ETV Bharat / state

XXX टोळ्या घेऊन आमच्याशी लढणार का, संजय राऊतांचा हल्लाबोल; कवचकुंडलं काढून मैदानात या, सरकारला आव्हान - Sanjay Raut Slams Devendra Fadnavis

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 2:08 PM IST

Sanjay Raut Slams Devendra Fadnavis : उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाची पातळी घसरवली आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Sanjay Raut Slams Devendra Fadnavis
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

मुंबई Sanjay Raut Slams Devendra Fadnavis : नवीनच बांधलेल्या संसद भवनामध्ये पावसाच्या पाण्यामुळं गळती लागली आहे. देशभरामध्ये मोदी-शाह यांच्या ठेकेदारांनी बनवलेले रस्ते, पूल यांची वाईट अवस्था आहे. देशभरातील अनेक प्रकल्प किती तकलादू आहेत, हे आता समजू लागले आहे. यातून किती कमिशन गेले असेल, याचा अंदाज लावता येईल. महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग, अटल सेतू असे अनेक प्रकल्प बनवले. परंतु या प्रकल्पाची अत्यंत वाईट अवस्था आहे, अशी टीका संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली.

राम मंदिर बांधले त्यालाही लागली गळती : "अयोध्येत राम मंदिर बांधलं, त्यालाही गळती लागली. तेही काम नीट झालं नाही. आपापल्या ठेकेदारांना हजारो-हजारो कोटींची कामं द्यायची आणि त्या ठेकेदारांकडून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. हे रस्ते, इमारतीपासून ते संसदेच्या इमारतीपर्यंत लूट सुरू आहे. त्यामुळे देशाची राष्ट्रीय अस्मिता कुठं शिल्लक आहे. यांना उलट प्रश्न विचारायचे नाही. शंका उपस्थित केली की तो राष्ट्रद्रोह. त्याला देशद्रोही ठरवले जाते," असा हल्लाबोल संजय राऊतांनी संसदेतील पाणी गळतीवरून मोदी सरकारवर केला.

उद्धव ठाकरेंनी घाव घातला : संजय राऊत म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी टीका केली नाही, तर तलवार ऊपसून घाव घातला आहे. देवेंद्र फडणवीस हे संघ विचाराचे असल्याचं म्हणतात. स्वतःला सुसंस्कृत, प्रखर राष्ट्रवादी मानतात. पण महाराष्ट्रात माणूस किती भ्रष्ट, अनितिमत्ता, क्रूर असू शकतो. ही त्यांनी आपल्या कपट आणि कट-कारस्थानातून दाखवलं आहे. हाच खरा चेहरा देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे संघ बदनाम होतोय," अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस राहतील, किंवा मी राहीन असं म्हटलं. पण आम्हीच राहणार आहोत. आणि तू जाणार आहेस. ही महाराष्ट्राच्या हितासाठी केलेली लढाई आहे. ही व्यक्तिगत टीका नाही आहे. ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीचा संघ परिवाराच्या विचारांशी काही संबंध नाही. संघाला फार मोठी परंपरा आहे. या टोळ्यांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात दळभद्री घाणेरडं, गटारी पद्धतीचं राजकारण सुरू केलं. त्याचे परिणाम महाराष्ट्र बघतोय. महाराष्ट्राची अवस्था अत्यंत बिघडलेली आहे. याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत. हे मी अनेक दिवसापासून सांगतोय, महाराष्ट्राच्या मातीत ढोंग, कट-कारस्थान, कपाट हे चालत नाही. आम्ही कुणाच्या कुटुंबापर्यंत, मुलाबाळापर्यंत कधी गेलो नव्हतो. पण या लोकांनी याला सुरुवात केली," असा हल्लाबोल संजय राऊतांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर केला.

XXX टोळ्या घेऊन आमच्याशी लढणार का ? : "तुम्ही आमच्या नादी लागणार म्हणजे काय करणार? पोलिसांना सांगणार, ईडी, सीबीआय यांचा आधार घ्यायचं सोडा आणि आमच्यासमोर या. तुम्ही आमच्या नादी लागाच, आमचं आव्हान आहे तुम्हाला. लोकसभा निवडणुकीत तुम्ही आमच्या नादी लागला, तुमचा पराभव केला. आता तुमची बोलकी पोपटगिरी बंद करा. तुमची आमच्या नादी लागण्याची हिंमत नाही. उद्धव ठाकरेंनी काल जे आव्हान दिलं ते एका मर्द-मराठ्याचं आव्हान आहे. कपटी आणि कारस्थानी लोकांनी आमच्या नादी लागावं. फालतू टोळ्या घेऊन तुम्ही आमच्याशी लढणार का? XXX टोळ्या घेऊन आमच्याशी लढणार का ?" असा प्रहार संजय राऊतांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील नेत्यांवर केला.

संघ काय करतोय ? : पुढं बोलताना संजय राऊत म्हणाले की, "संघाची विचारधारा आणि आताच्या भाजपाच्या लोकांची विचारधारा पूर्ण वेगळी आहे. आम्ही संघाला पाहत आलोय. देशाची संस्कृती आणि परंपरा ही सत्तेत बसलेला लोकांनी खतम केली आहे. हे सगळं होत असताना संघ काय करतोय?" असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. "ज्या संघाचा भारताच्या स्वतंत्र लढ्यात एका बिंदूचाही समावेश नाही. त्यांनी आमच्याशी लढण्याची भाषा करायची नाही," असा इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला.

देवेंद्र फडणवीसांचा पराभव होईल : "महाराष्ट्रावर 8 लाख कोटींचं कर्ज असताना योजनांची खैरात केली जाते. महिलांसाठी पैसे वाटले जात आहे, याचं आम्हाला दुःख नाही. पण पैसे आणणार कुठून? विधानसभा निवडणुकीत मतांसाठी हे सुरू आहे, पण तुमचं सरकार औटघटकेचं आहे. तुम्ही आगामी काळात सत्तेत राहणार नाही. देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत पराभव होणार आहे. नागपूर हे काय त्यांच्या नावावर सातबारा नाही. नरेंद्र मोदी वारणसीत धडपडीत जिंकले आहेत. त्यांनी विजय शेवटच्या क्षणी मॅनेज केला आहे. हे लोकं अजिंक्य आहेत का? ईडी, सीबीआय आणि पोलीस सोडलं तर त्यांच्याकडं आहे काय? नैतिकतेचा न देखील यांच्याकडं नाही आहे. हे मी जबाबदारीनं बोलतो," असंही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा :

  1. "ही सगळी हारुन अल-रशीदची पोरं...", वेषांतरावरून संजय राऊतांचा सणसणीत टोला - sanjay raut criticise on ajit pawar
  2. "मुख्यमंत्री शिंदे मौलवीच्या वेशात दिल्लीला जाऊन...", वेषांतराच्या मुद्द्यावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Criticism
  3. "शिंदे दिल्लीत जाऊन दाढीवर हात..." - संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका - SANJAY RAUT NEWS

मुंबई Sanjay Raut Slams Devendra Fadnavis : नवीनच बांधलेल्या संसद भवनामध्ये पावसाच्या पाण्यामुळं गळती लागली आहे. देशभरामध्ये मोदी-शाह यांच्या ठेकेदारांनी बनवलेले रस्ते, पूल यांची वाईट अवस्था आहे. देशभरातील अनेक प्रकल्प किती तकलादू आहेत, हे आता समजू लागले आहे. यातून किती कमिशन गेले असेल, याचा अंदाज लावता येईल. महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग, अटल सेतू असे अनेक प्रकल्प बनवले. परंतु या प्रकल्पाची अत्यंत वाईट अवस्था आहे, अशी टीका संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली.

राम मंदिर बांधले त्यालाही लागली गळती : "अयोध्येत राम मंदिर बांधलं, त्यालाही गळती लागली. तेही काम नीट झालं नाही. आपापल्या ठेकेदारांना हजारो-हजारो कोटींची कामं द्यायची आणि त्या ठेकेदारांकडून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. हे रस्ते, इमारतीपासून ते संसदेच्या इमारतीपर्यंत लूट सुरू आहे. त्यामुळे देशाची राष्ट्रीय अस्मिता कुठं शिल्लक आहे. यांना उलट प्रश्न विचारायचे नाही. शंका उपस्थित केली की तो राष्ट्रद्रोह. त्याला देशद्रोही ठरवले जाते," असा हल्लाबोल संजय राऊतांनी संसदेतील पाणी गळतीवरून मोदी सरकारवर केला.

उद्धव ठाकरेंनी घाव घातला : संजय राऊत म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी टीका केली नाही, तर तलवार ऊपसून घाव घातला आहे. देवेंद्र फडणवीस हे संघ विचाराचे असल्याचं म्हणतात. स्वतःला सुसंस्कृत, प्रखर राष्ट्रवादी मानतात. पण महाराष्ट्रात माणूस किती भ्रष्ट, अनितिमत्ता, क्रूर असू शकतो. ही त्यांनी आपल्या कपट आणि कट-कारस्थानातून दाखवलं आहे. हाच खरा चेहरा देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे संघ बदनाम होतोय," अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस राहतील, किंवा मी राहीन असं म्हटलं. पण आम्हीच राहणार आहोत. आणि तू जाणार आहेस. ही महाराष्ट्राच्या हितासाठी केलेली लढाई आहे. ही व्यक्तिगत टीका नाही आहे. ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीचा संघ परिवाराच्या विचारांशी काही संबंध नाही. संघाला फार मोठी परंपरा आहे. या टोळ्यांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात दळभद्री घाणेरडं, गटारी पद्धतीचं राजकारण सुरू केलं. त्याचे परिणाम महाराष्ट्र बघतोय. महाराष्ट्राची अवस्था अत्यंत बिघडलेली आहे. याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत. हे मी अनेक दिवसापासून सांगतोय, महाराष्ट्राच्या मातीत ढोंग, कट-कारस्थान, कपाट हे चालत नाही. आम्ही कुणाच्या कुटुंबापर्यंत, मुलाबाळापर्यंत कधी गेलो नव्हतो. पण या लोकांनी याला सुरुवात केली," असा हल्लाबोल संजय राऊतांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर केला.

XXX टोळ्या घेऊन आमच्याशी लढणार का ? : "तुम्ही आमच्या नादी लागणार म्हणजे काय करणार? पोलिसांना सांगणार, ईडी, सीबीआय यांचा आधार घ्यायचं सोडा आणि आमच्यासमोर या. तुम्ही आमच्या नादी लागाच, आमचं आव्हान आहे तुम्हाला. लोकसभा निवडणुकीत तुम्ही आमच्या नादी लागला, तुमचा पराभव केला. आता तुमची बोलकी पोपटगिरी बंद करा. तुमची आमच्या नादी लागण्याची हिंमत नाही. उद्धव ठाकरेंनी काल जे आव्हान दिलं ते एका मर्द-मराठ्याचं आव्हान आहे. कपटी आणि कारस्थानी लोकांनी आमच्या नादी लागावं. फालतू टोळ्या घेऊन तुम्ही आमच्याशी लढणार का? XXX टोळ्या घेऊन आमच्याशी लढणार का ?" असा प्रहार संजय राऊतांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील नेत्यांवर केला.

संघ काय करतोय ? : पुढं बोलताना संजय राऊत म्हणाले की, "संघाची विचारधारा आणि आताच्या भाजपाच्या लोकांची विचारधारा पूर्ण वेगळी आहे. आम्ही संघाला पाहत आलोय. देशाची संस्कृती आणि परंपरा ही सत्तेत बसलेला लोकांनी खतम केली आहे. हे सगळं होत असताना संघ काय करतोय?" असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. "ज्या संघाचा भारताच्या स्वतंत्र लढ्यात एका बिंदूचाही समावेश नाही. त्यांनी आमच्याशी लढण्याची भाषा करायची नाही," असा इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला.

देवेंद्र फडणवीसांचा पराभव होईल : "महाराष्ट्रावर 8 लाख कोटींचं कर्ज असताना योजनांची खैरात केली जाते. महिलांसाठी पैसे वाटले जात आहे, याचं आम्हाला दुःख नाही. पण पैसे आणणार कुठून? विधानसभा निवडणुकीत मतांसाठी हे सुरू आहे, पण तुमचं सरकार औटघटकेचं आहे. तुम्ही आगामी काळात सत्तेत राहणार नाही. देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत पराभव होणार आहे. नागपूर हे काय त्यांच्या नावावर सातबारा नाही. नरेंद्र मोदी वारणसीत धडपडीत जिंकले आहेत. त्यांनी विजय शेवटच्या क्षणी मॅनेज केला आहे. हे लोकं अजिंक्य आहेत का? ईडी, सीबीआय आणि पोलीस सोडलं तर त्यांच्याकडं आहे काय? नैतिकतेचा न देखील यांच्याकडं नाही आहे. हे मी जबाबदारीनं बोलतो," असंही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा :

  1. "ही सगळी हारुन अल-रशीदची पोरं...", वेषांतरावरून संजय राऊतांचा सणसणीत टोला - sanjay raut criticise on ajit pawar
  2. "मुख्यमंत्री शिंदे मौलवीच्या वेशात दिल्लीला जाऊन...", वेषांतराच्या मुद्द्यावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Criticism
  3. "शिंदे दिल्लीत जाऊन दाढीवर हात..." - संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका - SANJAY RAUT NEWS
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.