चंद्रपूर Women Protest In Heavy Rain : भद्रावती तालुक्यातील बरांज इथल्या केपीसीएल कोळसा कंपनीच्या विरोधात महिलांनी आंदोलन छेडलं आहे. कोळसा खाणीच्या तळाशी असलेल्या पाण्यात उतरुन या महिलांनी आंदोलन सुरू केलं आहे. कंपनी व्यवस्थापनाकडून लिखित आश्वासन मिळत नाही, तोवर आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्र घेतला आहे. अशातच शनिवारी रात्री पाऊस आणि गारपीट झाली. त्यावेळी देखील गारपीटीचा मारा सहन करत महिलांनी हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्र घेतला आहे. त्यामुळं या महिला अजूनही कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड खाणीच्या तळाशी जाऊन आंदोलन करत आहेत.
59 दिवसांपासून महिलांनी पुकारलं उपोषण :भद्रावती तालुक्यातील बरांज मोकसा या गावचे पुनवर्सन न करता आणि प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल) या कोळसा कंपनीने कोळसा उत्पादनाचे काम सुरू केले आहे. याचा संपूर्ण गावातून विरोध होतो आहे. गेल्या 59 दिवसांपासून येथील महिलांनी उपोषण पुकारले आहे. मात्र प्रशासनानं याची दखल घेतली नाही. यापूर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आंदोलकर्त्या महिला आणि कंपनीच्या अधिकाऱ्याशी चर्चा केली. मात्र यात कुठलाही ठोस तोडगा निघाला नाही. प्रशासन आणि कंपनीकडून लिखित आश्वासन दिलं नाही म्हणून हे आंदोलन कायम ठेवण्यात आलं आहे.