ETV Bharat / state

जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी धनंजय जाधव यांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमका हल्ला कसा झाला? - Jitendra Awhad Car Attack

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 10:29 PM IST

Jitendra Awhad Car Attack : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आज (1 ऑगस्ट) मुंबईतील पूर्व मुक्त महामार्गावरून प्रवास करीत असताना त्यांच्या कारवर तीन ते चार जणांच्या टोळक्यानं हल्ला केला. स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.

Jitendra Awhad Car Attack
जितेंद्र आव्हाड यांच्या कारवर हल्ला (ETV Bharat Reporter)

मुंबई Jitendra Awhad Car Attack : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर आज (1 ऑगस्ट) तीन ते चार जणांनी मुंबईतील पूर्व मुक्त महामार्गाजवळ हल्ला केला. याप्रकरणी तक्रारदार नितीन देशमुख यांनी केलेल्या तक्रारीवरून डोंगरी पोलिसांनी अंकुश कदम आणि धनंजय जाधव या दोघा विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 109, 126(2), 189(1), 189(2), 189(4), 61(2)(अ ), 190, 191(1) आणि 191 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काचा फोडून आव्हाडांवर हल्ला : तक्रारदार नितीन देशमुख यांनी नोंदवलेल्या जबाबानुसार, एक्स अकाउंटवर जितेंद्र आव्हाडांच्या वाहनावर हल्ला केल्याचा व्हिडिओ पाहिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय महासचिव आणि आमदार जितेंद्र आव्हाड मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर सहा व्यक्तीवर चाल करून गेले. यानंतर आव्हाडांची गाडी अडवली. गाडीवर दगडफेक करून दांड्याने गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. ते जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करत असल्याचं त्या व्हिडिओत दिसत होते. व्हिडिओ बारकाईने पाहिला असता स्वराज्य संघटना या पक्षाचा पदाधिकारी अंकुश कदम हा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींना हातवारे करून चिथावणी देत असल्याचं दिसत आहे.

'या' कारणानं आव्हाड बचावले : कोल्हापूरच्या विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. याचा राग डोक्यात धरून स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या वाहनाला लक्ष्य केलाचा आरोप केला जात आहे. आमदार आव्हाड हे मुंबईतील कामकाज आटोपून ठाणे येथील घरी परतत होते. त्यांची गाडी पूर्व मुक्त महामार्गाजवळ वाहतूक कोंडीत अडकली असताना दुसऱ्या कारमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी त्याच्या गाडीवर हल्ला केला. हल्ल्यानंतर आव्हाडांची कार वेगाने पुढे गेल्यानं ते बचावले. विशेष म्हणजे, त्यांच्या कारच्या मागे पोलिसांची गाडी होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक डोंगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही : हल्ल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “तीन जणांनी आज माझ्या गाडीवर हल्ला केला. आमच्यासोबत चार पोलीस होते. पण, मी त्या तरुणांवर कोणताही हल्ला करण्यास सांगितले नाही. मी अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही. मी विशाळगडाबाबत बोललो. कारण छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा जो वारसा दिला आहे, तो संभाजीराजेंनी पुढे न्यायला पाहिजे होता. पण त्यांनी केवळ बोलघेवडेपणा केला. माझ्या गाडीवर हल्ला करून मी शांत बसेन, असं तुम्हाला वाटत असेल. पण तसं होणार नाही. मी आणखी त्वेषानं तुमच्या विरोधात बोलणार आहे."

धनंजय जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात- आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांना पुणे क्राईम ब्रॅंचनं ताब्यात घेतलं आहे. संभाजीराजे यांच्यावर केलेली टीका स्वराज्यचा मावळा सहन करणार नाही. स्वराज्य पक्ष पूर्ण ताकदीने हल्ला करणाऱ्या आमच्या पक्षाच्या बांधवांच्या पाठिशी उभी आहे, असं धनंजय जाधव यांनी सांगितलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केल्या प्रकरणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा :

  1. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेचा हल्ला... - Jitendra Awhad
  2. “आव्हानाची भाषा करण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो”, उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेला मुख्यमंत्र्यांचा पलटवार - CM Shinde On Uddhav Thackeray
  3. गाडीवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले, "मी मेलो तरी..." - Jitendra Awhad Car Attack

मुंबई Jitendra Awhad Car Attack : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर आज (1 ऑगस्ट) तीन ते चार जणांनी मुंबईतील पूर्व मुक्त महामार्गाजवळ हल्ला केला. याप्रकरणी तक्रारदार नितीन देशमुख यांनी केलेल्या तक्रारीवरून डोंगरी पोलिसांनी अंकुश कदम आणि धनंजय जाधव या दोघा विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 109, 126(2), 189(1), 189(2), 189(4), 61(2)(अ ), 190, 191(1) आणि 191 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काचा फोडून आव्हाडांवर हल्ला : तक्रारदार नितीन देशमुख यांनी नोंदवलेल्या जबाबानुसार, एक्स अकाउंटवर जितेंद्र आव्हाडांच्या वाहनावर हल्ला केल्याचा व्हिडिओ पाहिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय महासचिव आणि आमदार जितेंद्र आव्हाड मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर सहा व्यक्तीवर चाल करून गेले. यानंतर आव्हाडांची गाडी अडवली. गाडीवर दगडफेक करून दांड्याने गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. ते जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करत असल्याचं त्या व्हिडिओत दिसत होते. व्हिडिओ बारकाईने पाहिला असता स्वराज्य संघटना या पक्षाचा पदाधिकारी अंकुश कदम हा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींना हातवारे करून चिथावणी देत असल्याचं दिसत आहे.

'या' कारणानं आव्हाड बचावले : कोल्हापूरच्या विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. याचा राग डोक्यात धरून स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या वाहनाला लक्ष्य केलाचा आरोप केला जात आहे. आमदार आव्हाड हे मुंबईतील कामकाज आटोपून ठाणे येथील घरी परतत होते. त्यांची गाडी पूर्व मुक्त महामार्गाजवळ वाहतूक कोंडीत अडकली असताना दुसऱ्या कारमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी त्याच्या गाडीवर हल्ला केला. हल्ल्यानंतर आव्हाडांची कार वेगाने पुढे गेल्यानं ते बचावले. विशेष म्हणजे, त्यांच्या कारच्या मागे पोलिसांची गाडी होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक डोंगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही : हल्ल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “तीन जणांनी आज माझ्या गाडीवर हल्ला केला. आमच्यासोबत चार पोलीस होते. पण, मी त्या तरुणांवर कोणताही हल्ला करण्यास सांगितले नाही. मी अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही. मी विशाळगडाबाबत बोललो. कारण छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा जो वारसा दिला आहे, तो संभाजीराजेंनी पुढे न्यायला पाहिजे होता. पण त्यांनी केवळ बोलघेवडेपणा केला. माझ्या गाडीवर हल्ला करून मी शांत बसेन, असं तुम्हाला वाटत असेल. पण तसं होणार नाही. मी आणखी त्वेषानं तुमच्या विरोधात बोलणार आहे."

धनंजय जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात- आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांना पुणे क्राईम ब्रॅंचनं ताब्यात घेतलं आहे. संभाजीराजे यांच्यावर केलेली टीका स्वराज्यचा मावळा सहन करणार नाही. स्वराज्य पक्ष पूर्ण ताकदीने हल्ला करणाऱ्या आमच्या पक्षाच्या बांधवांच्या पाठिशी उभी आहे, असं धनंजय जाधव यांनी सांगितलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केल्या प्रकरणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा :

  1. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेचा हल्ला... - Jitendra Awhad
  2. “आव्हानाची भाषा करण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो”, उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेला मुख्यमंत्र्यांचा पलटवार - CM Shinde On Uddhav Thackeray
  3. गाडीवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले, "मी मेलो तरी..." - Jitendra Awhad Car Attack
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.