ठाणे Thane Crime News : भिवंडी तालुक्यातील ओवळी गावाजवळील एका गोदामात कालबाह्य सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू आणि कालबाह्य खाद्यपदार्थ बेकायदेशीररित्या विक्री केली जात असल्याची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सदरील गोदामावर छापा टाकून तेथून सव्वा कोटींचा कालबाह्य मुद्देमाल जप्त करत मॅनेजरसह कामगाराच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. मॅनेजर जतीन राजेश शर्मा (25 रा. बदलापूर, पश्चिम) आणि सुरेश कल्पनाथ विश्वकर्मा (52 रा. भिवंडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत.
भिवंडीत कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांसह खाद्यपदार्थांची विक्री; दोघांवर गुन्हा दाखल - Bhiwandi Crime
Published : Sep 3, 2024, 10:37 PM IST
|Updated : Sep 3, 2024, 10:52 PM IST
Thane Crime News : कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तूंची तसंच कालबाह्य खाद्यपदार्थांची साठवणूक करून त्यावर नव्यानं स्टिकर चिटकवून त्याची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी जतीन आणि सुरेश कालबाह्य सौंदर्य प्रसाधनं आणि कालबाह्य खाद्यपदार्थांच्या मालाची विल्हेवाट न लावता सदर मालावरुन कालबाह्य झालेल्या तारखेचे स्टिकर काढून त्यावर नवीन मुदतवाढ असलेले स्टिकर चिटकवून विक्री करत असल्याचं आढळून आलं. अशा कृत्यामूळं नागरिकांच्या जीवितास अपाय होईल याची जाणीव असतानाही कालबाह्य मालाची विक्री करून ग्राहकांची मागील चार महिन्यांपासून फसवणूक करत असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी आरोपी जतीन आणि सुरेशच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार रिजवान असगर सैय्यद यांच्या तक्रारीवरुन भारतीय न्याय संहिता 318 (4) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश चोपडे करत आहेत.
हेही वाचा -