ETV Bharat / state

मुंबई पुन्हा तुंबली; पावसाला तोंड देण्यास बीएमसी आणि रेल्वेची यंत्रणा अपयशी - Mumbai Heavy Rain

Mumbai Heavy Rain : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पहिल्याच पावसात राज्याची राजधानी मुंबई तुंबल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. अशा परिस्थितीत अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 8, 2024, 3:49 PM IST

Mumbai Heavy Rain
मुंबई पुन्हा तुंबली (Social Media)

मुंबई Mumbai Heavy Rain : मुसळधार पावसानं देशाची आर्थिक राजधानी मुंबई दरवर्षी प्रमाणे पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. मुंबईत मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं मुंबईकरांचा मुख्य आधार असलेली उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता. त्यामुळं अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. अशा परिस्थितीत अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी लोकल सेवा धीम्या गतीनं सुरू आहे. जी परिस्थिती रेल्वे रुळांवर आहे, तीच परिस्थिती मुंबईतील भुयारी मार्ग आणि रस्त्यांवर देखील आहे. त्यामुळं गाड्यांच्या देखील लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जायला उशीर होऊ नये यासाठी मुंबईकर धडपडताना दिसत आहेत. मात्र, अशावेळी प्रश्न पडतो, तो मे महिना अखेरपर्यंत पावसाळी पूर्व नियोजनाची सर्व कामं पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन पावसाला तोंड देण्यास अपयशी ठरलं का?


पालिकेचा दावा फोल : बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पावसाळापूर्वी सर्व कामं झाल्याचा दावा केला होता. मात्र, रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पालिकेचा हा दावा फोल ठरल्याचं दिसून येतं आहे. पालिका प्रशासनानं मुंबईत ज्या सखल भागांमध्ये पाणी साचतं अशा ठिकाणी 481 उपसा पंप बसवण्यात आल्याचं जाहीर केलं होतं. सोबतच अंडरग्राउंड पाण्याच्या साठवण टाक्या बसवण्यात आल्याचं देखील पालिकेनं म्हटलं होतं. मात्र, सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाल्यानंतर पालिकेच्या दाव्याप्रमाणे पाण्याचा निचरा होताना दिसत नाही. सोबतच पालिकेनं करोडो रुपयांचा निधी खर्च करुन मुंबईतील नदी नाल्यातील गाळ उपसा केला. मात्र, पालिकेचं हे काम देखील दरवर्षीप्रमाणे गाळातच गेल्याचं दिसून येतं आहे.

कामं केल्याचा रेल्वे प्रशासानचा दावा : रेल्वे प्रशासनाची स्थिती महानगरपालिकेपेक्षा काही वेगळी नाही. मध्य रेल्वेनं मुसळधार पावसानं बाधित होणारी 24 रेल्वे स्थानकं निश्चित करुन विविध ठिकाणी 100HP क्षमतेचे 192 पंप बसवण्यात आल्याचं म्हटलं होतं. सोबतच, उपनगरीय विभागातील 119.82 किमी नाल्यांचे गाळ काढणे आणि साफसफाई तसंच कुर्ला-ट्रॉम्बे, चुनाभट्टी, वडाळा रोड, विद्याविहार, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि टिळक नगर इथं सर्व 156 कल्व्हर्ट स्वच्छ केले गेले आहेत आणि काही आरसीसी बॉक्सनं वाढवले आहेत. पावसाळ्यात सुरक्षित परिचालनासाठी ईएमयूचे सर्व 157 रेक सील केले. ओव्हर हेड वायर जवळील 6 हजारहून अधिक झाडांच्या फांद्या छाटल्या. 16 हजार इन्सुलेटर साफ आणि अर्थिंग, बाँडिंग आणि लाइटनिंग अरेस्टर्स तपासले. इत्यादी काम केल्याचा दावा रेल्वे प्रशासनानं केला होता. मात्र, या पावसानं रेल्वेच्या कामांनाच आता लाल सिग्नल दिल्याचं दिसून येतं आहे.

2005 मध्ये झाली होती अतिवृष्टी : जुलै 2005 मध्ये मुंबईत अतिवृष्टीमुळं सर्वाधिक नुकसान झालं. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत 24 तासांत 900 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. इतकं पर्जन्यमान म्हणजे संपूर्ण जुलै महिन्यातला पाऊस 24 तासात झाल्याचं त्यावेळी तज्ञांनी म्हटलं होतं. त्यामुळं शहरातील रस्ते बंद झाले होते. बस, रेल्वे आणि विमानसेवा ठप्प झाली होती आणि संपूर्ण मुंबई शहर पाण्याखाली गेलं होतं. त्या महाप्रलयात बुडून 1094 जीव गेले, तर सुमारे 500 कोटी रुपयांचं नुकसान झालं. 2005 च्या महाप्रलयानंतर शासन आणि प्रशासन दोघांनाही जाग आली आणि तेव्हापासून मुंबईत सातत्यानं पावसाळापूर्व नियोजन सुरू झालं. मात्र 2005 ते 2024 मागील जवळपास 20 वर्षात दरवर्षी मुंबईत पाणी तुंबत असल्यानं प्रशासन नेमकं कोणत्या प्रकारचे नियोजन करतात? हा प्रश्न पडतो.

पावसामुळं लोकल सेवांवर परिणाम : यासंदर्भात आम्ही मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं, "मुसळधार पावसामुळं उपनगरीय सेवांवर परिणाम झाला आहे. सकाळी 6.30 वाजेपासून भांडूप ते नाहूर दरम्यान पाणी साचल्यानं मुख्य मार्गावरील जलद आणि धीम्या सेवा उशिरानं धावत होत्या. हार्बर मार्गावरील सेवा सुरळीत सुरू होती. 8.30 वाजता पावसाचा जोर वाढून आणखी पाणी साचल्यानं सीएसएमटी ते ठाणे दरम्यान मेन लाईन डाऊन आणि अप फास्ट मार्गावरील रेल्वे सेवा धिमी करण्यात आली होती. 9.30 वाजता चुनाभटी इथं पाणी साचल्यानं हार्बर मार्गावरील सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. तर, 10.30 वाजता सीएसएमटी ते ठाणे दरम्यान डाऊन आणि अप फास्ट मार्गावरील मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा मर्यादित वेगानं पूर्ववत करण्यात आली आहे. अशावेळी प्रवाशांनी देखील रेल्वेला सहकार्य करावं."


एनडीआरएफची 3 पथकं सज्ज : यासंदर्भात पालिका प्रशासनानं म्हटलं, "मुंबईत 481 पंप लावण्यात आले आहेत. हे पंप ज्या भागांमध्ये पाणी साचतं अशा भागांमध्ये कार्यान्वित आहेत. रविवारी रात्रीपासून पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं आणि भरतीचा वेळ असल्यानं या पाण्याचा निचरा करण्यास अधिक कालावधी लागत आहे. रविवारी वारा आणि मुसळधार पाऊस असल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पंपिंग स्टेशनवर पाण्याचा निचरा करण्यात देखील मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या. पावसाळ्यात मुंबईकरांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी पालिका पूर्णपणे सज्ज असून, आम्ही पावसाच्या पाण्याचा संथ गतीनं निचरा होणाऱ्या ठिकाणी भूमिगत जल-साठवण टाक्यांची उभारणी केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यासाठी एनडीआरएफची 3 पथकं सज्ज ठेवण्यात आली आहेत."

काय म्हणाल्या पेडणेकर : यासंदर्भात आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी बातचीत केली असता त्या म्हणाल्या,"मुंबईसाठी दोन स्थापत्य अध्यक्ष आहेत. एक शहरासाठी आणि एक उपनगरांसाठी. हे दोन्ही अध्यक्ष साधारण एप्रिलमध्ये पावसाळी पूर्व नियोजनाच्या कामाच्या दिशेनं टेंडर प्रक्रिया राबवतात. ही कामं जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असतं. मात्र, मागील दोन वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक नसल्यानं इथं अनागोंदी कारभार सुरू आहे. ज्यावेळी नगरसेवक बॉडी होती, त्यावेळी प्रत्येक पक्षाचा नगरसेवक हा आपापल्या प्रभागात नालेसफाईची कामं स्वतः लक्ष देऊन करुन घेत होता. मात्र, आता तसं काहीही होताना दिसत नाही. मुख्यमंत्री पालिकेत जातात. ग्रीन कार्पेट वरुन कामांची पाहणी करतात. त्यावेळेस फक्त पालिकेची मशिनरी दिसते. नंतर ती गायब होते. मुंबईत काहीही झालं तरी त्याला उत्तर देण्याची जबाबदारी दोन वर्षांपूर्वी पालिकेच्या सभागृहाची होती. मात्र, दोन वर्षांपासून पालिकेत नगरसेवकच नसल्यानं आज मुंबई बुडण्याच्या स्थितीवर आहे. याची जबाबदारी महानगरपालिकेचे आयुक्त घेणार का?" असा सवाल देखील किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा :

  1. मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा, रायगडावर अडकलेल्या शेकडो पर्यटकांची सुटका - Maharashtra Rain Updates
  2. सिंधुदुर्गसह रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर - Ratnagiri Weather Forecast

मुंबई Mumbai Heavy Rain : मुसळधार पावसानं देशाची आर्थिक राजधानी मुंबई दरवर्षी प्रमाणे पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. मुंबईत मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं मुंबईकरांचा मुख्य आधार असलेली उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता. त्यामुळं अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. अशा परिस्थितीत अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी लोकल सेवा धीम्या गतीनं सुरू आहे. जी परिस्थिती रेल्वे रुळांवर आहे, तीच परिस्थिती मुंबईतील भुयारी मार्ग आणि रस्त्यांवर देखील आहे. त्यामुळं गाड्यांच्या देखील लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जायला उशीर होऊ नये यासाठी मुंबईकर धडपडताना दिसत आहेत. मात्र, अशावेळी प्रश्न पडतो, तो मे महिना अखेरपर्यंत पावसाळी पूर्व नियोजनाची सर्व कामं पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन पावसाला तोंड देण्यास अपयशी ठरलं का?


पालिकेचा दावा फोल : बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पावसाळापूर्वी सर्व कामं झाल्याचा दावा केला होता. मात्र, रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पालिकेचा हा दावा फोल ठरल्याचं दिसून येतं आहे. पालिका प्रशासनानं मुंबईत ज्या सखल भागांमध्ये पाणी साचतं अशा ठिकाणी 481 उपसा पंप बसवण्यात आल्याचं जाहीर केलं होतं. सोबतच अंडरग्राउंड पाण्याच्या साठवण टाक्या बसवण्यात आल्याचं देखील पालिकेनं म्हटलं होतं. मात्र, सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाल्यानंतर पालिकेच्या दाव्याप्रमाणे पाण्याचा निचरा होताना दिसत नाही. सोबतच पालिकेनं करोडो रुपयांचा निधी खर्च करुन मुंबईतील नदी नाल्यातील गाळ उपसा केला. मात्र, पालिकेचं हे काम देखील दरवर्षीप्रमाणे गाळातच गेल्याचं दिसून येतं आहे.

कामं केल्याचा रेल्वे प्रशासानचा दावा : रेल्वे प्रशासनाची स्थिती महानगरपालिकेपेक्षा काही वेगळी नाही. मध्य रेल्वेनं मुसळधार पावसानं बाधित होणारी 24 रेल्वे स्थानकं निश्चित करुन विविध ठिकाणी 100HP क्षमतेचे 192 पंप बसवण्यात आल्याचं म्हटलं होतं. सोबतच, उपनगरीय विभागातील 119.82 किमी नाल्यांचे गाळ काढणे आणि साफसफाई तसंच कुर्ला-ट्रॉम्बे, चुनाभट्टी, वडाळा रोड, विद्याविहार, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि टिळक नगर इथं सर्व 156 कल्व्हर्ट स्वच्छ केले गेले आहेत आणि काही आरसीसी बॉक्सनं वाढवले आहेत. पावसाळ्यात सुरक्षित परिचालनासाठी ईएमयूचे सर्व 157 रेक सील केले. ओव्हर हेड वायर जवळील 6 हजारहून अधिक झाडांच्या फांद्या छाटल्या. 16 हजार इन्सुलेटर साफ आणि अर्थिंग, बाँडिंग आणि लाइटनिंग अरेस्टर्स तपासले. इत्यादी काम केल्याचा दावा रेल्वे प्रशासनानं केला होता. मात्र, या पावसानं रेल्वेच्या कामांनाच आता लाल सिग्नल दिल्याचं दिसून येतं आहे.

2005 मध्ये झाली होती अतिवृष्टी : जुलै 2005 मध्ये मुंबईत अतिवृष्टीमुळं सर्वाधिक नुकसान झालं. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत 24 तासांत 900 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. इतकं पर्जन्यमान म्हणजे संपूर्ण जुलै महिन्यातला पाऊस 24 तासात झाल्याचं त्यावेळी तज्ञांनी म्हटलं होतं. त्यामुळं शहरातील रस्ते बंद झाले होते. बस, रेल्वे आणि विमानसेवा ठप्प झाली होती आणि संपूर्ण मुंबई शहर पाण्याखाली गेलं होतं. त्या महाप्रलयात बुडून 1094 जीव गेले, तर सुमारे 500 कोटी रुपयांचं नुकसान झालं. 2005 च्या महाप्रलयानंतर शासन आणि प्रशासन दोघांनाही जाग आली आणि तेव्हापासून मुंबईत सातत्यानं पावसाळापूर्व नियोजन सुरू झालं. मात्र 2005 ते 2024 मागील जवळपास 20 वर्षात दरवर्षी मुंबईत पाणी तुंबत असल्यानं प्रशासन नेमकं कोणत्या प्रकारचे नियोजन करतात? हा प्रश्न पडतो.

पावसामुळं लोकल सेवांवर परिणाम : यासंदर्भात आम्ही मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं, "मुसळधार पावसामुळं उपनगरीय सेवांवर परिणाम झाला आहे. सकाळी 6.30 वाजेपासून भांडूप ते नाहूर दरम्यान पाणी साचल्यानं मुख्य मार्गावरील जलद आणि धीम्या सेवा उशिरानं धावत होत्या. हार्बर मार्गावरील सेवा सुरळीत सुरू होती. 8.30 वाजता पावसाचा जोर वाढून आणखी पाणी साचल्यानं सीएसएमटी ते ठाणे दरम्यान मेन लाईन डाऊन आणि अप फास्ट मार्गावरील रेल्वे सेवा धिमी करण्यात आली होती. 9.30 वाजता चुनाभटी इथं पाणी साचल्यानं हार्बर मार्गावरील सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. तर, 10.30 वाजता सीएसएमटी ते ठाणे दरम्यान डाऊन आणि अप फास्ट मार्गावरील मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा मर्यादित वेगानं पूर्ववत करण्यात आली आहे. अशावेळी प्रवाशांनी देखील रेल्वेला सहकार्य करावं."


एनडीआरएफची 3 पथकं सज्ज : यासंदर्भात पालिका प्रशासनानं म्हटलं, "मुंबईत 481 पंप लावण्यात आले आहेत. हे पंप ज्या भागांमध्ये पाणी साचतं अशा भागांमध्ये कार्यान्वित आहेत. रविवारी रात्रीपासून पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं आणि भरतीचा वेळ असल्यानं या पाण्याचा निचरा करण्यास अधिक कालावधी लागत आहे. रविवारी वारा आणि मुसळधार पाऊस असल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पंपिंग स्टेशनवर पाण्याचा निचरा करण्यात देखील मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या. पावसाळ्यात मुंबईकरांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी पालिका पूर्णपणे सज्ज असून, आम्ही पावसाच्या पाण्याचा संथ गतीनं निचरा होणाऱ्या ठिकाणी भूमिगत जल-साठवण टाक्यांची उभारणी केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यासाठी एनडीआरएफची 3 पथकं सज्ज ठेवण्यात आली आहेत."

काय म्हणाल्या पेडणेकर : यासंदर्भात आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी बातचीत केली असता त्या म्हणाल्या,"मुंबईसाठी दोन स्थापत्य अध्यक्ष आहेत. एक शहरासाठी आणि एक उपनगरांसाठी. हे दोन्ही अध्यक्ष साधारण एप्रिलमध्ये पावसाळी पूर्व नियोजनाच्या कामाच्या दिशेनं टेंडर प्रक्रिया राबवतात. ही कामं जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असतं. मात्र, मागील दोन वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक नसल्यानं इथं अनागोंदी कारभार सुरू आहे. ज्यावेळी नगरसेवक बॉडी होती, त्यावेळी प्रत्येक पक्षाचा नगरसेवक हा आपापल्या प्रभागात नालेसफाईची कामं स्वतः लक्ष देऊन करुन घेत होता. मात्र, आता तसं काहीही होताना दिसत नाही. मुख्यमंत्री पालिकेत जातात. ग्रीन कार्पेट वरुन कामांची पाहणी करतात. त्यावेळेस फक्त पालिकेची मशिनरी दिसते. नंतर ती गायब होते. मुंबईत काहीही झालं तरी त्याला उत्तर देण्याची जबाबदारी दोन वर्षांपूर्वी पालिकेच्या सभागृहाची होती. मात्र, दोन वर्षांपासून पालिकेत नगरसेवकच नसल्यानं आज मुंबई बुडण्याच्या स्थितीवर आहे. याची जबाबदारी महानगरपालिकेचे आयुक्त घेणार का?" असा सवाल देखील किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा :

  1. मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा, रायगडावर अडकलेल्या शेकडो पर्यटकांची सुटका - Maharashtra Rain Updates
  2. सिंधुदुर्गसह रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर - Ratnagiri Weather Forecast
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.