नवी दिल्ली : भारतीय नौदलाने 28 आणि 29 जानेवारी रोजी अरबी समुद्रात हल्लेखोरांकडून होणाऱ्या मोठ्या अपहरणाचे प्रयत्न अवघ्या 24 तासांत हाणून पाडले आहेत. संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदल युद्धनौका (INS) सुमित्राच्या माध्यमातून रविवारी एफव्ही इमान या इराणी जहाजाची सुटका केल्यानंतर सुमित्राने दुसऱ्या ऑपरेशनमध्ये अल नैमी या जहाजाची सोमालियन हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका केली. या कारवाईत भारतीय सागरी कमांडोनेही भाग घेतल्याचं वृत्त आहे.
कडक दक्षता बाळगली : ही घटना केरळच्या कोचीच्या किनाऱ्यापासून 800 मैल दूर अरबी समुद्रात घडली आहे. समुद्री हल्लेखोरांनी इराणचा ध्वज असलेले जहाज आणि त्यातील क्रू सदस्यांना ओलीस ठेवलं. यानंतर भारतीय नौदलाने आपली युद्धनौका आयएनएस सुमित्रा पाठवून सर्वांना सुखरूप बाहेर काढलं. अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, "जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारताने हिंद महासागरात सर्वत्र कडक दक्षता बाळगली आहे."
हल्लेखोरांच्या पलायनाची खात्री : भारतीय नौदलाने एक निवेदन जारी केलं आहे. त्यामध्ये 29 जानेवारी रोजी अल-नईमीच्या सुटकेसाठी ऑपरेशन केलं. विमानातील सर्व 19 क्रू मेंबर्स पाकिस्तानी नागरिक आहेत. जहाजाला वेढा घातल्यानंतर, मरीन कमांडोजनी ऑपरेशन केलं. तसंच, जहाजातून हल्लेखोरांच्या पलायनाची खात्री केली.
मासेमारी जहाजात 19 पाकिस्तानी प्रवासी होते : भारतीय नौदलाने एका निवेदनात म्हटलं आहे की, नौदल जहाज सुमित्रा सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ आणखी एक यशस्वी हल्लेखोरविरोधी ऑपरेशन केलं आहे. भारतीय नौदलाने 11 सोमाली हल्लेखोरांपासून मासेमारी जहाज अल नामी आणि त्याच्या क्रूची सुटका केली आहे. या जहाजावर 19 पाकिस्तानी नागरिकही होते.