माहीमच्या विकासासाठी मतदान केलं - अनुप जलोटा यांची सूचक प्रतिक्रिया - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video


Published : Nov 20, 2024, 2:28 PM IST
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) आज (20 नोव्हेंबर) मतदान होतंय. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ भजन सम्राट अनुप जलोटा यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय. अनुप जलोटा यांनी मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून मतदान केलं. तसंच आपण 'माहीमच्या विकासासाठी मतदान' केल्याची प्रतिक्रिया अनुप जलोटा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना दिली. यंदाच्या निवडणुकीत 'बटेंगे तो कटेंगे' हा नारा चर्चेत राहिला. याबाबत अनुप जलोटा यांना विचारलं असता ते म्हणाले की, "हा योग्य नारा आहे. महाराष्ट्रातील काही पक्ष विभक्त झाले. अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले. त्यांनी या घोषणेचा योग्य अर्थ घ्यायला हवा. प्रत्येक पक्षाची तत्व असतात त्या तत्वानुसारच या सर्व नेत्यांनी चालायला हवं. त्यामुळं आपला देशही प्रगती करेल आणि त्यांचा पक्ष देखील प्रगती करेल. या निवडणुकीनंतर जो कोणताही पक्ष सत्तेत येईल त्या पक्षानं केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांचं पालन करावं", अशी प्रतिक्रिया अनुप जलोटा यांनी दिली आहे.