महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 10:56 PM IST

ETV Bharat / state

इंडिया आघाडीचं सरकार आल्यास निवडणूक आयोगाच्या सदस्य निवड प्रक्रिया बदलणार - पृथ्वीराज चव्हाण - India Alliance

India Alliance : निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेतून सरन्यायाधीशांना काढण्यावर काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. इंडिया आघाडीची सत्ता आल्यास निवडणूक आयोगावरील सदस्य निवडीची प्रक्रिया बदलून सरन्यायाधीशांचा समावेश करू, असं त्यांनी म्हटलं आहे.

Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण (Reporter ETV Bharat MH)

साताराIndia Alliance : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच वर्षाच्या सुरुवातीला निवडणूक आयोगाची निवड प्रक्रिया बदलून सरन्यायाधीशांना काढून टाकत पंतप्रधान, एक मंत्री आणि विरोधी पक्षनेता एवढेच पद ठेवले. आमचं सरकार आल्यास आम्ही निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया बदलून त्यामध्ये सरन्यायाधीशांचा समावेश करू, असं त्यांनी सांगितलं.

पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद (Reporter ETV Bharat MH)


निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया बदलणार :काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र दुष्काळ पाहणी समितीचे अध्यक्ष, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, निवडणूक आयोगावरील एकटा विरोधी पक्षनेता काय करणार? नव्या व्यवस्थेत दोन निवडणूक आयुक्त नेमले. यामुळं आमचं सरकार आल्यावर सर्वप्रथम आम्ही निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया बदलू.

ऐन दुष्काळात सरकार निद्रिस्तावस्थेत :दुष्काळाच्या प्रश्नावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सरकार निद्रितावस्थेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दुष्काळाची माहिती देऊन आचारसंहिता शिथिल करण्याबाबत सरकारनं निवडणूक आयोगाला विनंती करावी, असं आवाहनही त्यांनी केलंय.

सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेस तत्पर :दुष्काळाची दाहकता सरकारला अजून समजलेली दिसत नसल्यानं सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. जनावरे पाण्याविना तडफडत आहेत. शेकडो गावं आणि शहरांमध्ये 15 दिवसातून एकदा पाणी येत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून तात्काळ उपाययोजना केल्या जाण्यासाठी काँग्रेस तत्पर राहणार असल्याचं त्यांनी सागितलं.

राज्यपालांचं काम मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानंच :आचारसंहिताच्या नावाखाली काही करायचं नाही, हा नवीन पायंडा पाडला जात आहे. लोकसभा गठीत होईपर्यंत आचारसंहिता हटवायची नाही, असं चुकीचं धोरण सरकारनं घेतलं आहे. तसंच राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानंच काम करत असल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.

हे वाचलंत का :

  1. राज्यातील 48 मतदारसंघांत कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024
  2. "उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत..."; लोकसभा निकालाच्या काही तासाआधी शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा - Uddhav Thackeray Mahavikas Aghadi
  3. "...तर सिव्हिल वार होईल"; कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचा दावा काय? - Lok Sabha result

ABOUT THE AUTHOR

...view details