मुंबई- राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यांच्याकडून कोरोना विषाणू आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर ज्या पद्धतीने काम सुरू आहे ते पाहून क्रिकेटपटू धवल कुलकर्णी चांगलाच प्रभावित झाला आहे. त्याने महापालिका आणि राज्य सरकारच्या कामाचे ट्विटद्वारे कौतुक केले आहे. मुंबई महापालिकेने यावर 'हे तर आमचे कर्तव्यच आहे' असे म्हणत त्याला प्रतिसाद दिला आहे.
धवल कुलकर्णीने आपल्या ट्विटमध्ये राज्य सरकार कोरोना बाबतीत अलर्ट आहे. मुंबई पालिका तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी २४ तास दक्ष आहेत. ते लोकांना मदत तसेच समाजात जागरुकता करत आहेत. यामुळे त्यांना 'सलाम' असे म्हणत त्याने त्या सर्वांचे आभार मानले आहे.
दरम्यान धवलने केलेल्या कौतुकावर मुंबई महापालिकेने, हे तर आमचे कर्तव्यच आहे, असं उत्तर दिलं आहे. तसेच त्यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करत आहोत. यासाठी नागरिकांनीही आम्हाला सहकार्य करावं, असे आवाहन केलं आहे.