महाराष्ट्र

maharashtra

बनावट पासपोर्टवर केला होता पाकिस्तानचा दौरा; दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी - FAKE PASSPORT CASE

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 10:01 PM IST

FAKE PASSPORT CASE : बनावट कागदपत्राच्या आधारे पाकिस्तानात जाऊन लग्न करणाऱ्या नगमा उर्फ सनम खान (Sanam Khan) प्रकरणात जसवंत राठोडला वर्तनगर पोलिसांनी अटक केली होती. जसवंत राठोड याच्या आधारकार्ड सेंटरमध्ये नगमानं आधारकार्ड बनवलं होतं. याप्रकरणी आता दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

FAKE PASSPORT CASE
नगमा न्यायालयीन कोठडीत रवानगी (File Photo)

ठाणे FAKE PASSPORT CASE : पाकिस्तान रिटर्न प्रकरणी नगमा उर्फ सनम खान (Sanam Khan) आणि आधारकार्ड बनवणाऱ्या जसवंत राठोड (Jaswant Rathod) या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी ठाणे न्यायालयाने या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. बनावट कागदपत्रांच्या मदतीने पासपोर्ट तयार करून पाकिस्तानचा दौरा करणाऱ्या नगमाने पाकिस्तानी तरुणाशी विवाह केला होता. ती पाकिस्तानवरून परतल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशीसाठी तिला ताब्यात घेतलं होतं.

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली : चार दिवस कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी नगमाला अटक केली होती. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला होता. पोलीस तपासात तिने ठाण्यातील पाडा नंबर ४ येथील डिजिटल आधार केंद्रातून आधारकार्ड अपडेट केल्याचं उघड झालं आहे. त्यासाठी तिने 20 हजार रुपये दिल्याचं निष्पन्न झालं होतं. जसवंत राठोड याने बनावट कागदपत्रांच्या मदतीनं नगमा उर्फ सनम खानचे आधारकार्ड बनवल्याचा संशयावरून पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली होती. तसेच जसवंतला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, दोघांचीही पोलीस कोठडी शनिवारी संपल्यानं न्यायालयाने आज दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळं, नगमा उर्फ सनम खान आणि जसवंत राठोड यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय आहे प्रकरण :सनम खान उर्फ नगमा या महिलेनं बनावट पासपोर्ट तयार करुन थेट पाकिस्तान गाठल्यानं ती चर्चेत आहे. बनावट कागदपत्रांच्या मदतीनं ती पाकिस्तानात पोहोचली होती. एक महिना पाकिस्तानात घालवल्यानंतर ती भारतात परतली. तर सनम खान ही २३ वर्षाची विवाहित महिला असून तिला दोन मुली आहेत. परंतु ती नवऱ्यापासून विभक्त राहते. सध्या ती तिच्या आईसह ठाण्यात वास्तव्यात होती. तिची सोशल माध्यमांवरुन पाकिस्तानातल्या बशीर बरोबर मैत्री झाली. ते दोघं सहा महिने एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्यात प्रेम झालं. त्याला भेटण्यासाठी नगमानं कागदपत्रांची जुळवाजुळव करून पाकिस्तान गाठलं होतं. तिथं जावून तिनं बशीरशी लग्न केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details