ETV Bharat / state

ठाणे ते बोरिवली अंतर करता येणार वीस मिनिटात पार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांखालून भुयारी मार्गाच्या बांधकामास परवानगी - Thane to Borivali

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांखालून भुयारी मार्गाच्या बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं ठाणे ते बोरिवली अंतर केवळ 20 मिनिटात पार करता येणार आहे. दोन भूमिगत बोगद्यांना मंजुरी दिल्यानं प्रवाशांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे.

Thane to Borivali
ठाणे ते बोरिवली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 10:56 PM IST

ठाणे : ठाणे ते बोरवली हे अंतर केवळ 23 किमी आहे. मात्र हे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना अनेक तासाचा प्रवास करवा लागत होता. घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेलमध्ये अभूतपूर्व वाहतूक कोंडीमुळं वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मात्र राष्ट्रीय वन्यजीव मंडळानं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत दोन भूमिगत बोगद्यांना मंजुरी दिल्यानं लवकरच सर्वांना दिलासा मिळणार आहे. आता हेच 23 किमीचं अंतर अवघ्या वीस मिनिटांत पार करता येणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे अध्यक्ष संजय मुखर्जी यांनी दिली.

वाहन चालकांना मिळणार दिलासा : ठाणे ते बोरवली प्रवास वाहन चालकांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरतोय आहे. मुंबई जिल्ह्याच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली तसंच ठाणे जिल्ह्याला भूमिगत मार्गानं जोडून आता हेच अंतर लवकर कापता येणार आहे. त्यासाठी 10.25 किमीचा बोगदा, 1.55 किमीचा मार्ग असा एकूण 13.05 मीटर व्यासासह सुमारे 12 किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा तयार करण्यात येणार आहे. सादर बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांसह आपात्कालीन मार्ग देखील बांधण्यात येणार आहेत. या बोगद्याच्या प्रत्येक 300 मिटर अंतरावर पादचारी क्रॉस पॅसेज, प्रत्येक दोन पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद करण्यात येणार आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पातील बांधकाम हे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चार टनल बोरिंग मशीनच्या मदतीनं करण्यात येणार आहे. सुमारे 12 किमी लांबीच्या प्रकल्पातील 4.43 किमी लांबीचा मार्ग हा ठाणे जिल्ह्यातून तर, 7.4 किमी लांबीचा मार्ग हा बोरिवलीमधून प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

काय- काय असणार वैशिष्टे : या प्रकल्पात अत्याधुनिक सुविधा बसवण्यात येणार आहे. सदर प्रकल्पातील बोगद्यांमध्ये अग्निशामक यंत्रे, पाण्याची नाली, स्मोक डिटेक्टर, एलईडी लाईटचे संकेत फलक देखील लावले आहेत. तसंच नैसर्गिक, यांत्रिक मार्गानं पुरेशी वायुविजन प्रणाली देखील उभारली जाणार आहे. त्यामुळं प्रणांचा बचाव होण्यास मदत होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 16 हजार 600 कोटी असून त्यामध्ये जमीन अधिग्रहणाच्या खर्चाचा देखील समावेश करण्यात आला आहे. एकूण 46.57 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी अधिग्रहन करावी लागणार आहे. त्यात 35.53 हेक्टर सरकारी वन्य जमीन जमीनीचा समावेश आहे. उर्वरित जमीन ही चितळसर, मानपाडा, माजीवडा मागाठणे, बोरीवडे, चेणे तसंच येऊर या गावात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे वाचलंत का :

  1. गॅंगस्टर लॉरेन्स बिन्सोईच्या संपर्कात असलेल्या गॅंगस्टरला पुण्यातून अटक, दोन देशी पिस्तुलासह मॅकझीन जप्त
  2. "काकांच्या मृत्यूची वाट बघताय", अजित पवारांवर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका
  3. विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघासाठी 'शुभ'मन दिन; साहेबांना विजयासाठी विक्रमी आव्हान

ठाणे : ठाणे ते बोरवली हे अंतर केवळ 23 किमी आहे. मात्र हे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना अनेक तासाचा प्रवास करवा लागत होता. घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेलमध्ये अभूतपूर्व वाहतूक कोंडीमुळं वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मात्र राष्ट्रीय वन्यजीव मंडळानं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत दोन भूमिगत बोगद्यांना मंजुरी दिल्यानं लवकरच सर्वांना दिलासा मिळणार आहे. आता हेच 23 किमीचं अंतर अवघ्या वीस मिनिटांत पार करता येणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे अध्यक्ष संजय मुखर्जी यांनी दिली.

वाहन चालकांना मिळणार दिलासा : ठाणे ते बोरवली प्रवास वाहन चालकांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरतोय आहे. मुंबई जिल्ह्याच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली तसंच ठाणे जिल्ह्याला भूमिगत मार्गानं जोडून आता हेच अंतर लवकर कापता येणार आहे. त्यासाठी 10.25 किमीचा बोगदा, 1.55 किमीचा मार्ग असा एकूण 13.05 मीटर व्यासासह सुमारे 12 किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा तयार करण्यात येणार आहे. सादर बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांसह आपात्कालीन मार्ग देखील बांधण्यात येणार आहेत. या बोगद्याच्या प्रत्येक 300 मिटर अंतरावर पादचारी क्रॉस पॅसेज, प्रत्येक दोन पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद करण्यात येणार आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पातील बांधकाम हे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चार टनल बोरिंग मशीनच्या मदतीनं करण्यात येणार आहे. सुमारे 12 किमी लांबीच्या प्रकल्पातील 4.43 किमी लांबीचा मार्ग हा ठाणे जिल्ह्यातून तर, 7.4 किमी लांबीचा मार्ग हा बोरिवलीमधून प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

काय- काय असणार वैशिष्टे : या प्रकल्पात अत्याधुनिक सुविधा बसवण्यात येणार आहे. सदर प्रकल्पातील बोगद्यांमध्ये अग्निशामक यंत्रे, पाण्याची नाली, स्मोक डिटेक्टर, एलईडी लाईटचे संकेत फलक देखील लावले आहेत. तसंच नैसर्गिक, यांत्रिक मार्गानं पुरेशी वायुविजन प्रणाली देखील उभारली जाणार आहे. त्यामुळं प्रणांचा बचाव होण्यास मदत होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 16 हजार 600 कोटी असून त्यामध्ये जमीन अधिग्रहणाच्या खर्चाचा देखील समावेश करण्यात आला आहे. एकूण 46.57 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी अधिग्रहन करावी लागणार आहे. त्यात 35.53 हेक्टर सरकारी वन्य जमीन जमीनीचा समावेश आहे. उर्वरित जमीन ही चितळसर, मानपाडा, माजीवडा मागाठणे, बोरीवडे, चेणे तसंच येऊर या गावात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे वाचलंत का :

  1. गॅंगस्टर लॉरेन्स बिन्सोईच्या संपर्कात असलेल्या गॅंगस्टरला पुण्यातून अटक, दोन देशी पिस्तुलासह मॅकझीन जप्त
  2. "काकांच्या मृत्यूची वाट बघताय", अजित पवारांवर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका
  3. विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघासाठी 'शुभ'मन दिन; साहेबांना विजयासाठी विक्रमी आव्हान
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.