महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

ETV Bharat / state

साई मंदिराच्या कलशाला 72 वर्षे पूर्ण; कलशाच्या प्रतिमेचं पूजन - Sai temple Kalash Shirdi

Sai temple Kalash Shirdi : जगप्रसिद्ध शिर्डी साईबाबा मंदिर कलशारोहणाला आज 72 वर्षे पूर्ण झाली आहेत. डॉ. पारनेरकरांच्या पादुका पूजन व सुवर्ण कलशाच्या प्रतिमेचं पूजन करून 73 वा वर्धापन दिन शिर्डीत मोठ्या भक्ती भावात साजरा करण्यात आला.

Sai temple Kalash Shirdi
शिर्डी साईबाबा मंदिर (Source - ETV Bharat Reporter)

शिर्डी Sai temple Kalash Shirdi :साई मंदिर मुळात नागपूरच्या बुटी सरकारांचा वाडा होता. त्या वाड्याला नंतर मंदिरात रुपांतरीत करत त्यात श्रीकृष्ण आणि रामाच्या मूर्ती बसवण्यात येणार होत्या. मात्र, साईबाबांनीच मला या मंदिरात विश्रांत घ्यावयाची असल्याचं सांगितल्यानंतर साईंच्या महानिर्वाणानंतर त्यांचा देह ठेवत समाधिस्थ करण्यात आला आणि बुटीवाडा साईमंदिर झालं. ते साल होतं 1918. याच साई मंदिरावर 1952 साली सभा मंडपाचं काम पूर्ण झालं. त्यानंतर कलश रोहण करायचं होतं. एरवी मंदिराच्या कलशारोहणाचा अधिकार हा ब्रह्मचारी आणि संन्यास आश्रम स्वीकारलेल्या व्यक्तीस असतो. मात्र, साईबाबांच्या जशा लिला अनोख्या होत्या, तशीच कलशारोहणाची कहानीही वेगळी आहे.

कलशारोहणाचा स्मृतिदिन :अहमदनगर जिल्ह्यातील पूर्णवादाचार्य डॉ. रामचंद्र महाराज जे प्रापंचिक व्यक्ती होते. त्यांच्या हस्ते 29 सप्टेंबर 1952 साली साई मंदिरावर सुवर्ण कलशारोहण पार पडलं होतं. या सोहळ्यास आज 72 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या काही वर्षांपासून 29 सप्टेंबरला शिर्डीत सुवर्ण कलशारोहण स्मृतिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी शिर्डी ग्रामस्थ आणि पारनेरकर गुरू सेवा मंडळाच्या वतीनं सुवर्ण कलशारोहणाचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

शिर्डी साईबाबा मंदिर (Source - ETV Bharat Reporter)

चांदीच्या पादुका अर्पण : साई मंदिर कलशा रोहणाचा आज 72 वा स्मृतीदिन असून 75 व्या अमृत महोत्सवाकडं वाटचाल सुरू झाली आहे. पारनेरकर गुरुसेवा मंडळांच्या वतीनं चांदीच्या पादुका आणि कलशाचं पुजन करत 'साईसमाधी मंदिर सुवर्ण कलशारोहण स्मृतीदिन अमृत महोत्सवा'चं उद्धघाटन करण्यात आलं. यानिमित्तानं पारनेरकर गुरुसेवा मंडळाच्या वतीनं साईसंस्थानला चांदीच्या पादुका अर्पण करण्यात आल्या.

हेही वाचा

  1. पुण्यात काचेच्या कारखान्यात भीषण दुर्घटना; काचेचे तुकडे घुसल्यानं चार कामगारांचा मृत्यू - Pune Glass Factory Mishap
  2. "सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाची वाट खुली केली, तर सरकारनं 'लाडकी बहीण योजने'तून..." - CM Eknath Shinde On Phule
  3. नैराश्याला कलेनं दिली कलाटणी; अकाली सेवानिवृत्ती घेऊन घरी बसलेल्या शिक्षकानं निर्माण केली 'लाकूडसृष्टी' - Amravati Wooden Arts

ABOUT THE AUTHOR

...view details