ETV Bharat / state

राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी "एक अनार, सौ बिमार" अशी अवस्था - Vidhansabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 6:33 PM IST

Vidhansabha Election 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अजूनही आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, मुख्यमंत्री पदावर दावे केले जात आहेत. महायुतीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. तर महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची नावं चर्चेत आहेत.

Vidhansabha Election 2024
मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असणारे चेहरे (Source - Etv Bharat)

मुंबई Vidhansabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? यावर सर्वच पक्षातील नेते आपापली प्रतिक्रिया देत आहेत. महायुतीत अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीनंतर ठरवला जाईल, असं सांगितल्यानं आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की नाही? याबाबतही शंका निर्माण झालीय.

काँग्रेसकडून अनेक चेहरे शर्यतीत परंतु निर्णय हायकमांड घेणार : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचं लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागलेलं असताना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून अद्याप संभ्रम कायम आहे. आपल्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, असं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळालं. काँग्रेस पक्ष 13 खासदारांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्यानं मुख्यमंत्री आपल्याचं पक्षाचा होणार असा काँग्रेसकडून दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे. ज्या पक्षाचे आमदार असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असा फॉर्म्युला साधारणपणे ठरवला जातो. पण हा फॉर्म्युला धोकादायक असल्याचं उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच म्हटलं आहे. मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे निवडणाऱ्या नावाला माझा पूर्ण पाठिंबा असेल, असं सांगून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसलाही चक्रावून टाकलंय. महाविकास आघाडीकडं सध्या उद्धव ठाकरे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून मुख्यमंत्री पदासाठी चेहरा आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसला पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. मात्र हा निर्णय संपूर्णपणे दिल्ली हायकमांड घेईल. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

भाजपाकडून देवेंद्र फडवणीस हेच मुख्यमंत्री : महायुतीत सर्वात मोठा पक्ष भाजपा असल्यानं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपा नेते ठाम आहेत. राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार बनवताना स्वतःच्या पक्षाचे जास्त आमदार असतानाही मुख्यमंत्री पदाची माळ भाजपनं एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात टाकली. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. महायुतीत विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्मुला अद्याप ठरला नाही आहे. परंतु, ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत असून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडवणीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केलं गेलं आहे. भाजपाचे नेते तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी राज्यातील सरकारी योजना पुढे सुरू ठेवायच्या असतील तर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करा, असं उघडपणे म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत : मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीबाबत बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले की, "उद्धव ठाकरे हे स्वत: मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत. परंतु त्यांनी काँग्रेस आणि शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करा, माझा पूर्ण पाठिंबा आहे, असं म्हणणं म्हणजे एक प्रकारे आपलं नाव पुढे करण्याचा प्रकार आहे. मात्र, शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पवारांसाठी 2024ची विधानसभा निवडणूक ही शेवटची निवडणूक असणार आहे. शरद पवारांना आपल्या ताकदीची पूर्ण कल्पना आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बनवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे ते आपली कन्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी राजाच्या मुख्यमंत्री पदी विराजमान करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी ते आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीनसुद्धा करू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीचे 8 खासदार लोकसभेत पोहोचल्यानं काँग्रेसची खासदारांची संख्या 107 वर पोहोचू शकते. अशा पद्धतीची खेळी शरद पवार 1986ला सुद्धा खेळले होते. 55 आमदारांसह आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यानंतर दीड वर्षात ते स्वतः मुख्यमंत्री बनले होते."

एकनाथ शिंदेंच्या नावाला अजित पवारांचा विरोध : यंदाची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असले तरी, महायुतीत निवडणुकीनंतर सर्व आमदार एकत्र बसून मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नावाला अजित पवारांचा अप्रत्यक्ष विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील, असं ठाम मत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी व्यक्त केलं आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून तेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे जोरदार संकेत मिळत आहेत. यापूर्वी त्यांनी "मला मुख्यमंत्री बनायला आवडेल," असं त्यांनी विधान केलं होतं. या सर्व कारणांमुळे मुख्यमंत्री पदासाठी अनेक चेहरे चर्चेत असल्यानं महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो अनेक चेहरे चर्चेत आहेत. त्यांची अवस्था "एक अनार, सौ बिमार", अशी झाली आहे.

हेही वाचा

  1. राज्यसभा पोटनिवडणूक 2024; भाजपाकडून धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण ? - Rajya Sabha Bypoll Election 2024
  2. नेहरू घराण्याचं योगदान कोणीही पुसून टाकू शकत नाही-शरद पवार - Shard Pawar
  3. महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र, देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची घेतली भेट - Maharashtra politics
  4. "शिवसेनेनं राजीव गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली, पण..."उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - sadbhavana diwas 2024

मुंबई Vidhansabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? यावर सर्वच पक्षातील नेते आपापली प्रतिक्रिया देत आहेत. महायुतीत अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीनंतर ठरवला जाईल, असं सांगितल्यानं आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की नाही? याबाबतही शंका निर्माण झालीय.

काँग्रेसकडून अनेक चेहरे शर्यतीत परंतु निर्णय हायकमांड घेणार : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचं लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागलेलं असताना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून अद्याप संभ्रम कायम आहे. आपल्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, असं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळालं. काँग्रेस पक्ष 13 खासदारांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्यानं मुख्यमंत्री आपल्याचं पक्षाचा होणार असा काँग्रेसकडून दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे. ज्या पक्षाचे आमदार असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असा फॉर्म्युला साधारणपणे ठरवला जातो. पण हा फॉर्म्युला धोकादायक असल्याचं उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच म्हटलं आहे. मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे निवडणाऱ्या नावाला माझा पूर्ण पाठिंबा असेल, असं सांगून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसलाही चक्रावून टाकलंय. महाविकास आघाडीकडं सध्या उद्धव ठाकरे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून मुख्यमंत्री पदासाठी चेहरा आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसला पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. मात्र हा निर्णय संपूर्णपणे दिल्ली हायकमांड घेईल. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

भाजपाकडून देवेंद्र फडवणीस हेच मुख्यमंत्री : महायुतीत सर्वात मोठा पक्ष भाजपा असल्यानं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपा नेते ठाम आहेत. राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार बनवताना स्वतःच्या पक्षाचे जास्त आमदार असतानाही मुख्यमंत्री पदाची माळ भाजपनं एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात टाकली. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. महायुतीत विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्मुला अद्याप ठरला नाही आहे. परंतु, ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत असून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडवणीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केलं गेलं आहे. भाजपाचे नेते तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी राज्यातील सरकारी योजना पुढे सुरू ठेवायच्या असतील तर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करा, असं उघडपणे म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत : मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीबाबत बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले की, "उद्धव ठाकरे हे स्वत: मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत. परंतु त्यांनी काँग्रेस आणि शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करा, माझा पूर्ण पाठिंबा आहे, असं म्हणणं म्हणजे एक प्रकारे आपलं नाव पुढे करण्याचा प्रकार आहे. मात्र, शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पवारांसाठी 2024ची विधानसभा निवडणूक ही शेवटची निवडणूक असणार आहे. शरद पवारांना आपल्या ताकदीची पूर्ण कल्पना आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बनवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे ते आपली कन्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी राजाच्या मुख्यमंत्री पदी विराजमान करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी ते आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीनसुद्धा करू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीचे 8 खासदार लोकसभेत पोहोचल्यानं काँग्रेसची खासदारांची संख्या 107 वर पोहोचू शकते. अशा पद्धतीची खेळी शरद पवार 1986ला सुद्धा खेळले होते. 55 आमदारांसह आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यानंतर दीड वर्षात ते स्वतः मुख्यमंत्री बनले होते."

एकनाथ शिंदेंच्या नावाला अजित पवारांचा विरोध : यंदाची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असले तरी, महायुतीत निवडणुकीनंतर सर्व आमदार एकत्र बसून मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नावाला अजित पवारांचा अप्रत्यक्ष विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील, असं ठाम मत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी व्यक्त केलं आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून तेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे जोरदार संकेत मिळत आहेत. यापूर्वी त्यांनी "मला मुख्यमंत्री बनायला आवडेल," असं त्यांनी विधान केलं होतं. या सर्व कारणांमुळे मुख्यमंत्री पदासाठी अनेक चेहरे चर्चेत असल्यानं महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो अनेक चेहरे चर्चेत आहेत. त्यांची अवस्था "एक अनार, सौ बिमार", अशी झाली आहे.

हेही वाचा

  1. राज्यसभा पोटनिवडणूक 2024; भाजपाकडून धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण ? - Rajya Sabha Bypoll Election 2024
  2. नेहरू घराण्याचं योगदान कोणीही पुसून टाकू शकत नाही-शरद पवार - Shard Pawar
  3. महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र, देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची घेतली भेट - Maharashtra politics
  4. "शिवसेनेनं राजीव गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली, पण..."उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - sadbhavana diwas 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.