महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योजकांसोबत चार हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार - Minister Uday Samant

Minister Uday Samant: उद्योजकांनी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविला असून आज (8 फेब्रुवारी) सुमारे ४ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. (Investment of Businessma) या माध्यमातून सुमारे ५ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील, असं प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं. पिंपरी चिंचवड शहारातील वाकड येथील हॉटेल टिपटॉप येथे आयोजित महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचं वितरण तसंच देशातील २४ तज्ञ संस्थासोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते.

In presence of Industries Minister Uday Samant
उद्योगमंत्री उदय सामंत

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 8:34 PM IST

पिंपरी चिंचवड (पुणे) Minister Uday Samant: मंत्री उदय सामंत म्हणाले, पुण्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगानं होत आहे. विविध प्रकारच्या उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा येथे असून नवीन उद्योगांसाठी चांगली संधी आहे. (distribution of export awards) पुण्याची क्षमता राज्यासह देशाला कळावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यापुढे अशा प्रकारचा 'उद्योजकांचा मेळा' प्रत्येक जिल्ह्यात भरविण्यात येईल. यामुळे त्या जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण तयार होईल. विविध उद्योजक आकर्षित होऊन तेथील उद्योगांमध्ये वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'निर्यात धोरण २०२३' जाहीर:अल्ट्रामेगा प्रकल्पासोबत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला चांगल्या सुविधा देणं गरजेचं आहे. उद्योजक उद्योग करीत असताना त्यासाठी निर्यात ही महत्त्वाची असून हीच बाब विचारात घेऊन 'निर्यात धोरण २०२३' जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाच्या माध्यमातून उद्योजकांना अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर निर्माण होत असून आगामी काळात जगातील डेटा सेंटरचे हब म्हणून महाराष्ट्र राज्य ओळखले जाईल, असा विश्वास सामंतांनी व्यक्त केला.

कृत्रिम बुद्धिमत्ता पार्क निर्माण करण्याबाबत विचार:आगामी काळात देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आणण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता पार्क निर्माण करण्याबाबत विचार करण्यात येईल. राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता पार्क निर्माण करताना संरक्षण, आरोग्य, क्रीडा, कृषी आदी क्षेत्रांचा विचार करण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत इलेक्ट्रिकल वाहन, हायड्रोजन या क्षेत्राच्या विकासाबाबतही प्रयत्न करण्यात येत आहे, असंही मंत्री सामंत म्हणाले.

गडचिरोली उद्योगनगरी म्हणून ओळखली जाईल:उद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी उद्योजकांशी सतत चर्चा करण्यात येत आहे. शासनाच्यावतीनं त्यांना उद्योगपुरक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात परकीय गुंतवणूक वाढत असून उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात १ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असून येत्या काळात गडचिरोली उद्योगनगरी म्हणून ओळखली जाईल, असंही सामंत म्हणाले.

यासाठी ‘मैत्री’ संकेतस्थळ सुरू:उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, राज्यात परकीय गुंतवणुकीसह उद्योगामध्ये वाढ झाली पाहिजे. याकरिता उद्योग विभागाच्यावतीनं काम करण्यात येत आहे. उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवान्यासाठी ‘मैत्री’ संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून आवश्यक त्या सर्व परवानग्या विहित मुदतीत देण्यात येत आहेत. राज्यात निर्यात धोरणाच्या अनुषंगानं सूचना असल्यास उद्योग विभागाला कळवाव्या, असंही आवाहन त्यांनी केलं.


उद्योग मंत्र्यांची महाटेक-२०२४ प्रदर्शनाला भेट:उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित 'महाटेक २०२४' या लघु व मध्यम उद्योजकांच्या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली. यावेळी लघु व मध्यम उद्योजकांच्या विकासासाठी शासन प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

'या' मान्यवरांची उपस्थिती:कार्यक्रमाला उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योगविकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ, अपर उद्योग संचालक संजय कोरबु, उद्योग सह संचालक शैलेश रजपूत आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

  1. डोळ्यात मिरची स्प्रे मारून तरुणाची भर रस्त्यात गुंडांकडून हत्या, कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का
  2. काँग्रेसचा 'हात' सोडण्यामागचं बाबा सिद्दीकींनी सांगितलं कारण; 'या' पक्षात करणार प्रवेश
  3. मंडल आयोगाला चॅलेंज करावंच लागेल; मनोज जरांगे पाटील यांनी दिला इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details