ETV Bharat / state

शरद पवारांचा सुजय विखेंवर घणाघात, संस्था बंद पाडण्याचा केला आरोप - Sharad Pawar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 9:09 PM IST

Sharad Pawar : सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक संस्था बंद पाडण्याचं काम केलं, असा आरोप शरद पवार यांनी आज (25 एप्रिल) राहुरी येथे घेण्यात आलेल्या सभेत केला आहे. या सभेत उमेदवार निलेश लंके, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विखेच्या कुटील राजकीय डावांचा उल्लेख केला.

Sharad Pawar
सुजय विखे पाटील
शरद पवार सुजय विखे पाटलांवर टीका करताना

अहमदनगर (राहुरी) Sharad Pawar : निळवंडे धरणाचे पाणी आम्ही दिले म्हणून श्रेय घेणाऱ्या विखेंच्या वडिलांनी धरणाला विरोध केला होता, अशी टीका करत सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक संस्था बंद पाडण्याचं काम केलं, असा आरोप शरद पवार यांनी आज (25 एप्रिल) राहुरी येथे आयोजित सभेत केला आहे.

विखेंचं हेच धोरण : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची आज राहुरीमध्ये सभा पार पडलीय. या सभेत उमेदवार निलेश लंके, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विखेच्या कुटील राजकीय डावांचा उल्लेख करत विखेंनी जिल्ह्यातील अनेक संस्था बंद पाडण्याचं काम केल्याचा उल्लेख केलाय. तोच धागा पकडत शरद पवार यांनीही विखे पिता, पुत्र यांची या जिल्ह्यात पन्नास वर्षांपासून सत्ता असल्याचा उल्लेख केला; मात्र यांनी विकास काय केला अण्णासाहेब शिंदे, धनंजय गाडगीळ आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला; परंतु सातत्यानं विखेंच्या पुढच्या पिढीने त्या कारखान्याची काय अवस्था केली आहे. एकेकाळी प्रसाद तनपुरेंनी सुस्थितीत चालविलेला राहुरी कारखानाही विखेंनी बंद पाडला. चांगल्या संस्था चालू द्यायच्या नाही हेच विखेंचं धोरण राहीलं, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे.

पवारांनी मांडला विखे कुटुंबीयांचा इतिहास : अहमदनगर जिल्ह्यातील नेते ही पन्नास वर्षे सेवा केली म्हणतात. प्रवरा कारखान्याचं वाटोळं केलं आहे. सत्तेची मस्ती इतकी की वडीलधाऱ्या लोकांना सन्मान देत नसल्याची टीका सुजय विखेंच नाव न घेता पवारांनी केली आहे. निळवंडे धरणाचं काम आम्ही सुरू केलं. धरणाबाबत एक परिषद झाली. त्यात दत्ता देशमुख यांनी धरण का व्हावं ही बाजू मांडली; मात्र त्यावेळी यांच्या वाड-वडीलांनी (बाळासाहेब विखे) धरणाला विरोध केला होता. ते होऊ नये म्हणून प्रयत्न केले होते. हा या कुटुंबाचा इतिहास आहे, असंही शरद पवारांनी म्हटलयं.

हेही वाचा :

  1. आता लगबग मतदानाची: यंत्रणा लागली कामाला; कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप, उद्या होणार मतदान - Lok Sabha Election 2024
  2. ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; जनतेला काय-काय दिलं आश्वासनं? - Thackeray Group Manifesto
  3. उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांचा छगन भुजबळांना आला होता फोन; पण.... - Lok Sabha election 2024

शरद पवार सुजय विखे पाटलांवर टीका करताना

अहमदनगर (राहुरी) Sharad Pawar : निळवंडे धरणाचे पाणी आम्ही दिले म्हणून श्रेय घेणाऱ्या विखेंच्या वडिलांनी धरणाला विरोध केला होता, अशी टीका करत सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक संस्था बंद पाडण्याचं काम केलं, असा आरोप शरद पवार यांनी आज (25 एप्रिल) राहुरी येथे आयोजित सभेत केला आहे.

विखेंचं हेच धोरण : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची आज राहुरीमध्ये सभा पार पडलीय. या सभेत उमेदवार निलेश लंके, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विखेच्या कुटील राजकीय डावांचा उल्लेख करत विखेंनी जिल्ह्यातील अनेक संस्था बंद पाडण्याचं काम केल्याचा उल्लेख केलाय. तोच धागा पकडत शरद पवार यांनीही विखे पिता, पुत्र यांची या जिल्ह्यात पन्नास वर्षांपासून सत्ता असल्याचा उल्लेख केला; मात्र यांनी विकास काय केला अण्णासाहेब शिंदे, धनंजय गाडगीळ आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला; परंतु सातत्यानं विखेंच्या पुढच्या पिढीने त्या कारखान्याची काय अवस्था केली आहे. एकेकाळी प्रसाद तनपुरेंनी सुस्थितीत चालविलेला राहुरी कारखानाही विखेंनी बंद पाडला. चांगल्या संस्था चालू द्यायच्या नाही हेच विखेंचं धोरण राहीलं, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे.

पवारांनी मांडला विखे कुटुंबीयांचा इतिहास : अहमदनगर जिल्ह्यातील नेते ही पन्नास वर्षे सेवा केली म्हणतात. प्रवरा कारखान्याचं वाटोळं केलं आहे. सत्तेची मस्ती इतकी की वडीलधाऱ्या लोकांना सन्मान देत नसल्याची टीका सुजय विखेंच नाव न घेता पवारांनी केली आहे. निळवंडे धरणाचं काम आम्ही सुरू केलं. धरणाबाबत एक परिषद झाली. त्यात दत्ता देशमुख यांनी धरण का व्हावं ही बाजू मांडली; मात्र त्यावेळी यांच्या वाड-वडीलांनी (बाळासाहेब विखे) धरणाला विरोध केला होता. ते होऊ नये म्हणून प्रयत्न केले होते. हा या कुटुंबाचा इतिहास आहे, असंही शरद पवारांनी म्हटलयं.

हेही वाचा :

  1. आता लगबग मतदानाची: यंत्रणा लागली कामाला; कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप, उद्या होणार मतदान - Lok Sabha Election 2024
  2. ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; जनतेला काय-काय दिलं आश्वासनं? - Thackeray Group Manifesto
  3. उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांचा छगन भुजबळांना आला होता फोन; पण.... - Lok Sabha election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.