ETV Bharat / state

वक्फ बोर्डाची लातूरच्या शेतकऱ्यांना नोटीस; एकनाथ शिंदे म्हणाले, "अन्याय होऊ देणार नाही" - WAQF BOARD NOTICE CASE

वक्फ बोर्डानं जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, असा दावा लातूर जिल्ह्यातील 100 हून अधिक शेतकऱ्यांनी शनिवारी केला. यावर राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

WAQF BOARD NOTICE CASE
चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे, नाना पटोले (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2024, 6:09 PM IST

Updated : Dec 8, 2024, 6:28 PM IST

मुंबई/लातूर : वक्फ बोर्ड आणि लातूर जिल्ह्यातील शेतकरी यांच्यातला जमिनींचा संघर्ष पुन्हा एकदा समोर आलाय. लातूर जिल्ह्यातील 100 हून अधिक शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस पाठवल्या आहेत. जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केला आहे. वक्फ बोर्ड आपल्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अन्याय होऊ देणार नाही : विधानसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लातूरमधील शेतकऱ्यांना महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून आलेल्या नोटीसांबाबत भाष्य केलं. एकनाथ शिंदे म्हणाले, "हे सामान्य लोकांचं सरकार आहे. त्यामुळं या प्रकरणात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही."

कारवाई करू शकत नाही : "वक्फ बोर्डानं शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीस प्रकरणाबाबत आपल्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. नोटीस पाठवण्यात आलेली जमीन शेतकऱ्यांची जमीन असेल व ते तिथे शेती करत असतील. सातबारा शेतकऱ्यांच्या नावावर असेल तर वक्फ बोर्ड अशी कार्यवाही करु शकत नाही," असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

चौकशी करण्याची विनंती : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणावर म्हणाले, "वक्फ बोर्डानं अनेकांची मालमत्ता, हिंदू देवी-देवतांचे मंदिर, हिंदू ट्रस्ट आणि शेतकऱ्यांच्या जमिनींवर बळजबरीनं अतिक्रमण करुन या जागा आपल्या नावावर करुन घेतल्या. या सर्व मालमत्तेचं डिजिटायझेशन झालं पाहिजे. मी केंद्र आणि राज्य सरकारला या प्रकरणाची काटेकोरपणे चौकशी करण्याची विनंती करतो."

सरकारनं न्याय द्यावा : "या जमिनी पिढ्यानपिढ्या आमच्याकडं आहेत. ही वक्फची मालमत्ता नाही. महाराष्ट्र सरकारनं आम्हाला न्याय द्यावा, अशी आमची इच्छा आहे. या प्रकणावर न्यायालयात दोनदा सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे," असं तुकाराम कानवटे या शेतकऱ्यानं 'पीटीआय'शी बोलताना सांगितलं.

नेमकं प्रकरण काय? : लातूर जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केला आहे. इस्लामिक कायद्यानुसार वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा वापर केवळ धार्मिक आणि धर्मादाय कामांसाठी केला जाऊ शकतो. त्यापैकी लातूरच्या 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस पाठवली आहे, असा दावा तेथील शेतकऱयांनी केला. या जमिनीच्या वादात सरकारनं हस्तक्षेप करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य वक्फ प्राधिकरणाकडे सुनावणीसाठी गेलं आहे. या प्रकरणामुळं तळेगाव, अहमदपूर, लातूर येथील शेतकरी सध्या चिंतेत आहेत.

हेही वाचा

  1. थोर महापुरूष, देव- देवता, संत-महंतांचं स्मरण करत १०६ सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ
  2. "तुम्हाला जी मतं मिळाली ती...", आदित्य ठाकरेंच्या आरोपावर रईस शेख यांचं प्रत्युत्तर
  3. लोकसभेच्या मतांची आकडेवारी सांगत एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर पलटवार; म्हणाले, "जिथं जिंकता तिथं ईव्हीएम..."

मुंबई/लातूर : वक्फ बोर्ड आणि लातूर जिल्ह्यातील शेतकरी यांच्यातला जमिनींचा संघर्ष पुन्हा एकदा समोर आलाय. लातूर जिल्ह्यातील 100 हून अधिक शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस पाठवल्या आहेत. जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केला आहे. वक्फ बोर्ड आपल्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अन्याय होऊ देणार नाही : विधानसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लातूरमधील शेतकऱ्यांना महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून आलेल्या नोटीसांबाबत भाष्य केलं. एकनाथ शिंदे म्हणाले, "हे सामान्य लोकांचं सरकार आहे. त्यामुळं या प्रकरणात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही."

कारवाई करू शकत नाही : "वक्फ बोर्डानं शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीस प्रकरणाबाबत आपल्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. नोटीस पाठवण्यात आलेली जमीन शेतकऱ्यांची जमीन असेल व ते तिथे शेती करत असतील. सातबारा शेतकऱ्यांच्या नावावर असेल तर वक्फ बोर्ड अशी कार्यवाही करु शकत नाही," असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

चौकशी करण्याची विनंती : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणावर म्हणाले, "वक्फ बोर्डानं अनेकांची मालमत्ता, हिंदू देवी-देवतांचे मंदिर, हिंदू ट्रस्ट आणि शेतकऱ्यांच्या जमिनींवर बळजबरीनं अतिक्रमण करुन या जागा आपल्या नावावर करुन घेतल्या. या सर्व मालमत्तेचं डिजिटायझेशन झालं पाहिजे. मी केंद्र आणि राज्य सरकारला या प्रकरणाची काटेकोरपणे चौकशी करण्याची विनंती करतो."

सरकारनं न्याय द्यावा : "या जमिनी पिढ्यानपिढ्या आमच्याकडं आहेत. ही वक्फची मालमत्ता नाही. महाराष्ट्र सरकारनं आम्हाला न्याय द्यावा, अशी आमची इच्छा आहे. या प्रकणावर न्यायालयात दोनदा सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे," असं तुकाराम कानवटे या शेतकऱ्यानं 'पीटीआय'शी बोलताना सांगितलं.

नेमकं प्रकरण काय? : लातूर जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केला आहे. इस्लामिक कायद्यानुसार वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा वापर केवळ धार्मिक आणि धर्मादाय कामांसाठी केला जाऊ शकतो. त्यापैकी लातूरच्या 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस पाठवली आहे, असा दावा तेथील शेतकऱयांनी केला. या जमिनीच्या वादात सरकारनं हस्तक्षेप करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य वक्फ प्राधिकरणाकडे सुनावणीसाठी गेलं आहे. या प्रकरणामुळं तळेगाव, अहमदपूर, लातूर येथील शेतकरी सध्या चिंतेत आहेत.

हेही वाचा

  1. थोर महापुरूष, देव- देवता, संत-महंतांचं स्मरण करत १०६ सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ
  2. "तुम्हाला जी मतं मिळाली ती...", आदित्य ठाकरेंच्या आरोपावर रईस शेख यांचं प्रत्युत्तर
  3. लोकसभेच्या मतांची आकडेवारी सांगत एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर पलटवार; म्हणाले, "जिथं जिंकता तिथं ईव्हीएम..."
Last Updated : Dec 8, 2024, 6:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.