ETV Bharat / state

मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी 4 जागांवर अद्यापही उमेदवारीबाबत घोळ कायम - Mumbai Lok Sabha Seats

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 5, 2024, 5:12 PM IST

LOK SABHA ELECTION 2024 : लोकसभा निवडणुकीचं वारं जोमाने वाहत असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर कोणाची सत्ता राहणार? याबाबत राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. मुंबईतील एकूण 6 लोकसभा मतदारसंघांपैकी सध्याच्या घडीला भाजपाकडे गोपाल शेट्टी, मनोज कोटक, पूनम महाजन असे 3, शिवसेना शिंदे गटाकडे राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर असे 2, उबाठा गटाकडे अरविंद सावंत हे एकमेव खासदार आहेत. (six Lok Sabha seats in Mumbai) मुंबईवर आपलं वर्चस्व दाखवण्याची धडपड सर्वच राजकीय पक्ष करत असताना काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार सध्या मुंबईतील निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने तिन्ही काँग्रेसकडून याबाबत खेद व्यक्त जात असून मुंबईतील एक तरी जागा लढवण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. परंतु, सध्याच्या घडीला पाहिलं तर मुंबईवर शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे. परंतु, सध्याच्या राजकीय वातावरणात दोन्ही गटातील नेत्यांना अद्याप उमेदवार ठरवता आले नसल्याने उमेदवारांबाबत अजूनही घोळ सुरू आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

मुंबई : LOK SABHA ELECTION 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने मुंबई उत्तर पूर्व मधून विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट केला असून त्यांच्या जागी आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी घोषित केली आहे. तर, मुंबई उत्तर मधून गोपाल शेट्टी यांचाही पत्ता कट केला असून त्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर मध्य मुंबई मधून पूनम महाजन यांच्या जागेवर दुसऱ्या उमेदवाराची चर्चा भाजपाकडून सुरू आहे. (mumbai lok sabha) जर तसं झाल्यास यंदा भाजपा मुंबईतील आपल्या तिन्ही विद्यमान खासदारांना घरी बसवणार आहे. दुसरीकडे उत्तर पश्चिम मतदारसंघातून एकनाथ शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचाही पत्ता कट झाल्यात जमा आहे. उबाठा गटातून या जागेवर एकनाथ शिंदे यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली असल्याकारणाने त्या विरोधामध्ये गजानन कीर्तिकर निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे गट या मतदारसंघातून उमेदवाराच्या शोधात आहे.

वायकर यांचा निवडणूक लढवण्यास नकार : माजी खासदार, चित्रपट अभिनेता गोविंदा आहुजा यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. उत्तर पश्चिम मतदार संघातून गोविंदा यांना उमेदवारी दिली जाणार अशी शक्यता होती. परंतु, शिंदे गटातीलच काही नेत्यांनी त्यास विरोध केल्याने गोविंदाचे नाव मागे पडलं आहे. शिवाय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गोविंदा दोघांनीही गोविंदा यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. आता या जागेवर उबाठा गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले आमदार रवींद्र वायकर यांच्याही नावाची चर्चा होती. परंतु, वायकर यांनीही निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. वायकर निवडणूक लढवणार असतील तर प्रचारावर बहिष्कार घालण्याची भाषा स्थानिक भाजपा नेत्यांनी केली होती. अशा परिस्थितीमध्ये मराठी तसंच उत्तर भारतीय मतदारांचा टक्काही जास्त असलेल्या या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यावी हा पेच एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे.

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघावरून काँग्रेस नाराज : मुंबई दक्षिण या मतदार संघात उबाठा गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी सतत दोनदा बाजी मारली असून यंदा ते हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. महायुतीत ही जागा एकनाथ शिंदे गटाकडे असली तरी या जागेवर अद्याप त्यांना उमेदवार सापडत नाही. तसंच, मनसे महायुतीत सामील झाल्यास या जागेवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं जाण्याची शक्यता आहे. परंतु, महायुतीबरोबर मनसेचे सूर जुळत नसल्याने या मतदारसंघांमध्येही अद्याप उमेदवाराबाबत संभ्रम आहे. उत्तर पूर्व मुंबई (ईशान्य) या मतदारसंघात उबाठा गटाकडून संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपाने येथे आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात थेट उबाठा विरुद्ध भाजपा अशी रंगतदार लढत होणार आहे.

खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून उद्धव ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस नाराज आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात एकनाथ शिंदे गटाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अनुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम असे विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. यापैकी अनुशक्ती नगरमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक, चेंबूर मध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश फातर्पेकर, माहीममध्ये शिंदे गटाचे सदा सरवणकर, वडाळा मतदारसंघात भाजपचे कालिदास कोळंबकर, सायन कोळीवाडा मतदार संघात भाजपचे तमिळ सेलवन, तर धारावी मध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विद्यमान आमदार आहेत.

अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा : विशेष म्हणजे या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व राहिलं असलं तरी सुद्धा काँग्रेसचाही प्रभाव या मतदार संघावर आहे. या मतदारसंघात दादर, माहीम, प्रभादेवी, शिवसेना भवन परिसर येथील मराठी मतदारांचा समावेश असून, अनेक वर्ष शिवसेनेचे वर्चस्व या विभागातून राहिलं आहे. या मतदारसंघातील धारावी या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विद्यमान आमदार असून काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठवण्यात आलेले चंद्रकांत हांडोरे हे सुद्धा याच लोकसभा मतदारसंघातून येतात. आशियातील सर्वात मोठी म्हणून ओळखली जाणारी झोपडपट्टी धारावी याच मतदारसंघात आहे. यापूर्वी या मतदारसंघातून काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांनी शिवसेनेचे मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. या कारणाने या मतदार संघाचा इतिहास पाहता काँग्रेसने येथे प्रखर दावेदारी केली असताना, उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा करून महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचं काम केलं आहे.

मुंबईवर शिवसेनेचंच वर्चस्व : मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचा जागा वाटपाचा तिढा इतका वाढला आहे की, मुंबई उत्तर पूर्व येथे संजय दिना पाटील विरुद्ध मिहीर कोटेचा तर मुंबई दक्षिण मध्यमध्ये अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे या दोन मतदारसंघांमध्येच दोन्ही बाजूने उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात दोन्हीही गटाने आपले उमेदवार अद्याप घोषित केले नसून उमेदवाराच्या शोधात दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत (दि. 20 मे)रोजी पाचव्या टप्प्यामध्ये मतदान होत होणार आहे. याबाबत बोलताना, एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते एडवोकेट वैजनाथ वाघमारे म्हणाले आहेत की, सध्याच्या घडीला मुंबईत शिवसेनेचे तीन खासदार आहेत. त्यापैकी अरविंद सावंत हे जरी उबाठा गटाकडे असले तरीसुद्धा मतदार हे खऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीशी आहेत. म्हणजे ते आमच्याबरोबर आहेत. याचबरोबर मुंबईवर पूर्वीपासून शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. शिवसेना आहे म्हणून मुंबई आहे, असं एक समीकरण पूर्वापार बनलं आहे. यंदाही आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये मताधिक्य मिळणार असून, महायुतीचे सर्व खासदार निवडून येतील यात तिळमात्र शंका नाही. काही ठिकाणी उमेदवारांची घोषणा करण्यास आम्हाला उशीर होत असला तरी आमचा उमेदवार ठरलेला आहे. या उलट उबाठा गटाकडेच उमेदवार नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे. असा आरोपही वाघमारे यांनी केला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून विजयी झालेल्या खासदारांचे मताधिक्य : 2029 लोकसभा निवडणुकीत मुंबईतील 6 मतदार संघापैकी उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे गोपाल शेट्टी हे सर्वाधिक जास्त 4,65,237 मतांनी निवडून आले होते. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन कीर्तिकर हे 2,60,328 मतांनी विजयी झाले होते. तिसऱ्या क्रमांकावर मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) मतदार संघातून भाजपचे मनोज कोटक हे 2,26,486 मतांनी विजयी झाले होते. चौथ्या क्रमांकावर मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे हे 1,52,139 मतांनी विजयी झाले होते. पाचव्या क्रमांकावर मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघातून भाजपच्या पुनम महाजन या 1,30,005 मतांनी विजयी झाल्या होत्या. तर सहाव्या क्रमांकावर मुंबई दक्षिण या मतदारसंघातून शिवसेनेचे अरविंद सावंत हे 1,00,067 मतांनी विजयी झाले होते.

हेही वाचा :

1 विदर्भाच्या रखरखत्या उन्हात तापणार राजकीय वातावरण; दिग्गज नेते करणार आपापल्या उमेदवाराचा प्रचार - Lok Sabha Election 2024

2 काँग्रेस नेतृत्वानं कार्यकर्त्यांची समजूत काढावी; सांगलीच्या जागेवरुन संजय राऊतांचा सल्ला - Sanjay Raut

3 महायुतीतील अंतर्गत लढाई, ठाकरे गटाची महिलेला उमेदवारी; मुख्यमंत्र्यांच्या पुत्राला लोकसभेचा यंदा 'अवघड पेपर' - Kalyan Lok Sabha Constituency

मुंबई : LOK SABHA ELECTION 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने मुंबई उत्तर पूर्व मधून विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट केला असून त्यांच्या जागी आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी घोषित केली आहे. तर, मुंबई उत्तर मधून गोपाल शेट्टी यांचाही पत्ता कट केला असून त्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर मध्य मुंबई मधून पूनम महाजन यांच्या जागेवर दुसऱ्या उमेदवाराची चर्चा भाजपाकडून सुरू आहे. (mumbai lok sabha) जर तसं झाल्यास यंदा भाजपा मुंबईतील आपल्या तिन्ही विद्यमान खासदारांना घरी बसवणार आहे. दुसरीकडे उत्तर पश्चिम मतदारसंघातून एकनाथ शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचाही पत्ता कट झाल्यात जमा आहे. उबाठा गटातून या जागेवर एकनाथ शिंदे यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली असल्याकारणाने त्या विरोधामध्ये गजानन कीर्तिकर निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे गट या मतदारसंघातून उमेदवाराच्या शोधात आहे.

वायकर यांचा निवडणूक लढवण्यास नकार : माजी खासदार, चित्रपट अभिनेता गोविंदा आहुजा यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. उत्तर पश्चिम मतदार संघातून गोविंदा यांना उमेदवारी दिली जाणार अशी शक्यता होती. परंतु, शिंदे गटातीलच काही नेत्यांनी त्यास विरोध केल्याने गोविंदाचे नाव मागे पडलं आहे. शिवाय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गोविंदा दोघांनीही गोविंदा यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. आता या जागेवर उबाठा गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले आमदार रवींद्र वायकर यांच्याही नावाची चर्चा होती. परंतु, वायकर यांनीही निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. वायकर निवडणूक लढवणार असतील तर प्रचारावर बहिष्कार घालण्याची भाषा स्थानिक भाजपा नेत्यांनी केली होती. अशा परिस्थितीमध्ये मराठी तसंच उत्तर भारतीय मतदारांचा टक्काही जास्त असलेल्या या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यावी हा पेच एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे.

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघावरून काँग्रेस नाराज : मुंबई दक्षिण या मतदार संघात उबाठा गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी सतत दोनदा बाजी मारली असून यंदा ते हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. महायुतीत ही जागा एकनाथ शिंदे गटाकडे असली तरी या जागेवर अद्याप त्यांना उमेदवार सापडत नाही. तसंच, मनसे महायुतीत सामील झाल्यास या जागेवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं जाण्याची शक्यता आहे. परंतु, महायुतीबरोबर मनसेचे सूर जुळत नसल्याने या मतदारसंघांमध्येही अद्याप उमेदवाराबाबत संभ्रम आहे. उत्तर पूर्व मुंबई (ईशान्य) या मतदारसंघात उबाठा गटाकडून संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपाने येथे आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात थेट उबाठा विरुद्ध भाजपा अशी रंगतदार लढत होणार आहे.

खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून उद्धव ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस नाराज आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात एकनाथ शिंदे गटाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अनुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम असे विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. यापैकी अनुशक्ती नगरमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक, चेंबूर मध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश फातर्पेकर, माहीममध्ये शिंदे गटाचे सदा सरवणकर, वडाळा मतदारसंघात भाजपचे कालिदास कोळंबकर, सायन कोळीवाडा मतदार संघात भाजपचे तमिळ सेलवन, तर धारावी मध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विद्यमान आमदार आहेत.

अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा : विशेष म्हणजे या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व राहिलं असलं तरी सुद्धा काँग्रेसचाही प्रभाव या मतदार संघावर आहे. या मतदारसंघात दादर, माहीम, प्रभादेवी, शिवसेना भवन परिसर येथील मराठी मतदारांचा समावेश असून, अनेक वर्ष शिवसेनेचे वर्चस्व या विभागातून राहिलं आहे. या मतदारसंघातील धारावी या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विद्यमान आमदार असून काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठवण्यात आलेले चंद्रकांत हांडोरे हे सुद्धा याच लोकसभा मतदारसंघातून येतात. आशियातील सर्वात मोठी म्हणून ओळखली जाणारी झोपडपट्टी धारावी याच मतदारसंघात आहे. यापूर्वी या मतदारसंघातून काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांनी शिवसेनेचे मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. या कारणाने या मतदार संघाचा इतिहास पाहता काँग्रेसने येथे प्रखर दावेदारी केली असताना, उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा करून महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचं काम केलं आहे.

मुंबईवर शिवसेनेचंच वर्चस्व : मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचा जागा वाटपाचा तिढा इतका वाढला आहे की, मुंबई उत्तर पूर्व येथे संजय दिना पाटील विरुद्ध मिहीर कोटेचा तर मुंबई दक्षिण मध्यमध्ये अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे या दोन मतदारसंघांमध्येच दोन्ही बाजूने उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात दोन्हीही गटाने आपले उमेदवार अद्याप घोषित केले नसून उमेदवाराच्या शोधात दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत (दि. 20 मे)रोजी पाचव्या टप्प्यामध्ये मतदान होत होणार आहे. याबाबत बोलताना, एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते एडवोकेट वैजनाथ वाघमारे म्हणाले आहेत की, सध्याच्या घडीला मुंबईत शिवसेनेचे तीन खासदार आहेत. त्यापैकी अरविंद सावंत हे जरी उबाठा गटाकडे असले तरीसुद्धा मतदार हे खऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीशी आहेत. म्हणजे ते आमच्याबरोबर आहेत. याचबरोबर मुंबईवर पूर्वीपासून शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. शिवसेना आहे म्हणून मुंबई आहे, असं एक समीकरण पूर्वापार बनलं आहे. यंदाही आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये मताधिक्य मिळणार असून, महायुतीचे सर्व खासदार निवडून येतील यात तिळमात्र शंका नाही. काही ठिकाणी उमेदवारांची घोषणा करण्यास आम्हाला उशीर होत असला तरी आमचा उमेदवार ठरलेला आहे. या उलट उबाठा गटाकडेच उमेदवार नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे. असा आरोपही वाघमारे यांनी केला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून विजयी झालेल्या खासदारांचे मताधिक्य : 2029 लोकसभा निवडणुकीत मुंबईतील 6 मतदार संघापैकी उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे गोपाल शेट्टी हे सर्वाधिक जास्त 4,65,237 मतांनी निवडून आले होते. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन कीर्तिकर हे 2,60,328 मतांनी विजयी झाले होते. तिसऱ्या क्रमांकावर मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) मतदार संघातून भाजपचे मनोज कोटक हे 2,26,486 मतांनी विजयी झाले होते. चौथ्या क्रमांकावर मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे हे 1,52,139 मतांनी विजयी झाले होते. पाचव्या क्रमांकावर मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघातून भाजपच्या पुनम महाजन या 1,30,005 मतांनी विजयी झाल्या होत्या. तर सहाव्या क्रमांकावर मुंबई दक्षिण या मतदारसंघातून शिवसेनेचे अरविंद सावंत हे 1,00,067 मतांनी विजयी झाले होते.

हेही वाचा :

1 विदर्भाच्या रखरखत्या उन्हात तापणार राजकीय वातावरण; दिग्गज नेते करणार आपापल्या उमेदवाराचा प्रचार - Lok Sabha Election 2024

2 काँग्रेस नेतृत्वानं कार्यकर्त्यांची समजूत काढावी; सांगलीच्या जागेवरुन संजय राऊतांचा सल्ला - Sanjay Raut

3 महायुतीतील अंतर्गत लढाई, ठाकरे गटाची महिलेला उमेदवारी; मुख्यमंत्र्यांच्या पुत्राला लोकसभेचा यंदा 'अवघड पेपर' - Kalyan Lok Sabha Constituency

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.