाने या भागातील डेंग्यूची उत्पत्तीस्थळे तत्काळ नष्ट करावी," अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.

2 लाख घरांची तपासणी : "नाशिक शहरात डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या वाढताच नाशिक महानगरपालिकेने मोहीम हाती घेत शहरातील 2 लाख 4 हजार 891 घरांना भेटी दिल्या. त्यातील 3 हजार 50 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे. शहरात डेंग्यूबाधित रुग्ण आढळलेल्या भागात महानगरपालिकेकडून औषध फवारणी केली जात आहे. नागरिकांनी सुद्धा आपल्या घरात पाणी जास्त दिवस साचणार नाही आणि त्यातून डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ तानाजी चव्हाण यांनी नागरिकांना केले.

नागरिकांनी अशी घ्यावी काळजी : "डेंग्यूचा प्रसार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. डेंग्यूच्या डासांची पाण्यातून उत्पत्ती होते. त्यामुळे घरातील पाणी देखील अलटून-पालटून बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होणार नाही, असं महानगरपालिका मलेरिया विभागाचे मुख्य अधिकारी डॉ नितीन रावते यांनी सांगितलं.

हे आहेत उपाय : डासांपासून वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा, डास प्रतिबंधात्मक मलम वापरा, खिडक्यांना बारीक जाळी बसवणे, शरीर पूर्ण झाकून राहील असे कपडे वापरावेत, गप्पी मासे हे डासांच्या आळ्या खातात. त्यामुळे पाण्याचे मोठे हौद, विहीर इत्यादी ठिकाणी गप्पी मासे टाकावेत. त्यामुळे डासांच्या आळ्या तयार होणार नाहीत.

ही आहेत डेंग्यूची लक्षणे : 'एडिस' डास चावल्यानंतर सहा ते सात दिवसानंतर रुग्णाला तापाची लक्षणे दिसायला लागतात. ताप, अंगदुखी, अंगावर पुरळ, डोकेदुखी अशी लक्षणे दिसतात. अशावेळी त्वरित रक्ताची तपासणी करून घ्यावी. डेंग्यूचे निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावेत.

हेही वाचा -

  1. अभियंत्याचा डेंग्यू सदृश्य आजारानं मृत्यू: डेंग्यूच्या रुग्णात प्रचंड वाढ, जाणून घ्या लक्षणं आणि उपाययोजना - Dengue Increased In Nashik
  2. रक्तातील प्लाझ्माची घसरण डेंग्यू रुग्णांसाठी ठरू शकते घातक - Dengue Plasma Leakage
  3. नाशिकमध्ये डेंग्यूचं थैमान! महानगरपालिकेकडून रुग्णसंख्या लपविण्याचा प्रयत्न, जाणून घ्या नेमका आकडा किती? - Dengue Cases In Nashik

ABOUT THE AUTHOR

...view details